शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

जिल्ह्यात क्षयरोगाचे रुग्ण वाढतीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:26 IST

चंद्रपूर : जीवाणूजन्य आजार असलेल्या क्षयरोगाचे २०२५ पर्यंत समूळ उच्चाटन करण्याचे प्रयत्न शासनाकडून करण्यात येत असले, तरी जिल्ह्यात या ...

चंद्रपूर : जीवाणूजन्य आजार असलेल्या क्षयरोगाचे २०२५ पर्यंत समूळ उच्चाटन करण्याचे प्रयत्न शासनाकडून करण्यात येत असले, तरी जिल्ह्यात या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. मागील वर्षात जिल्ह्यात खासगी व सरकारी रुग्णालयात दोन हजार ६६२ क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले. त्यापैकी ५०८ रुग्ण उपचाराअंती बरे झाले. ७१६ जणांचे उपचार पूर्ण झाला आहेत, तर ११८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. योग्य निदान आणि उपचार घेतल्यास या आजारातून बचाव करता येतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

क्षयरोग हा जीवाणूजन्य आजार मायक्रो बॅक्टेरिअम टुबरक्युलोसिस नावाच्या जंतूमुळे होणारा आजार आहे. त्याचा संसर्ग हवेतून क्षयरुग्णांच्या खोकल्याद्वारे, शिंकल्याद्वारे होण्याची शक्यता असते. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याने व नियमित उपचार घेतल्याने या आजारातून आपला बचाव करता येऊ शकतो. २०२५ पर्यंत या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्हा क्षयरोग विभाग प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी सरकारी रुग्णालयातर्फे जनजागृती करण्यात येत असून, उपचार करण्यात येतो. चंद्रपूर जिल्ह्यात सन २०२० मध्ये दोन हजार ६६२ क्षयरोगाचे रुग्ण आढळून आले. त्यापैकी १,५५७ रुग्ण सरकारी तर १,१०५ रुग्णांची खासगी रुग्णालयात नोंद करण्यात आली. त्यापैकी ७१६ जणांनी आपला उपचार पूर्ण केला. त्यापैकी ५०८ रुग्ण बरे झाले आहेत, तर ४२ जणांचे एमडीआर निदान करण्यात आले, तसेच ११८ जणांचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित उपचार घेतल्यास क्षयरोगाचे आपण उच्चाटन करू शकू, असा विश्वास वैज्ञकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

बॉक्स

आजाराची लक्षणे

क्षयरोग हा शरीराच्या कोणत्याही अवयवावर होऊ शकतो. अवयवाप्रमाणे लक्षणे आढळून येत असतात. साधारणत: दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला असणे, कोरडा खोकला येणे, ताप येणे, वजन कमी होणे, भूक कमी होणे, छातीत दुखणे, थकवा येणे आदी प्रकरची लक्षणे दिसून येतात.

बॉक्स

अशी घ्या काळजी

तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी दिलेला कोर्स पूर्ण करणे, अर्धवट उपचार घेतल्यास एमडीआर टीबी होण्याची शक्यता असते. खोकताना तोंडावर हात ठेवावा किंवा रुमालाचा वापर करावा, थुंकी एका मटक्यात माती टाकून जमा करावी, आहार व्यवस्थित घ्यावा, जेवणात अंडी, फळे, मांस, मच्छीचा समावेश असावा. प्रोटीन पावडर खावी.

कोट