शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

अतिक्रमण हटावविरोधात व्यापाऱ्यांचे बल्लारपूर बंद

By admin | Updated: February 7, 2016 01:58 IST

बल्लारपूर नगर परिषदेने पेपर मील कलामंदिर ते गुरूनानक महाविद्यालयापर्यंतचे सडकेच्या दोनही बाजूकडील अतिक्रमण हटविणे सुरू केले आहे.

उत्तम प्रतिसाद : अतिक्रमण हटविण्याची पद्धत चुकीची असल्याचा आरोपबल्लारपूर : बल्लारपूर नगर परिषदेने पेपर मील कलामंदिर ते गुरूनानक महाविद्यालयापर्यंतचे सडकेच्या दोनही बाजूकडील अतिक्रमण हटविणे सुरू केले आहे. परंतु अतिक्रमण हटविण्याची न.प. ची पध्दत चूक असल्याच्या कारणाने नाराज होऊन येथील व्यापाऱ्यांनी या अतिक्रमण हटाव पध्दतीच्या विरोधात आज (दि. ६) बल्लारपूर बंद ठेवले. या बंदला व्यापाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने सकाळपासून तर दुपारपर्यंत बंद होती. दुपारनंतर काही दुकाने उघडण्यात आलीत.अतिक्रमण हटविण्याला आमचा विरोध नाही. त्याच्या पध्दतीला विरोध आहे, असे बंदकर्त्यांचे म्हणणे आहे. अतिक्रमण हटविण्यापूर्वी व्यापाऱ्यांना तशी सूचना द्यायला हवी होती. पण, तशी नोटीस न देताच अतिक्रमण हटाव पथक एकाएकी धडकले व या पथकाने तोडफोड सुरू केली. काहींनी मुदत मागितली. मात्र, त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. अशा व्यापाऱ्यांच्या तक्रारी आहेत. नगर परिषदेने अतिक्रमीत जागेची सीमा आखून दिली असता तर व्यापाऱ्यांनी स्वत:हून अतिक्रमण हटविले असते असेही व्यापाऱ्यांनी पत्रपरिषदेत सांगितले. बल्लारपूर बिझनेस असोसिएशनचे या संदर्भात न.प. मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. पत्रपरिषदेत बिजनेस असोसिएशनचे भगवानदास गिदवानी ऊर्फ बल्लू सेठ, दादा मूसा, नरेश मुंधडा आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)कार्यवाही नियमानुसारचबल्लारपूर नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम नियमानुसारच केली असल्याचे बल्लारपूर न.प. चे कार्यालय अधिक्षक विजय जांभुळकर यांचे म्हणणे आहे. अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याची सूचना आॅटोने ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून देण्यात आली. त्यामुळे, पूर्वसुचना दिली नाही, असे म्हणणे चूक असल्याचे ते ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.