शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पोंभुर्णा तालुक्यातील शेतकरी अडचणीत

By admin | Updated: August 24, 2014 23:23 IST

पोंभुर्णा तालुक्यामध्ये धान पिकांची रोवणी तसेच कपाशी, सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

देवाडा खुर्द : पोंभुर्णा तालुक्यामध्ये धान पिकांची रोवणी तसेच कपाशी, सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील पंधरा दिवसापासून पावसाचा पत्ता नाही. तर, दुसरीकडे राजकीय नेते निवडणुकीच्या तयारीसाठी गावागावांत फिरताना दिसत आहे. तालुक्यात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले असते तर, ही वेळ नागरिकांवर आली नसली, असेही नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे.यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे पेरणीची टक्केवारी घटली आहे. सोयाबीन, कपास, तुर या पिकांची काही प्रमाणात पेरणी झाली असली तरी तालुक्यातील देवाडा खुर्द, पोंभूर्णा, घनोटी, उमरी पोतदार, डोंगरहळदी, जामतुकुम येथे केवळ ४० टक्के धान पिकांची रोवणी झाली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठा फरत पडणारआहे. रोवणी झाल्यापासून तब्बल २५ दिवसाचा कालावधी लोटूनही पाऊस पडल्या नाही. त्यामुळे परिसरातील पिके करपायला लागली आहे. सततच्या तापत्या उन्हामुळे पिके धोक्यात आली आहे. मागील वर्षी सततच्या पावसाने उत्पादनात प्रचंड घट झाली तर काही ठिकाणी नदी नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. यावर्षी कोरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे पुरते कुंबरडे मोडले आहे. दरवर्षी होणाऱ्या या निसर्गाच्या लहरीपणामुळे परिसरातील शेतकरी तुर्तास हतबल झाला आहे. सततच्या नापिकीमुळे तो कर्जबाजारी झाला असल्याने मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा बँकेकडून खरीप कर्ज घेऊन शेतीची मशागत केली. बियाण, खताच्या वाढलेल्या किंमती, फवारणी व मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणात करून पिके उभी केली. यात निसर्गाने साथ न दिल्याने हातातून पिक जात आहे.तालुक्यामध्ये सिंचनाची सोय नसल्याने केवळ पुर्वजांनी तयार करून ठेवलेल्या बोळी व तलावाच्या भरोवशावर शेती केली जात आहे. तालुक्याला अंधारी, वैनगंगा नदीचे स्त्रोत आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे या ठिकाणी सिंचन प्रकल्पाची सोय होवू शकली नाही. तालुका निर्मीतीला १५ वर्षाचा काळ लोटत आहे. मात्र येथील शेतकरी केवळ नैसर्गिक पावसावर अवलंबून शेती करीत आहे. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन होत नाही. आता विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना प्रलोभने दाखवित आहे. निवडून आल्यावर सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याचे गाजर दाखवित आहेत. कोरडे आश्वासन देण्यापेक्षा ते कृतीमध्ये आणून या मागासलेल्या आदिवासी बहुल तालुक्यात सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)