शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत सव्वा लाख बांबूंचा पुरवठा

By admin | Updated: July 9, 2015 00:55 IST

जिल्ह्यात वनविभागाकडे ३ हजार नोंदणीकृत बुरड समाजाची संख्या आहे. या व्यतिरीक्त नवीन बांबु धोरणा अंतर्गत नवीन बुरड समाजाची नोंदणी करण्याचे काम सुरु आहे.

चंद्रपूर : जिल्ह्यात वनविभागाकडे ३ हजार नोंदणीकृत बुरड समाजाची संख्या आहे. या व्यतिरीक्त नवीन बांबु धोरणा अंतर्गत नवीन बुरड समाजाची नोंदणी करण्याचे काम सुरु आहे. या बुरड समाजाला सन २०१३-१४ मध्ये २२७५ बुरड लाभार्थ्यांना ७२ हजार ७० व सन २०१४-१५ मध्ये मे अखेरपर्यंत १३४८ बुरड लाभार्थ्यांना ५७ हजार ३९७ हिरव्या लांब बांबुचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. सद्या स्थितीत बांबू व्यवसाय करणारे कारागिर पारंपारीक पध्दतीचा वापर करुन ताटवे, सुप व टोपल्या इत्यादी वस्तु तयार करतात. मात्र त्यांना त्यांच्या मेहनतीचे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. तथापी बांबूचा उपयोग विविध हस्तकला, बांधकामाचे साहित्य, फर्निचर व शेती उपयोगी अवजाराकरिता सुध्दा होतो. याबाबत बांबूच्या उत्पादनामध्ये व बांबूवर आधारित उद्योग तयार करणे, बांबूचा मुल्यवर्धीत वाढविणे करीता राज्य शासनाने ४ डिसेंबर २०१४ च्या शासन निर्णयान्वये ऐतिहासीक निर्णय घेवून बांबू धोरण जाहीर केले. त्या धोरणाअंतर्गत खाजगी जमिनीवर विविध प्रजातीच्या बांबू लागवडीस प्रोत्साहन देणे, खाजगी जमीनीवरील बांबू उत्पादनास वाहतूकीतून मुक्त करणे तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व बुरड कारागिरांना पुरवठा करण्यात येत असलेल्या बांबूवरचे स्वामीत्व शुल्क व वनविकास कर न आकारता पुरवठा करणे, या बाबीचा समावेश शासन निर्णयात केलेला आहे.वनविभागामार्फत राज्यात शास्त्रोक्त पध्दतीने बांबू लागवड व औद्योगीक वापरासाठी प्रशिक्षण व संशोधन केंद्राची चिचपल्ली येथे स्थापन करण्यासाठी वनविभागाने पाऊल उचलले आहे. मात्र जिल्ह्यामध्ये किंवा जिल्ह्यालगत बांबू प्रशिक्षणाची सुविधा नसल्याने बांबु कारागिर वंचीत राहिले आहे. पयार्याने पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही. त्या करीता चिचपल्ली येथे शास्त्रोक्त पध्दतीने बांबू लागवड व औद्योगिक वापरासाठी प्रशिक्षण व प्रसार करण्यासाठी केंद्र स्थापन केल्यामुळे बांबू कारागिरांना पुरवठा करण्यात आलेल्या स्थानिक प्रजातीच्या व्यतिरीक्त विविध हस्तकला तयार करण्याकरीता लागणाऱ्या आवश्यक बांबूच्या प्रजातीची लागवड करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील बांबू कारागिरांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)बांबू प्रकल्पासाठी शासनाकडून प्रयत्न३५ कारागिरांना प्रशिक्षण२०१४-१५ मध्ये जिल्ह्यातील १५ बांबू कारागिरांना विविध हस्तकला तयार करण्याचे आगरतला येथे प्रशिक्षण देण्यात आलेले असून २० प्रशिक्षणार्थी पुन्हा आगरतला येथे प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षीत बांबू कारागिरांनी तयार केलेल्या फर्निचर व इतर हस्तकलाचे प्रदर्शन नुकतेच जिल्हा उद्योग भवन व एनडीए हॉटेल चंद्रपूर येथे प्रदर्शित केले आहे.कारागिरांना होणार फायदाप्रशिक्षण घेवून आलेल्या बांबू कारागिरामार्फत ५ जुलै २०१५ पासून वनअकादमी चंद्रपूर येथे २० प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येत आहे. ५ व ६ जुलै रोजी घेण्यात आलेल्या दोन दिवसीय बांबु चर्चासत्राच्या माध्यमातून बांबु हफ, बांबु पार्क तयार करणे व बांबु उद्योगाला इंडस्ट्रिजचा दर्जा देणे इत्यादीमुळे निश्चितच जिल्ह्यातील बुरड आदिवासी व बांबू कारागिरांना नवीन संधी उपलब्ध होवून फायदा होईल.