शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

जाचक अटीमुळे योजनाच अडचणीत

By admin | Updated: January 15, 2015 22:48 IST

देशात संस्कृती व स्त्री सन्मानाला अत्यंत महत्वाचे स्थान दिले आहे. जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे. परंतु जाचक अटीमुळे सर्वांना शौचालय मिळणार नाही.

ग्रामस्थांचा सवाल : गाव हागणदारीमुक्त होणार कसे ?पेंढरी (कोके): देशात संस्कृती व स्त्री सन्मानाला अत्यंत महत्वाचे स्थान दिले आहे. जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे. परंतु जाचक अटीमुळे सर्वांना शौचालय मिळणार नाही. या जाचक अटीमुळे चंद्रपूर जिल्हा हागणदारीमुक्त होणार काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन सुरु केले. त्याअंतर्गत गावागावात स्वच्छतेसोबतच शौचालय बांधण्याचा उपक्रम सुरू आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले व मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यातील गावागावात जे लाभार्थी बीपीएल, एपीएल, अल्पभुधारक आहेत, अशाच लोकांना शासनाच्या योजनेच्या निधीतून शौचालय बांधून मिळणार आहे. परंतु जे लाभार्थी यात मोडत नाहीत, त्यांनी व त्यांच्या कुटुंबातील स्त्रीयांनी उघड्यावरच शौचास बसावे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घरटॅक्सपावती ऐवजी विद्युत बील, निवडणूक ओळखपत्र, जाबकार्ड, पॅनकार्ड, आधार कार्ड, रेशनकार्ड इत्यादी कागदपत्रे शौचालय बांधण्यास चालणार नाही का, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे, ते अजब मानसिकतेमुळे शौचालय बांधण्यास तयार नाही. त्यामुळेदेखील स्वच्छतेचा फज्जा उडणार आहे व रोगांचा प्रादूर्भावसुद्धा होणार आहे. तसेच शौचालयाचे बील काढण्यास ग्रामपंचायत, संबंधित पंचायत समितीमध्ये लाभार्थ्यांना वारंवार चकरा माराव्या लागणार आहे. सदर योजना चांगली असली तरी जाचक अट योजनेलाच मारक ठरत असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)