शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

आदिवासींनी आपला इतिहास वाचण करावे

By admin | Updated: November 22, 2015 00:45 IST

आदिवासी हे देशाचे मुळ निवासी आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षापासून या समाजातील शहीद विरांचा इतिहास दडून होता.

नांदा येथे आदिवासी मेळावा : राजे अम्ब्रीशराव महाराज यांचे प्रतिपादननांदाफाटा : आदिवासी हे देशाचे मुळ निवासी आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षापासून या समाजातील शहीद विरांचा इतिहास दडून होता. आता आदिवासींनी आपला इतिहास वाचण्याची गरज असल्याचे मत आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव महाराज यांनी व्यक्त केले. नांदा येथील क्रांतीवीर बिरसा मुंडा परिसरात शुक्रवारी आयोजित बिरसा मुंडा जयंती व आदिवासी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदिवासी नेते जनार्धन पंधरे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, सिनेट सदस्य प्रकाश गेडाम, कोरपनाचे तहसिलदार पुष्पलता कुमरे, अवदेश आत्राम, प्रकाश तिराणिक, सरपंच पूजा मडावी, उपसरपंच बंडू वरारकर, संजय मुसळे, पुरुषोत्तम आस्वले, भास्कर लोहबळे, तलाठी गेडाम, प्राचार्य अनिल मुसळे, पुरुषोत्तम निब्रड आदी प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी बोलताना जनार्धन पंधरे यांनी गेल्या सप्टेंबर महिन्यात आदिवासींचे आरक्षण रद्द करणाऱ्या शासनाच्या निर्णयावर जोरदार टिका केली व यापुढे आदिवासींच्या सोयी सवलती मोडीस काढू नये, अशी मागणीही केली. आदिवासींना शिक्षण, आरोग्य आणि आरक्षणाचा लाभ मिळावा, त्यांना त्यांच्या योजना व सवलती मिळाव्या, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत यावेळी आमदार संजय धोटे यांनी व्यक्त केले. तर सुदर्शन निमकर यांनी आदिवासी हेच जंगलाचे खरे रक्षक असून त्यांच्यामध्ये प्रामाणिकता ठासून भरली असल्याचे मत व्यक्त केले.प्रास्ताविक किशोर मडावी यांनी केले. संचालन बाबुराव जुमनाके यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रवीण कुरसंगे, अनिल पेंदोर, महादेव तिराणिक, देवानंद उईके, भारत आत्राम, कल्याणी मडावी, अनिल येरमे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील नागरिक व महिलांची मोठी उपस्थिती होती.मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी पाहुण्यांचे स्वागत पारंपारिक आदिवासी गोंडी नृत्याने करण्यात आले. गावात आयोजित हे गोंडी नृत्य विशेष आकर्षण ठरले. पारंपारिक ढोल व बासुरीने सादर झालेल्या या गोंडी नृत्याने गावातील नागरिक भारावून गेले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)