शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

दोन दिवसांपासून बिबट्याचे रस्त्यावर ठाण

By admin | Updated: February 16, 2015 01:11 IST

मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्या तुलनेमध्ये त्यांना आवश्यक असलेले जंगल कमी पडत आहे.

चंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्या तुलनेमध्ये त्यांना आवश्यक असलेले जंगल कमी पडत आहे. परिणामी गावशेजारी बिबट्यासह अन्य वन्यप्राणी येत आहेत. यातून मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. शुक्रवार आणि शनिवारी सलग दोन दिवस मामला परिसरात दिवसाढवळ्या अगदी रस्त्यावर बिबट बसून होता. हा रस्त्यावरून नेहमीच नागरिकांना मार्गक्रमण करावे लागते. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. चंद्रपूर-मूल मार्गावरील लोहारा गावाजवळून जाणाऱ्या एका रस्त्यावर मामला, त्यापुढे वायगाव आदी गावे आहेत. सदर गावालगत घनदाट जंगलात आहे. यामुळे वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात येथे वास्तव्य आहे. काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी चक्क वनअधिकाऱ्यांना वाघाने मारलेल्या महिलेचा मृतदेह असलेली बैलबंडी ओढायला लावली होती. त्यानंतर येथील वाघाला पिंजऱ्यात बंद करण्यात आले. आता पुन्हा बिबट्याने धुमाकूळ सुरु केला आहे. बिबट अगदी रस्त्यावर बसून राहत असल्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांना मोठा प्र्रश्न पडला आहे. बिबट्याच्या भीतीमुळे नागरिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला ताटकळत उभे राहत असल्याचे चित्र मागील दोन दिवसांपासून या रस्त्यावर बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे, शासकीय कर्मचाऱ्यांनाही घरी जाण्याच्या वेळेत रस्त्यात बिबट्यामुळे अडकून पडावे लागत आहे. (नगर प्रतिनिधी)दोन दिवसात दोन बिबट्याचा मृत्यूचंद्रपूर जिल्हा जंगलासाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत १२० पेक्षा अधिक वाघांचे तथा मोठ्या प्रमाणात बिबट्याचे वास्तव्य आहे. वन्यप्राण्यांना बघण्यासाठी देशविदेशातील पर्यटक येथे येतात. मात्र सध्या बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढली असून यामुळे नागरिकांना त्रास होऊ लागला आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी पोंभूर्णा तालुक्यातील डोंगळहळदी येथे एका बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. तर शनिवारी रात्री मूल तालुक्यातील सुशी दाबगाव परिसरातील एफडीसीएमच्या ५२६ कंपार्टमेंटमध्ये बिबट्याचा मृतदेह आढळला. त्याचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे समजते.शक्तीनगरमध्ये बिबट्याचे दर्शनवेकोलि परिसरात असलेल्या शक्तीनगर कॉलनी परिसरात दहा दिवसांपूर्वी दोन बिबट रात्री ११ च्या सुमारास आले. याबाबत माहिती मिळताच अनेकांनी शक्तीनगर कॉॅलनीकडे धाव घेतली. कॉलनी परिसरात बिबट आल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. कुत्र्यांच्या मागावर असलेले बिबटे आता गावासह शहराकडेही धाव घेत आहेत.शहरी भागातही बिबटचंद्रपूर शहराच्या अगदी लगत जंगल असल्याने अनेकवेळा जंगलशेजारील भागात बिबट दर्शन देत आहे.. मागील वर्षी बाबूपेठ परिसरातील जुनोना, हिंग्लाज भवानी वॉर्ड, इंदिरानगर परिसरात बिबट्या शिरल्याच्या घटना घडल्या होत्या. विशेष म्हणजे, येथून जववळच असलेल्या लोहारा गावामध्येही रात्रीच्या दरम्यान बिबट्याने दर्शन नित्याचेच झाले आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येतात. जिल्ह्यातीलही मोठ्या संख्येने नागरिक भेट देतात. मात्र ताडोबात जाणे खर्चिक असल्याने अनेकवेळा वन्यप्रेमी व नागरिक रात्रीच्या वेळी जुनोना, लोहारा, चिचपल्ली परिसरातील रस्त्यांवर चारचाकी वाहनांना फिरत असल्याची चर्चा आहे.जीव गुदमरतोयंजिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये वन्यप्राणी आणि मानव संघर्षांच्या घटना घडत आहेत. या घटनांवर आळा घालण्यासाठी अनेकवेळा बिबट, वाघांना बंदिस्त केले जाते. वनविभागाकडून बंदिस्त करण्यात आलेल्या या प्राण्यांना ज्या पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात येते ते पिंजरे अगदीच लहान आकाराचे असल्याने त्यांना यापासून धोका निर्माण झाला आहे. आता वनविभागाने या प्राण्यांना ठेवण्यासाठी मोठ्या आकाराचे पिंजरे तयार करण्यासाठी पाऊल उचलले आहे.