शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

वनमंत्र्यांच्या जिल्ह्यात आदिवासीवर अन्याय

By admin | Updated: May 21, 2015 01:28 IST

पारंपरिकरीतीने आदिवासींवर होणारा अन्याय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून २००६ मध्ये केंद्रसरकारने वनहक्क कायद्याची निर्मिती केली.

वडाळा (तु.): पारंपरिकरीतीने आदिवासींवर होणारा अन्याय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून २००६ मध्ये केंद्रसरकारने वनहक्क कायद्याची निर्मिती केली. मात्र प्रशासकीय पातळीवर वनहक्क कायद्याची अंमलबजावणी कायद्याच्या तरतुदीप्रमाणे होत नसल्यामुळे आदिवासीवरील अन्याय दूर होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.आदिवासी व त्यांच्या सोबत असलेल्या इतर पारंपारिक निवासी यांचा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास होण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम २००६ व नियम २००८ या वनहक्क कायद्याची निर्मिती केली. त्यामुळे या वनहक्क कायद्याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात २००९ पासून सामूहिक वनहक्क दावे कायद्यातील तरतुदीची पूर्तता करुन संबंधित उपविभागस्तरीय समितीकडे सादर करण्याला सुरुवात झाली. त्यात गोंडपिपरी तालुक्यातील पाचगाव व भद्रावती तालुक्यातील चिंचोली ही दोन दावे चंद्रपूर जिल्ह्यातील पहिले दावे सादर केलेले असून २००९ मध्ये एकाच दिवशी संबंधित उपविभागस्तरीय समितीकडे सादर केले. त्यातील गोंडपिपरी तालुक्यातील पाचगाव येथील सामूहिक वनहक्क दावा मान्य करुन तत्कालीन पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते त्या दाव्याचा अभिलेख ग्रामसभेच्या नावे वितरित करण्यात आला. मात्र भद्रावती तालुक्यातील चिंचोली येथील सामूहीक वनहक्क दावा तीन वर्ष उपविभागस्तरीय वनहक्क समिती वरोरा येथे प्रलंबित ठेवून ५ मार्च २०१३ रोजी समितीचे सभेत मान्य करुन अंतिम मंजुरीकरिता जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडे पाठविण्यात आला. मात्र जिल्हास्तरीय वनहक्क समितीने दोन वर्षापासून प्रलंबित ठेवून अन्यायच केलेला आहे.वनहक्क दावे प्रलंबित ठेवून या अन्यायकारक, प्रवृत्तीची झळ भद्रावती तालुक्यातील चिंचोली बरोबरच वडाळा (तु.) घोसरी, सितारामपेठ, कोठेगाव, खुटवंडा, यासारख्या अनेक गावात वनहक्क कायद्यातील तरतुदीची पूर्तता करुन उपविभागस्तरीय वनहक्क समिती वरोरा यांच्याकडे सामूहिक वनहक्क दावे सादर केले. त्यातील वडाळा तु. येथील ग्रामस्थांनी केलेला सामूहिक वनहक्क दावा ५ मार्च २०१३ रोजी झालेल्या उपविभागीय समिती वरोराच्या सभेत अमान्य केल्याने समितीने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात वडाळा ग्रामसभेने जिल्हास्तरीय समितीकडे ४ मे २०१३ रोजी अपिल सादर केले. मात्र दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनही जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडून कुठलीही कार्यवाही केली नसल्याने अपिलचे प्रकरण प्रलंबित ठेवून ग्रामसभेवर अन्यायच केला आहे. त्यासोबतच तालुक्यातील घोसरी, सितारामपेठ, कोंढेगाव, खुटवंडा येथील सामूहिक वनहक्क दावे एक वर्षापासून उपविभागस्तरीय वनहक्क समिती वरोरा येथे प्रलंबित असल्याने एक प्रकारे प्रशासकीय पातळीवरुन दावे प्रलंबित ठेवून वनहक्क मागणीदार आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी समुदायावर अन्यायच केला जात असल्याची भावना गावागावात व्यक्त होत आहे. सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री असून याच जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा आहे. मुनगंटीवारची ही जन्मभूमी असल्याने सामूहिक वनहक्क दाव्यांच्या प्रक्रियेत लक्ष घालून मान्य करतील आणि आदिवासी जनतेवर होणारा पारंपारिक अन्याय दूर करतील, अशी जनतेची अपेक्षा आहे. (वार्ताहर)