शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:11 IST

चंद्रपूर शहर व जिल्ह्याला आदिवासी गोंड साम्राज्याचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक वर्षांची वैभवशाली परंपरा चंद्रपूर नगरीला असताना आदिवासींच्या इतिहासाकडे मुद्दाम डोळेझाक करून आदिवासींचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे.

ठळक मुद्देउपोषण सुरूच : चंद्रपुरातील चौकांना आदिवासी थोर पुरुषांची नावे द्यावी

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूर शहर व जिल्ह्याला आदिवासी गोंड साम्राज्याचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक वर्षांची वैभवशाली परंपरा चंद्रपूर नगरीला असताना आदिवासींच्या इतिहासाकडे मुद्दाम डोळेझाक करून आदिवासींचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे. या विरोधात आदिवासींनी धरणे, मोर्चे, आंदोलने करून चंद्रपूर शहरातील चौकांना आदिवासी थोर पुरुषांचे नावे देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने गेल्या पाच दिवसांपासून आदिवासी समाज बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. मंगळवारी आदिजन चेतना जागर संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.चंद्रपुरातील गिरणार चौकास आदिवासी वीर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्यात यावे, कारागृह परिसरात वीर बाबुराव शेडमाके यांना फासावर चढवण्यात आले होते. त्या जागेवर शहीद स्मारक उभारावे, जटपुरा गेटच्या आतील बाजुस राजे खांडक्या बल्लाळशाह यांचा पुतळा उभारण्यात यावा, अंचलेश्वर गेट परिसरात महाराणी हिराई यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा, रेल्वे स्टेशन चौकाला भगवान बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात यावे, बल्लारपूर बायपास रस्त्यावरील इंजिनिअरिंग कॉलेज चौकात महाराणी दुर्गावती यांचा पुतळा उभारण्यास यावा, कुंभार सहकारी संस्थेची जागा आदिवासी समाजाचे सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी समाजाला विनाअट हस्तांतरण करावी आदी २६ मागण्यांसाठी मोर्चा काढला.या मोर्चात अशोक तुमराम, राजू झोडे, मनोज आत्राम, मोनल भडके, जितेश कुळमेथे, राजेंद्र धुर्वे, हरिश उईके, विनोद तोडराम, युवराज मेश्राम, जयवंत वानोडे, डॉ. अरविंद कुळमेथे, नरेंद्र मडावी, बाळू कुळमेथे, जमुना तुमराम, वंदना मेश्राम, वैशाली मेश्राम, गणेश मेश्राम, संपत कोरडे, गणेश इसनकर, मीनाक्षी गेडाम यांच्यासह शेकडो आदिवासी समाजबांधवांचा सहभाग होता.सातव्या दिवशीही उपोषण सुरूचआदिवासी समाजबांधवांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या १४ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. मात्र, प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याने मंगळवारी सातव्या दिवशीही उपोषण सुरूच होते.