शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

बल्लारपुरातील सात चोऱ्यातील दोन लाखांवर ऐवज जप्त

By admin | Updated: February 14, 2016 00:54 IST

शहरात एका महिलांच्या टोळीने घरी कोणी नसताना तब्बल सात ठिकाणी घरफोडी केली. घरफोडीतून त्यांनी सोने, चांदीचे दागिने व नगदी रक्कम लंपास केली.

बल्लारपूर पोलिसांची कारवाई : तीन महिला आरोपींना अटकबल्लारपूर : शहरात एका महिलांच्या टोळीने घरी कोणी नसताना तब्बल सात ठिकाणी घरफोडी केली. घरफोडीतून त्यांनी सोने, चांदीचे दागिने व नगदी रक्कम लंपास केली. याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी तपासाला गती देत तीन महिला आरोपींना अटक केली. या कारवाईत २ लाख ७६ हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला.माया अशोक ठाकरे ऊर्फ किस्मत अली (२०), पूजा गोलू ठाकरे (२२) व रूपा गोलु ठाकरे (२०) अशी आरोपींची नावे असून त्या बल्लारपुरातील शांतीनगर भागातील रहिवासी आहेत. येथील बालाजी वॉर्डात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची वस्ती आहे. येथे काही महिला दररोज शहरात फिरून कचरा गोळा करण्याचे काम करतात. त्याचवेळी त्यांना दाराला कुलूप असल्याचे दिसून येते. घरातील सदस्य बाहेरगावी गेल्याची संधी हेरून घरफोडी करण्याचा सपाटा लावला. आरोपी महिलांनी चोरी केल्याची कबुली पोलीस कोठडी दरम्यान दिली. त्यावेळी तब्बल विविध सात ठिकाणी घरफोडी केल्याचे पोलिसांना सांगितले.विशेष म्हणजे आरोपी महिलांनी कोणालाही चोरीचा सुगावा लागू नये म्हणून घराच्या भिंतीला मोठे छीद्र पाडून आत प्रवेश करण्याचे धोरण अवलंबिले होते. घरफोडीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याने पोलीस प्रशासन चक्रावले होते. त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून घरफोडी करणाऱ्या तीन महिलांना जेरबंद केले. याप्रकरणी आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक (गृह) जयचंद काठे, उपविभागीय अधिकारी प्रल्हाद गिरी यांच्या नेतृत्वात बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर, उपनिरीक्षक विनोद बावणे, राजेश चंचुवार, दिवाकर पवार, संजय फेंदे, विलास निंबाळकर, कुमोद खनके, अनुप आस्टूनकर, अजय कटाईत यांच्या पथकाने केली. (शहर प्रतिनिधी)