शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

शेतीपंपासाठी नवीन वीज कनेक्शन देणे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:18 IST

शेतीपंपाला लागणाऱ्या वीज कनेक्शनसाठी वीज महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून पैसे भरून घेणे बंद केले आहे. पारंपरिक पद्धतीने नवीन वीज कनेक्शन देने बंद करून सौर कृषी पंप घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. महावितरणच्या या कारभारामुळे शेतकऱ्यांमधून संपात व्यक्त केला जात असून जुन्याच पद्धतीने पैसे भरून कनेक्शन देण्याची मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देशेतकरी हैराण : महावितरणने दिला सौरपंपाचा पर्याय

आशिष गजभिये।लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : शेतीपंपाला लागणाऱ्या वीज कनेक्शनसाठी वीज महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून पैसे भरून घेणे बंद केले आहे. पारंपरिक पद्धतीने नवीन वीज कनेक्शन देने बंद करून सौर कृषी पंप घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. महावितरणच्या या कारभारामुळे शेतकऱ्यांमधून संपात व्यक्त केला जात असून जुन्याच पद्धतीने पैसे भरून कनेक्शन देण्याची मागणी केली जात आहे.शेतीपंपाला लागणाºया वीज कनेक्शनसाठी वीज महावितरण कंपनीने ३१ मार्च २०१८ पासून पैसे भरून घेणे बंद केले आहे. पारंपरिक पद्धतीने नवीन वीज कनेक्शन देने बंद करून सौर कृषी पंप घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. महावितरणच्या या कारभारामुळे शेतकऱ्यांमधून संपात व्यक्त केला जात असून जुन्याच पद्धतीने पैसे भरून कनेक्शन देण्याची मागणी केली जात आहे.शेतकºयांनी कर्ज काढून शेतात विहिरी खोदल्या. एवढेच नाही, तर पाईपलाईन देखील टाकली आहे. परंतु आता वीज कनेक्शन मिळत नसल्यामुळे कर्जबाजारी झालेले शेतकरी आता हतबल झाले आहेत. शासनाने वीज कनेक्शन देने बंद करून सौर कृषी पंपाचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. यावर शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. बहुतांश शेतकºयांना सौरप्रणाली पाहिजे नसल्याने ते वीज कनेक्शनसाठी अडून आहे.३१ मार्च २०१८ पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी पैसे भरले आहेत. त्या शेतकºयांची प्रकरणे मंजूर झालेली आहेत. अशा शेतकऱ्यांना आता नवीन वीज कनेक्शन देने बंद करून उच्च दाब वितरण प्रणाली 'एचव्हीडीएस' अंतर्गत स्वतंत्र ट्रान्सफर्मारचा पर्याय दिला आहे.या प्रणालीतून एक किंवा दोन शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र रोहित्र बसवून थेट रोहित्रावरून कृषिपंपाला जोडणी देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी शेती पंपाच्या जोडणीसाठी पाच ते सहा वषार्पासून पैसे भरले आहेत. त्यातील काहींची अद्यापही जोडणी बाकी असल्याने या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.महावितरणच्या या गलथान कारभारामुळे राज्यभरात अनेकदा निवेदने, आंदोलने करण्यात आली. मात्र कंपनीने विविध कारणे देत नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज घेणे बंद केले आहे. विशेष म्हणजे, शासनाचा आता सौरऊर्जेवर भर असून त्यादृष्टीने पाऊल उचलने सुरू केले आहे.शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणारशासनाने वीज जोडणी नाकारून शेतात सौरपंप लावण्याचा तगादा शेतकºयांकडे लावला आहे. शेतात वीज पोहचविणे बंद झाल्याने वीजेअभावी शेतातील शेतमाल प्रक्रिया यंत्र, अवजारे, मळणी यंत्र, रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी वापरण्यात येणारे यंत्र आदी सौर ऊर्जेवर चालणार नसल्याने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी वाढणार आहे.शासनाने सरसकट कृषी पंपाला वीज जोडणी देणे बंद करण्याचा निर्णय घेतला असून तो चुकीचा आहे. यापूर्वी मागणी केलेल्या शेतकऱ्यांच्या अर्जावर विचार करायला पाहिजे. शेतकऱ्यांना पारंपरिक वीज जोडणी व सौरपंप असे दोन्ही गरजेचे असून मागणीनुसार सेवा उपलब्ध करून द्यावी.- प्रशांत कोल्हेशेतकरी, वहाणगा