शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आदिवासींचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 23:11 IST

चंद्रपूर शहर व जिल्ह्याला आदिवासी गोंड साम्राज्याचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक वर्षांची वैभवशाली परंपरा चंद्रपूर नगरीला असताना आदिवासींच्या इतिहासाकडे मुद्दाम डोळेझाक करून आदिवासींचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे.

ठळक मुद्देउपोषण सुरूच : चंद्रपुरातील चौकांना आदिवासी थोर पुरुषांची नावे द्यावी

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूर शहर व जिल्ह्याला आदिवासी गोंड साम्राज्याचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक वर्षांची वैभवशाली परंपरा चंद्रपूर नगरीला असताना आदिवासींच्या इतिहासाकडे मुद्दाम डोळेझाक करून आदिवासींचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे. या विरोधात आदिवासींनी धरणे, मोर्चे, आंदोलने करून चंद्रपूर शहरातील चौकांना आदिवासी थोर पुरुषांचे नावे देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने गेल्या पाच दिवसांपासून आदिवासी समाज बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. मंगळवारी आदिजन चेतना जागर संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.चंद्रपुरातील गिरणार चौकास आदिवासी वीर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्यात यावे, कारागृह परिसरात वीर बाबुराव शेडमाके यांना फासावर चढवण्यात आले होते. त्या जागेवर शहीद स्मारक उभारावे, जटपुरा गेटच्या आतील बाजुस राजे खांडक्या बल्लाळशाह यांचा पुतळा उभारण्यात यावा, अंचलेश्वर गेट परिसरात महाराणी हिराई यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात यावा, रेल्वे स्टेशन चौकाला भगवान बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात यावे, बल्लारपूर बायपास रस्त्यावरील इंजिनिअरिंग कॉलेज चौकात महाराणी दुर्गावती यांचा पुतळा उभारण्यास यावा, कुंभार सहकारी संस्थेची जागा आदिवासी समाजाचे सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी समाजाला विनाअट हस्तांतरण करावी आदी २६ मागण्यांसाठी मोर्चा काढला.या मोर्चात अशोक तुमराम, राजू झोडे, मनोज आत्राम, मोनल भडके, जितेश कुळमेथे, राजेंद्र धुर्वे, हरिश उईके, विनोद तोडराम, युवराज मेश्राम, जयवंत वानोडे, डॉ. अरविंद कुळमेथे, नरेंद्र मडावी, बाळू कुळमेथे, जमुना तुमराम, वंदना मेश्राम, वैशाली मेश्राम, गणेश मेश्राम, संपत कोरडे, गणेश इसनकर, मीनाक्षी गेडाम यांच्यासह शेकडो आदिवासी समाजबांधवांचा सहभाग होता.सातव्या दिवशीही उपोषण सुरूचआदिवासी समाजबांधवांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या १४ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. मात्र, प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याने मंगळवारी सातव्या दिवशीही उपोषण सुरूच होते.