शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांची आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:27 IST

इयत्ता १ ते १० मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती मागील चार वर्षांपासून थकीत आहे. शिष्यवृत्तीच न मिळाल्याने जिल्ह्यातील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली. दिवाळीच्या दिवसातही ही रक्कम न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा कशा भागवाव्या, या प्रश्नांमुळे पालक प्रशासनाविरूद्ध तीव्र संताप व्यक्त करीत आहे.

ठळक मुद्देसुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती प्रलंबित : पालकांमध्ये तीव्र संताप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : इयत्ता १ ते १० मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती मागील चार वर्षांपासून थकीत आहे. शिष्यवृत्तीच न मिळाल्याने जिल्ह्यातील शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली. दिवाळीच्या दिवसातही ही रक्कम न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा कशा भागवाव्या, या प्रश्नांमुळे पालक प्रशासनाविरूद्ध तीव्र संताप व्यक्त करीत आहे.आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, याकरिता शासनाने सुवर्ण महोत्सवी आदिवासी पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सुरू केली. १ ते ४ वर्गासाठी १ हजार, ५ ते ७ वर्गासाठी दीड हजार आणि ८ ते १० वर्गासाठी दोन हजार रूपये दरमहा शिष्यवृत्ती दिल्या जाते. या शिष्यवृत्तीची रक्कम केंद्र व राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला मिळते. जिल्हा परिषद अंतर्गत येणाºया शाळांमध्ये शिक्षण घेत असलेले आदिवासी विद्यार्थी या शिष्यवृत्तीचे लाभार्थी आहेत.सन २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. २०१५-१६ व २०१६-१७ या शैक्षणिक वर्षामध्ये राज्य शासनाने जुन्या निकषात बदल करून आॅनलाईन अर्ज करण्याचे धोरण स्वीकारले.याचा सर्वाधिक फटका ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांना बसला आहे. केवळ माहितीअभावीही काही विद्यार्थी आॅनलाईन अर्ज भरू शकले नाहीत. मात्र जिल्ह्यातून चार ते चार हजार ५०० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज सादर करून सर्व प्रक्रिया पुर्ण केली. प्रशासनाकडून पुढील कारवाई करणे गरजेचे होते.मात्र संबंधित अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केल्याने राज्य शासनाकडून प्राप्त होणाºया निधीमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या. परिणामी विद्यार्थ्यांचा काहीही दोष नसताना शिष्यवृत्तीपासून त्यांच्यावर वंचित राहण्याची वेळ आली आहे.कार्यवाहीत घोडचुकाविद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शाळांच्या मुख्याध्यापकांनी संबंधित कागदपत्रांची पुर्तता पंचायत समितीकडे केली. पुढील प्रक्रिया करण्याची जबाबदारी वरिष्ठांची होती. परंतु, अत्यावश्यक प्रशासकीय कारवाई करताना संबंधित अधिकाऱ्यांकडून काही घोडचुका झाल्या. त्यामुळे शिष्यवृत्तीचे पात्र लाभार्थी नेमके किती याची माहिती प्रशासनाने अजूनही जाहीर केली नाही.