शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

आदिवासी महिलेची न्यायासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव

By admin | Updated: June 26, 2017 00:43 IST

मारहाणीच्या प्रकरणाची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये देवूनही दखल घेण्यात आली नाही. पुन्हा दोन महिन्यांनंतर तोच प्रकार घडला.

वनजमीन अतिक्रमण : मारहाणीच्या तक्रारीनंतरही दखल नाहीलोकमत न्यूज नेटवर्कवडाळा : मारहाणीच्या प्रकरणाची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये देवूनही दखल घेण्यात आली नाही. पुन्हा दोन महिन्यांनंतर तोच प्रकार घडला. त्याची तक्रार देण्याकरिता आदिवासी महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली असता तिची तक्रार स्वीकारण्यात आली नाही. त्यामुळे त्या महिलेने दोन्ही घटनेची चौकशी करून न्याय मिळविण्याकरिता उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेवून वन विभागाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे.गेल्या २०-२५ वर्षांपूर्वी वरोरा तालुक्यातील आल्फर या गावातील महानंदा रामाजी येरमे यांचे आदिवासी कुटुंब उदरनिर्वाहाकरिता वनजमिनिवर अतिक्रमण करून शेती करीत आहे. या महिलेने २७ एप्रिल रोजी शेगाव बु. पोलीस ठाण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार देवून चौकशी करण्याची मागणी केली. मात्र या घटनेला दोन महिने होवूनसुध्दा पोलीस स्टेशनकडून दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर त्या आदिवासी महिलेने १७ जून रोजी अतिक्रमित वनजमिनीवर पऱ्हाटी व तुरीची लागवड करण्याचा प्रयत्न केला. यावेळी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व वनमजूर आले.त्यांनी शेतात जबरदस्तीने खड्डे खोदण्याचे काम सुरू केले. तसेच महिलेच्या कुटुंबाला पेरणी करण्यास मज्जाव केला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याचा निर्णय लागेपर्यंत पीक घेण्यास अडथळा निर्माण करू नका, असे तिचे म्हणणे आहे. तिच्या तक्रारीनुसार, वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी तिला मारहाण केली. त्यामुळे ही आदिवासी महिला घटनेची तक्रार देण्याकरिता त्याच दिवशी शेगाव पोलीस स्टेशनमध्ये गेली असता स्टेशन डायरी अंमलदाराने तक्रार स्वीकारली नाही. त्यामुळे तिने २० जून रोजी वरोऱ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले.वनहक्क कायद्यानुसार पट्ट्याची मागणीवनहक्क कायद्यानुसार त्यांनी जमिनीचा हक्क मिळण्याकरिता त्यांनी २००९ मध्ये वरोरा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दावा अर्ज सादर केला आहे. मात्र या अर्जावर अजूनपर्यंत निर्णय झाला नाही. त्यामुळे या महिलेने १० एप्रिल २०१७ रोजी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना २५ एप्रिल रोजी वन विभागाचे ८-१० कर्मचारी येवून त्या अतिक्रमित जागेवर शेती करण्यास या आदिवासी महिलेला मज्जाव केला. तसेच त्यांनी धमक्या देऊन शिवीगाळ केली.