शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

आदिवासींचे हक्क कायम राहतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 23:57 IST

देशाच्या विकासात आणि जडणघडणीमध्ये आदिवासींचे योगदान मोलाचे आहे. या समाजाने स्वातंत्र्य लढ्यांसाठी क्रांतीकारी योद्धे दिले आहे. याचा देशाला अभिमान आहे. आदिवासींनी शिक्षणाची कास धरल्याने तो समाजप्रवाहात येत आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशाच्या विकासात आणि जडणघडणीमध्ये आदिवासींचे योगदान मोलाचे आहे. या समाजाने स्वातंत्र्य लढ्यांसाठी क्रांतीकारी योद्धे दिले आहे. याचा देशाला अभिमान आहे. आदिवासींनी शिक्षणाची कास धरल्याने तो समाजप्रवाहात येत आहे. शिक्षित होऊन उच्चपदावर पोहचला आहे. समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणखी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी सर्वतोपरी मदत करायला तयार असून देशात अन्य समाजाला आरक्षण देताना आदिवासींच्या हक्कांवर गदा येणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.जिल्हा क्रीडा संकुल येथे आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन पार पडले. यावेळी ते बोलत होते. अधिवेशनाला विशेष अतिथी म्हणून राष्टÑीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या माया इवनाते, आ. राजू तोडसाम, गोंडराजे चांदगड विरेंद्रशहा आत्राम, बीओआय एम्प्लाईज विदर्भचे अध्यक्ष अवचितरा सयाम, गोंगपा प्रदेशाध्यक्ष वासुदेव टेकाम आॅल इंडिया आदिवासी एम्प्लाईज फेडरेशनचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. मधुकर उईके आदींची उपस्थिती होती.ना. अहीर पुढे म्हणाले, आदिवासींच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्याचा हक्क व विकास कुणीच रोखू शकत नाही. आदिवासी समाजातील देशाला योगदान देण्याचा इतिहास लोकांना कळला पाहिजे. चंद्रपुरात होऊ घातलेल्या या सूवर्ण महोत्सवी अधिवेशनात महाराष्टÑाच्या कानाकोपºयातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी आणि योगदान देणारे आदिवासी समाजबांधव एकत्र आले आहे. त्याचे एकवटणे हीच खरी परिवर्तनाची नांदी होय, असे गौरवोदर त्यांनी काढले. आदिवासी समाजाची प्रगती साधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेगवेगळ्या कल्याणकारी योजना आखल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी सवलती व अन्य शैक्षणिक योजनांतून त्यांचा सर्वांगीण विकास हेच सरकारचे ध्येय आहे. त्यामुळे आज आदिवासी समाजाचे संघटन मजबूत झाले असल्याचे प्रतिपादन ना. हंसराज अहीर यानी यावेळी केली. त्यानंतर मायाताई इवनाते, विरेंद्रशहा आत्राम, अवचितराव सयाम वासुदेव शहा टेकाम यांचीही समयोजित भाषणे झाली. अधिवेशनात राज्यभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाºया आदिवासी बांधवाचा सत्कार करण्यात आला.दुसºया सत्राम ‘सामाजिक उत्थानात आदिवासी एम्प्लाईजची भूमिका’ या विषयावर व्याख्यान तथा मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. त्यानंतर तिसºया सत्रात खुले अधिवेशन पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. मधुकर उईके होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून फेडरेशनचे दिलीप मडावी, सुरेश कन्नाके, डॉ. चेतनकुमार मसराम, नंदीनी बागूल, खुशालसिंग सुरपाम, विजय कोकोडे, माधवराव गावड, डॉ. नरेंद्र कोडवते, लक्ष्मणराव घोटकर व सुधाकर मडावी आदीची उपस्थिती होती. त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासींचे पारंपरिक नृत्य सादर केले. यावेळी प्रा. धिरज शेडमाके, सुरेश कन्नाके, डॉ. खडाते उपस्थित होते. 

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर