शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

By admin | Updated: September 28, 2015 01:11 IST

सास्ती खाणीतून कोळसा घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

गोवरी : सास्ती खाणीतून कोळसा घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर त्याच्या मागे बसलेला इसम गंभीर जखमी झाल्याने त्याला राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. हा अपघात रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडला.वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यातील सास्ती कोळसा खाणीतून कोळसा भरुन जाणाऱ्या एमएच-३४ एबी २२४ हा ट्रक भरधाव वेगाने पोवनी कोळसा खाणीत जाणाऱ्या दुचाकी एमएच-३४ यू- ६४५३ ला पोवनी फाट्यावरील चौरस्त्यावर जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील शेखचांद शेख अब्दुल (४८) रा. काटागेट बल्लारपूर यांचा जागीच मृत्यू झाला. तर मागे बसलेल्या संजु मिस्त्री रा. राजुरा यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात घडताच संतप्त जमावाने राजुरा-गोवरी-कवडाळा मार्गावरील वाहतूक अडवून दोन तास रास्ता रोको केले. जोपर्यंत ट्रक चालकाला अटक व मृताच्या वारसांना आर्थिक मदत मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, असा पवित्रा नातेवाईक व जमावाने घेतल्याने घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. (वार्ताहर)