शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जाचक अटीमुळे योजनाच अडचणीत

By admin | Updated: January 15, 2015 22:48 IST

देशात संस्कृती व स्त्री सन्मानाला अत्यंत महत्वाचे स्थान दिले आहे. जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे. परंतु जाचक अटीमुळे सर्वांना शौचालय मिळणार नाही.

ग्रामस्थांचा सवाल : गाव हागणदारीमुक्त होणार कसे ?पेंढरी (कोके): देशात संस्कृती व स्त्री सन्मानाला अत्यंत महत्वाचे स्थान दिले आहे. जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा मानस आहे. परंतु जाचक अटीमुळे सर्वांना शौचालय मिळणार नाही. या जाचक अटीमुळे चंद्रपूर जिल्हा हागणदारीमुक्त होणार काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन सुरु केले. त्याअंतर्गत गावागावात स्वच्छतेसोबतच शौचालय बांधण्याचा उपक्रम सुरू आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले व मुख्य कार्यपालन अधिकारी आशुतोष सलिल यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यातील गावागावात जे लाभार्थी बीपीएल, एपीएल, अल्पभुधारक आहेत, अशाच लोकांना शासनाच्या योजनेच्या निधीतून शौचालय बांधून मिळणार आहे. परंतु जे लाभार्थी यात मोडत नाहीत, त्यांनी व त्यांच्या कुटुंबातील स्त्रीयांनी उघड्यावरच शौचास बसावे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घरटॅक्सपावती ऐवजी विद्युत बील, निवडणूक ओळखपत्र, जाबकार्ड, पॅनकार्ड, आधार कार्ड, रेशनकार्ड इत्यादी कागदपत्रे शौचालय बांधण्यास चालणार नाही का, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे, ते अजब मानसिकतेमुळे शौचालय बांधण्यास तयार नाही. त्यामुळेदेखील स्वच्छतेचा फज्जा उडणार आहे व रोगांचा प्रादूर्भावसुद्धा होणार आहे. तसेच शौचालयाचे बील काढण्यास ग्रामपंचायत, संबंधित पंचायत समितीमध्ये लाभार्थ्यांना वारंवार चकरा माराव्या लागणार आहे. सदर योजना चांगली असली तरी जाचक अट योजनेलाच मारक ठरत असल्याचे बोलले जात आहे. (वार्ताहर)