शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी तिरंगा यात्रा

By admin | Updated: August 20, 2016 00:51 IST

भारताला स्वातंत्र्य मिळाल्याला ७० वर्षे झालीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवण्यासाठी तिरंगा यात्रेची संकल्पना मांडली.

लातूर : निलंगा तालुक्यातील नणंद येथील राजकुमार बिराजदार यांना सर्पदंश झाल्याने निलंगा उपजिल्हा रुग्णालयातून ‘सर्वोपचार’कडे रेफर करण्यात आले होते. उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा ठपका नातेवाईकांनी ठेवला होता. त्याची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांनी तीन सदस्यीय समितीकडून डॉक्टर व नातेवाईकांची शुक्रवारी चौकशी करण्यात आली. निलंगा तालुक्यातील नणंद येथील राजकुमार बिराजदार यांना सर्पदंश झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण संबंधित हजर असणाऱ्या डॉक्टरांनी तात्काळ उपचार केले नाहीत. तसेच रुग्णाला लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयाकडे रेफर केले. रुग्ण सर्वोपचारमध्ये दाखल केल्यानंतर त्याच्यावर स्थानिक डॉक्टरांनी तात्काळ उपचार केले नाहीत. आवश्यक असलेले औषधोपचारही देण्यात स्थानिक प्रशासन कमी पडले. त्यामुळे उपचारादरम्यान राजकुमार बिराजदार यांचा १५ जून २०१५ रोजी मृत्यू झाला. हा मृत्यू सर्पदंशाने नसून हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा ठपका नातेवाईकांनी ठेवला. नातेवाईकांनी आरोग्य उपसंचालक आरोग्य विभाग, सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता तसेच मानवी हक्क आयोग नवी दिल्ली यांच्याकडे तक्रार नोंदविली. त्या तक्रारीची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांनी तीन सदस्यीय समिती मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. वाळकीकर यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त केली. ही समिती शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सकाळी दाखल झाली. समितीच्या वतीने सर्पदंश प्रकरणातील जबाबदार असणाऱ्या डॉक्टरांची प्रारंभी चौकशी केली. त्यानंतर दुपारी १ ते ३ या वेळेत तक्रार करणारे नातेवाईक दिलीप बिराजदार व त्यांचा मुलगा मयूर यांची चौकशी केली. या चौकशी समितीचा अहवाल वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक यांच्याकडे तसेच मानवी हक्क आयोग नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)