शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

आदिवासी विद्यार्थी आॅलम्पिक पदकही आणतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:57 IST

जगात जे अशक्य आहे, ते एव्हरेस्ट चढण्याचे शौर्य जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी दाखविले. त्यामुळे या जिद्दीला आता आॅलम्पिक पदक मिळविणे कठीण नाही. काही वर्षांतच आदिवासी विद्यार्थी हे शक्य करून दाखवतील. त्यासाठीच ‘मिशन शक्ती’ मोहीम सुरू केले, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : इंदिरा नगरात आदिवासी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जगात जे अशक्य आहे, ते एव्हरेस्ट चढण्याचे शौर्य जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी दाखविले. त्यामुळे या जिद्दीला आता आॅलम्पिक पदक मिळविणे कठीण नाही. काही वर्षांतच आदिवासी विद्यार्थी हे शक्य करून दाखवतील. त्यासाठीच ‘मिशन शक्ती’ मोहीम सुरू केले, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व महाराणी दुर्गावती आदिवासी महिला मंडळाच्या वतीने स्थानिक इंदिरानगर येथे बुधवारी पार पडलेल्या आदिवासी समाज प्रबोधन स्वाभिमान मेळाव्यात बोलत होते. यावेळी महापौर अंजली घोटेकर, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, जिल्हा परिषदचे समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, नगरसेविका चंद्रकला सोयाम उपस्थित होते. जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी विविध क्षेत्रात घेतलेल्या भरारीचा उल्लेख करून ना. मुनगंटीवार म्हणाले, एव्हरेस्ट सर गाठणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रधानमंत्री नरेंद्र्र मोदी यांच्या हस्ते येत्या काही दिवसांतच होणार आहे. या मुलांच्या स्वागतासाठी अभिनेते आमिर खान हेदेखील उत्सुक आहेत. आदिवासी बांधवांमध्ये उपजत चिकाटी व प्रामाणिकपणे यश मिळविण्याची प्रचंड जिद्द आहे. येत्या काही काळात महाराष्ट्राचा सन्मान वाढविण्यासाठी या शक्तीचा वापर केला जाईल. ही सुरूवात असून ‘आॅपरेशन शौर्य’ नंतर लवकरच ‘मिशन शक्ती’ ला सुरुवात करणार आहे. शासनाने आदिवासी बांधवांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या. राज्य शासनाच्या विविध योजनांमुळे आदिवासींच्या जीवनात आमुलाग्र बदल असल्याचेही ना. सुधीर मुनंटीवार यांनी मेळाव्याप्रसंगी सांगितले.बांबूपासून रोजगाराची संधीचिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. विविध प्रकारचे अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. यातून रोजगार निर्मिती होत आहे. पोंभुर्णा तालुक्यामध्ये १ हजार आदिवासी महिलांना कुक्कुट पालनाचे प्रशिक्षण देण्यात आले. महिलांची कंपनी तयार स्थापन करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात आले आहे. आदिवासींनी संघटीत होवून सामाजिक व आर्थिक विकास करावा, असे आवाहन पालकमंंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.