शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कोसंबीच्या आदिवासींचे राजुऱ्यात बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 23:15 IST

माणिकगड सिमेंट कंपनीकडून जिवती तालुक्यातील कोसंबीच्या आदिवासींची जमीन बळकावून भूमिहीन करण्यात आले आहे. याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून आदिवासींचा शासनाविरुद्ध लढा सुरु आहे. सोमवारपासून राजुरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे बेमुदत उपोषण सुरु आहे. बुधवारी तिसºया दिवशीही उपोषण सुरूच होते. मात्र दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देदोन उपोषणकर्ते दवाखान्यात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : माणिकगड सिमेंट कंपनीकडून जिवती तालुक्यातील कोसंबीच्या आदिवासींची जमीन बळकावून भूमिहीन करण्यात आले आहे. याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून आदिवासींचा शासनाविरुद्ध लढा सुरु आहे. सोमवारपासून राजुरा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आदिवासी बांधवांचे बेमुदत उपोषण सुरु आहे. बुधवारी तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच होते. मात्र दोन उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मोहनू सिडाम (५५) व वैजुबाई मंगाम (५८) अशी उपचार घेत असलेल्या उपोषणकर्त्यांची नावे आहेत. मागील अनेक वर्षापासून जिवती तालुक्यातील कोसंबी येथील जमिनीचा वाद सुरु आहे. सध्या काही जागेवर आदिवासी कोलाम झोपड्या बांधून वास्तव्य करीत आहे. शेतीवर हंगामी कामे करुन पेरणी करीत आहे. तरीही माणिगकड कंपनीकडून कायदेशिर अधिकार असल्याचा दावा केला जात आहे. या जमिनीसंदर्भात १७ आॅगस्ट १९८१ रोजी माणिकगड कंपनी व जिल्हाधिकाºयांमध्ये झालेला करार नियमबाह्य व कायद्याची पायमल्ली करणारा असल्याचा आरोप सोमवारी कुसुंबीच्या आदिवासींनी केला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी १५ नोव्हेंबर १९८४ रोज अहवाल दिला तर १९८१ मध्ये करार झाला कसा, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. दरम्यान, सोमवारपासून आपल्या न्याय मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. बुधवारीही उपोषण सुरूच होते.