शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 22:35 IST

हसत खेळत घेणारे शिक्षण आनंद व सुख, समाधान देणारे असते. मनामध्ये ध्येय ठरवून संकल्प पूर्ण करण्याचा ध्यास ठेवला, तर ध्ययेपूर्ती सहज शक्य होते, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देकुणाल खेमणार : ‘एज्यू फिस्ट २०१८’ चा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हसत खेळत घेणारे शिक्षण आनंद व सुख, समाधान देणारे असते. मनामध्ये ध्येय ठरवून संकल्प पूर्ण करण्याचा ध्यास ठेवला, तर ध्ययेपूर्ती सहज शक्य होते, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी व्यक्त केला.स्थानिक चांदा पब्लिक स्कूल येथे आयोजित ‘एज्यु-फिस्ट-२०१८’ चा समारोपीय कार्यक्रम शनिवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आसावती शेनोलीकर, शाळेच्या संचालिका स्मिता जीवतोडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा पांडेय आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना आसावरी शेनोलिकर म्हणाल्या, शिक्षण मनुष्याला नम्र बनवितो. नम्रतेने मनुष्य महान बनतो, असे त्या म्हणाल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.प्रत्येक व्यक्ती इतिहासातून काही ना काही बोध घेत असतो, म्हणूनच ‘इतिहास के पन्नोसे’ ही नाविन्यपूर्ण व कल्पक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जिव्या अरोरा विजयी ठरली. एकपात्री अभिनय स्पर्धेत केशर खराबे विजयी झाली.दहा दिवसीय विविध स्पर्धामधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे प्रस्तुतीकरण व विद्यार्थ्यांनी केलेल्या आनंदाची उधळण तसेच वर्षभरातील विविध स्पर्धामध्ये दाखविलेली कामगिरीचा वार्षिक आढावा विद्यार्थी प्रमुख महावीर खजांची व बुंद दवे यांनी डॉक्युमेंटरीद्वारे उपस्थित पाहुण्यांसमोर मांडला.विद्यार्थ्यानी केलेल्या सर्व प्रकारच्या सादरीकरणाचे उपस्थित पाहुण्यांनी व पालकांनी तोंडभर कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन शाळेच्या शिक्षिका मंजुषा गौरकर, निलीमा पाऊनकर यांनी तर आभार अंजली बंडावार यांनी मानले. यावेळी प्रिती खोब्रागडे, आम्रपाली नगराळे, महेश गौरकार, फहीम शेख, शोभा जाना, शिल्पा खांडरे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.