शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

आदिवासींच्या नशिबी गढूळ व दूषित पाणी

By admin | Updated: July 6, 2017 00:40 IST

देश डिजिटल होण्याकडे वाटचाल करीत आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी आजही नागरिकांना मुलभूत सुविधापासून वंचित राहावे लागत आहे.

आरोग्याचे धिंडवडे : अनेक गावात पाण्याचे स्रोतच नाहीसंघरक्षित तावाडे । लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : देश डिजिटल होण्याकडे वाटचाल करीत आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी आजही नागरिकांना मुलभूत सुविधापासून वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यातील जिवती तालुका अतिदुर्गम असून येथील बरीच आदिवासी गावे सुविधांपासून कोसोदूर आहेत. आदिवासींना आजही गढूळ व दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले आहे. तालुका निर्मितीला दीड दशक लोटले आहे. मात्र आजही येथील काही आदिवासी गावात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. काही गावात पाण्याचे स्रोत असले तर हे स्रोतच दूषित आहे. आणि त्याच पाण्यावर नागरिकांना तहान भागवावी लागते. विहिरीत पूर्णपणे शेवाळ पसरलेले आहे. त्यात कधी ब्लिचिंग पावडरसुद्धा टाकत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.जिवती तालुका ठिकाणापासून अगदी ३ ते १२ किमी अंतरावरील गावात पिण्याचे दूषित व गढूळ पाणी लोक पित आहेत. जवळच्या भुरी येसापूर गावात शासनाचे पाण्याचे स्त्रोत नसून शेतात खोदलेल्या विहिरीतून पाणी काढून लोक पितात. शहरी भागात जे पाणी नागरिक आंघोळीसाठीसुद्धा वापरत नाहीत, असे पाणी आदिवासी बांधवांना प्यावे लागत असतानाही ही बाब प्रशासनाला आजवर गंभीर वाटली नाही. याबाबत संताप व्यक्त होत आहे.सारंगपूर, आसापूर, धनकदेवी, भुरी येसापूर, टाटा कोहळ, अंतापूर, नोकेवाडा, लेंडीगुडा या ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अत्यंत दूषित व गढूळ आहे. असे असले तरी प्रशासनाकडून दखल घेण्याऐवजी दुर्लक्षच होताना दिसत आहे. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याकडून ब्लिचिंग पावडर टाकले जाणे आवश्यक आहे. मात्र तसे होत नाही. सर्व व्यवहार केवळ कागदोपत्री दाखविले जात असल्याचे दिसून येते.आजाराला निमंत्रणतालुक्यातील काही आदिवासी गावात पिण्याचे पाणी गढूळ व दूषित असल्याने त्याचा परिणाम येथील जनतेच्या आरोग्यावर होताना दिसतो. त्वचा रोग, खाज, उलटी, हगवण अशा प्रकारच्या विविध रोगांचा सामना येथील गावकऱ्यांना करावा लागत आहे.फ्लोराईडयुक्त पाण्यानेदाताचे रोगसीमेवरील काही गावात फ्लोराईडयुक्त पाणी असल्याने त्याचा परिणाम मुलांच्या दातावर होत आहे. लहान मुलांपासून तर १६ वर्षे वयाच्या मुलांचे दात पिवळसर झाल्याचे दिसून येतात. अनेक वर्षापासून येथे फ्लोराईडयुक्त पाणी असल्याने येथील मुलामध्ये दंत आजार असल्याचे डॉक्टरचे म्हणणे आहे.भुरी येसापूर व टाटा कोहळ येथील विहिरीचे पाणी अत्यंत दूषित आहे. मी भरारी (आरोग्य) पथकात असल्याने स्वत: त्या गावांना भेटी दिल्या आहेत. याच दूषित पाण्याने येथील लोकात काही आजार आहेत. यावर प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.- डॉ. भुषण मोरेवैद्यकीय अधिकारी (भरारी पथक)प्रा.आ. केंद्र, जिवती.