शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात क्षयरोगाचे रुग्ण वाढतीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:26 IST

चंद्रपूर : जीवाणूजन्य आजार असलेल्या क्षयरोगाचे २०२५ पर्यंत समूळ उच्चाटन करण्याचे प्रयत्न शासनाकडून करण्यात येत असले, तरी जिल्ह्यात या ...

चंद्रपूर : जीवाणूजन्य आजार असलेल्या क्षयरोगाचे २०२५ पर्यंत समूळ उच्चाटन करण्याचे प्रयत्न शासनाकडून करण्यात येत असले, तरी जिल्ह्यात या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. मागील वर्षात जिल्ह्यात खासगी व सरकारी रुग्णालयात दोन हजार ६६२ क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले. त्यापैकी ५०८ रुग्ण उपचाराअंती बरे झाले. ७१६ जणांचे उपचार पूर्ण झाला आहेत, तर ११८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. योग्य निदान आणि उपचार घेतल्यास या आजारातून बचाव करता येतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

क्षयरोग हा जीवाणूजन्य आजार मायक्रो बॅक्टेरिअम टुबरक्युलोसिस नावाच्या जंतूमुळे होणारा आजार आहे. त्याचा संसर्ग हवेतून क्षयरुग्णांच्या खोकल्याद्वारे, शिंकल्याद्वारे होण्याची शक्यता असते. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याने व नियमित उपचार घेतल्याने या आजारातून आपला बचाव करता येऊ शकतो. २०२५ पर्यंत या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा क्षयरोग विभाग प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी सरकारी रुग्णालयातर्फे जनजागृती करण्यात येत असून, उपचार करण्यात येतो. चंद्रपूर जिल्ह्यात सन २०२० मध्ये दोन हजार ६६२ क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले. त्यापैकी १,५५७ रुग्ण सरकारी तर १,१०५ रुग्णांची खासगी रुग्णालयात नोंद करण्यात आली. त्यापैकी ७१६ जणांनी आपला उपचार पूर्ण केला. त्यापैकी ५०८ रुग्ण बरे झाले आहेत, तर ४२ जणांचे एमडीआर निदान करण्यात आले, तसेच ११८ जणांचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित उपचार घेतल्यास क्षयरोगाचे आपण उच्चाटन करू शकू, असा विश्वास वैज्ञकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

बॉक्स

आजाराची लक्षणे

क्षयरोग हा शरीराच्या कोणत्याही अवयवावर होऊ शकतो. अवयवाप्रमाणे लक्षणे आढळून येत असतात. साधारणत: दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला असणे, कोरडा खोकला येणे, ताप येणे, वजन कमी होणे, भूक कमी होणे, छातीत दुखणे, थकवा येणे आदी प्रकरची लक्षणे दिसून येतात.

बॉक्स

अशी घ्या काळजी

तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी दिलेला कोर्स पूर्ण करणे, अर्धवट उपचार घेतल्यास एमडीआर टीबी होण्याची शक्यता असते. खोकताना तोंडावर हात ठेवावा किंवा रुमालाचा वापर करावा, थुंकी एका मटक्यात माती टाकून जमा करावी, आहार व्यवस्थित घ्यावा, जेवणात अंडी, फळे, मांस, मच्छीचा समावेश असावा. प्रोटीन पावडर खावी.

कोट