शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी तिरंगा यात्रा

By admin | Updated: August 20, 2016 00:51 IST

भारताला स्वातंत्र्य मिळाल्याला ७० वर्षे झालीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवण्यासाठी तिरंगा यात्रेची संकल्पना मांडली.

लातूर : निलंगा तालुक्यातील नणंद येथील राजकुमार बिराजदार यांना सर्पदंश झाल्याने निलंगा उपजिल्हा रुग्णालयातून ‘सर्वोपचार’कडे रेफर करण्यात आले होते. उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा ठपका नातेवाईकांनी ठेवला होता. त्याची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांनी तीन सदस्यीय समितीकडून डॉक्टर व नातेवाईकांची शुक्रवारी चौकशी करण्यात आली. निलंगा तालुक्यातील नणंद येथील राजकुमार बिराजदार यांना सर्पदंश झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण संबंधित हजर असणाऱ्या डॉक्टरांनी तात्काळ उपचार केले नाहीत. तसेच रुग्णाला लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयाकडे रेफर केले. रुग्ण सर्वोपचारमध्ये दाखल केल्यानंतर त्याच्यावर स्थानिक डॉक्टरांनी तात्काळ उपचार केले नाहीत. आवश्यक असलेले औषधोपचारही देण्यात स्थानिक प्रशासन कमी पडले. त्यामुळे उपचारादरम्यान राजकुमार बिराजदार यांचा १५ जून २०१५ रोजी मृत्यू झाला. हा मृत्यू सर्पदंशाने नसून हा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा ठपका नातेवाईकांनी ठेवला. नातेवाईकांनी आरोग्य उपसंचालक आरोग्य विभाग, सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता तसेच मानवी हक्क आयोग नवी दिल्ली यांच्याकडे तक्रार नोंदविली. त्या तक्रारीची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांनी तीन सदस्यीय समिती मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. वाळकीकर यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त केली. ही समिती शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सकाळी दाखल झाली. समितीच्या वतीने सर्पदंश प्रकरणातील जबाबदार असणाऱ्या डॉक्टरांची प्रारंभी चौकशी केली. त्यानंतर दुपारी १ ते ३ या वेळेत तक्रार करणारे नातेवाईक दिलीप बिराजदार व त्यांचा मुलगा मयूर यांची चौकशी केली. या चौकशी समितीचा अहवाल वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक यांच्याकडे तसेच मानवी हक्क आयोग नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)