शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

पोंभुर्णा तालुक्यातील शेतकरी अडचणीत

By admin | Updated: August 24, 2014 23:23 IST

पोंभुर्णा तालुक्यामध्ये धान पिकांची रोवणी तसेच कपाशी, सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

देवाडा खुर्द : पोंभुर्णा तालुक्यामध्ये धान पिकांची रोवणी तसेच कपाशी, सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील पंधरा दिवसापासून पावसाचा पत्ता नाही. तर, दुसरीकडे राजकीय नेते निवडणुकीच्या तयारीसाठी गावागावांत फिरताना दिसत आहे. तालुक्यात सिंचनाची सुविधा उपलब्ध करून लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले असते तर, ही वेळ नागरिकांवर आली नसली, असेही नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे.यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे पेरणीची टक्केवारी घटली आहे. सोयाबीन, कपास, तुर या पिकांची काही प्रमाणात पेरणी झाली असली तरी तालुक्यातील देवाडा खुर्द, पोंभूर्णा, घनोटी, उमरी पोतदार, डोंगरहळदी, जामतुकुम येथे केवळ ४० टक्के धान पिकांची रोवणी झाली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठा फरत पडणारआहे. रोवणी झाल्यापासून तब्बल २५ दिवसाचा कालावधी लोटूनही पाऊस पडल्या नाही. त्यामुळे परिसरातील पिके करपायला लागली आहे. सततच्या तापत्या उन्हामुळे पिके धोक्यात आली आहे. मागील वर्षी सततच्या पावसाने उत्पादनात प्रचंड घट झाली तर काही ठिकाणी नदी नाल्याच्या काठावरील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. यावर्षी कोरड्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे पुरते कुंबरडे मोडले आहे. दरवर्षी होणाऱ्या या निसर्गाच्या लहरीपणामुळे परिसरातील शेतकरी तुर्तास हतबल झाला आहे. सततच्या नापिकीमुळे तो कर्जबाजारी झाला असल्याने मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा बँकेकडून खरीप कर्ज घेऊन शेतीची मशागत केली. बियाण, खताच्या वाढलेल्या किंमती, फवारणी व मजुरीचा खर्च मोठ्या प्रमाणात करून पिके उभी केली. यात निसर्गाने साथ न दिल्याने हातातून पिक जात आहे.तालुक्यामध्ये सिंचनाची सोय नसल्याने केवळ पुर्वजांनी तयार करून ठेवलेल्या बोळी व तलावाच्या भरोवशावर शेती केली जात आहे. तालुक्याला अंधारी, वैनगंगा नदीचे स्त्रोत आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे या ठिकाणी सिंचन प्रकल्पाची सोय होवू शकली नाही. तालुका निर्मीतीला १५ वर्षाचा काळ लोटत आहे. मात्र येथील शेतकरी केवळ नैसर्गिक पावसावर अवलंबून शेती करीत आहे. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन होत नाही. आता विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना प्रलोभने दाखवित आहे. निवडून आल्यावर सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याचे गाजर दाखवित आहेत. कोरडे आश्वासन देण्यापेक्षा ते कृतीमध्ये आणून या मागासलेल्या आदिवासी बहुल तालुक्यात सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)