शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

तीन दिवसांपासून नळयोजना बंद

By admin | Updated: April 1, 2017 01:41 IST

नदीपात्रात पाणी नसल्यामुळे नगरपंचायत हद्दीत असलेली नळयोजना मागील तीन दिवसांपासून बंद आहे.

पाण्यासाठी भटकंती : दूषित पाण्यावर भागवावी लागते तहान सिंदेवाही : नदीपात्रात पाणी नसल्यामुळे नगरपंचायत हद्दीत असलेली नळयोजना मागील तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शहरात पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. परिणामी ४२ अंश डिग्री तापमानात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सिंदेवाही शहरात तीन पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. तीनही टाक्याच्या माध्यमातून शहरातील १७ प्रभागात नळाद्वारे पाणी पुरवठा केला जाते. मात्र सद्या नळाद्वारे पाणीपुरवठा बंद असल्याने सिंदेवाहीकरांना घाणेरड्या पाण्याच्या माध्यमातून तहान भागवावी लागत आहे. शहरातील नागरिकांना सरडपार या नदीतून पाणी दिल्या जाते. नदीच्या आजुबाजुच्या शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकासाठी नदीत हातबोर मारली आहे. नदीमधील पात्र व विहीरी कोरड्या झाल्याने मागील तीन दिवसापासून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. नगरपंचायत सदस्य व कर्मचारी नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहे. पण जलकुंभात पाणीच नसल्याने नागरिकांना पाणीपुरवठा कुठून करायचा असा प्रश्न नगरपंचायत समोर पडला आहे. आजुबाजुच्या शेतकऱ्यांवर तहसिलदारांनी नोटीस देवून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नगरपंचायतकडून करण्यात येत आहे. शहरात पाण्याचे दुसरे स्त्रोत नसल्यान नागरिकांना पाण्यासाठी दोन ते तीन कि.मी. अंतरावर असलेल्या व्हॉलवरून पाणी आणावे लागत आहे. तर काही महिला व्हॉलशेजारी खड्डयात जमा असलेल्या पाण्याद्वारे आपली तहान भागवत आहे. इकडे शहरात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. तर शेतकरी उन्हाळी पीक वाचविण्यासाठी जलकुंभातुन बोरद्वारे पाणी देऊन पीक वाचवण्याची केविलवाणी धडपड करत आहे. मार्च महिन्यातच नदीचे पात्र कोरडे झाले आहे. त्यामुळे एप्रिल व मे या दोन्ही महिन्यात भीषण पाणीटंचाई सामना सिंदेवाहीकरांना करावा लागणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने हालचाल करून पाण्याची समस्या सोडवावी, अशी मागणी सिंदेवाहीतलील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)