शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

गोंडवानाच्या शुल्कवाढीने गरीब विद्यार्थी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 23:12 IST

गोंडवाना विद्यापीठाने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना माफक दरात शैक्षणिक सुविधा देण्याऐवजी यंदाच्या सत्रात अन्यायकारक शुल्कवाढ केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. शुल्कवाढ मागे घेतली नाही तर शेकडो विद्यार्थी अन्य विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याची शक्यताही शैक्षणिक वर्तुळात वर्तविली जात आहे़

ठळक मुद्देविद्यार्थ्यांमध्ये संताप : भरमसाठ फीवाढ रद्द करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाने सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना माफक दरात शैक्षणिक सुविधा देण्याऐवजी यंदाच्या सत्रात अन्यायकारक शुल्कवाढ केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. शुल्कवाढ मागे घेतली नाही तर शेकडो विद्यार्थी अन्य विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याची शक्यताही शैक्षणिक वर्तुळात वर्तविली जात आहे़चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील गोरगरीब व विद्यार्थ्यांना कमी खर्चात उच्चशिक्षण मिळावे, यासाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठात जिल्ह्यातील अनेक महाविद्यालये संलग्न आहेत. मागील तीन वर्षांपासून विद्यापीठात विविध शाखांचे नवीन अभ्यासक्रम सुरू झालेत. व्यावसायिक अभ्यासक्रमामुळे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढू लागली. परंतु बदलत्या शैक्षणिक स्पर्धेत या विद्यापीठाला अजुनही स्वत:ची प्रतिमा उंचावता आली नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची संख्या वाढवावी, या हेतूने प्रवेशशुल्क वाजवी ठेवून विविध योजना राबविणे गरजेचे आहे. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने यंदा प्रवेश शुल्कात मोठी वाढ केली. त्यामुळे शेतकरी व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना या विद्यापीठात प्रवेश घेणे कठीण होणार आहे. मागील सत्रात बीए, बीकॉम, बीएसडब्ल्यू या अभ्यासक्रमासाठी ५ हजार ३०० रूपये प्रवेश शुल्क होते. यंदा ८ हजार ९२० रूपये भरावे लागणार आहेत. मास्टर आॅफ लेबर स्टडी एमए तसेच अन्य पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ७ हजार ८०० रूपये शुल्क होते़ ते आता ११ हजार ४३३ रूपये करण्यात आले़ एमए मॉस कम्युनिकेशन या अभ्यासक्रमातही मोठी वाढ केल्याने विद्यार्थ्यांना यंदा आर्थिक समस्यांना तोंड द्यावा लागणार आहे़ शुल्क वाढीने पालकही नाराज झाले आहेत़जनसंवाद अभ्यासक्रम महागलाशहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थी अन्य विद्याशाखांचा अभ्यास केल्यानंतर जनसंवाद अभ्यासक्रमाकडेही आकर्षित होत आहे. शासकीय व खासगी संस्थांमध्ये रोजगाराची संधी मिळत असल्याने हा अभ्यासक्रम करिअरसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो. परंतु, यंदा गोंडवाना विद्यापीठाने या अभ्यासक्रमाच्या प्रवेश शुल्कात मोठी वाढ केली़ मागील शैक्षणिक सत्रात आठ हजार ७०० रूपयात प्रवेश दिला जात होता़ यंदा १९ हजार ७५४ रूपये शुल्क निर्धारित करण्यात आले़ त्यामुळे या अभ्यासशाखेला विद्यार्थी मिळणे कठीण होणार आहे.राज्यपालांनी हस्तक्षेप करावाविद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय घेण्याऐवजी गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने यंदा चुकीचे धोरण राबविणे सुरू केले. या विद्यापीठाला आधीच फारसे विद्यार्थी मिळत नाही़ तसेच राज्यातील अन्य विद्यापीठांच्या तुलनेत गोंडवाना विद्यापीठाचा दर्जा समाधानकारक नाही, असाही आरोप केला जातो़ त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे असे शुल्क धोरण निश्चित केले पाहिजे. परंतु, याकडे विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केले़ याचा आर्थिक फटका गरीब विद्यार्थ्यांना बसणार आहे. राज्यपालांनी गोंडवाना विद्यापीठातील दरवाढ रद्द करावी आणि विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी चंद्रपुरातील विद्यार्थ्यांनी ‘लोकमत‘ शी बोलताना केली आहे़