शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

कोसंबीच्या आदिवासींचे राजुऱ्यात बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 23:15 IST

माणिकगड सिमेंट कंपनीकडून जिवती तालुक्यातील कोसंबीच्या आदिवासींची जमीन बळकावून भूमिहीन करण्यात आले आहे. याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून आदिवासींचा शासनाविरुद्ध लढा सुरु आहे. सोमवारपासून राजुरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे बेमुदत उपोषण सुरु आहे. बुधवारी तिसºया दिवशीही उपोषण सुरूच होते. मात्र दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देदोन उपोषणकर्ते दवाखान्यात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : माणिकगड सिमेंट कंपनीकडून जिवती तालुक्यातील कोसंबीच्या आदिवासींची जमीन बळकावून भूमिहीन करण्यात आले आहे. याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून आदिवासींचा शासनाविरुद्ध लढा सुरु आहे. सोमवारपासून राजुरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे बेमुदत उपोषण सुरु आहे. बुधवारी तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच होते. मात्र दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मोहनू सिडाम (५५) व वैजुबाई मंगाम (५८) अशी उपचार घेत असलेल्या उपोषणकर्त्यांची नावे आहेत. मागील अनेक वर्षापासून जिवती तालुक्यातील कोसंबी येथील जमिनीचा वाद सुरु आहे. सध्या काही जागेवर आदिवासी कोलाम झोपड्या बांधून वास्तव्य करीत आहे. शेतीवर हंगामी कामे करुन पेरणी करीत आहे. तरीही माणिगकड कंपनीकडून कायदेशिर अधिकार असल्याचा दावा केला जात आहे. या जमिनीसंदर्भात १७ आॅगस्ट १९८१ रोजी माणिकगड कंपनी व जिल्हाधिकाºयांमध्ये झालेला करार नियमबाह्य व कायद्याची पायमल्ली करणारा असल्याचा आरोप सोमवारी कुसुंबीच्या आदिवासींनी केला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी १५ नोव्हेंबर १९८४ रोज अहवाल दिला तर १९८१ मध्ये करार झाला कसा, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. दरम्यान, सोमवारपासून आपल्या न्याय मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बुधवारीही उपोषण सुरूच होते.