शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

वृक्ष लागवड ही चळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:35 IST

शासनाच्या महत्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेत प्रत्येकाचा वाटा असणे महत्वाचे आहे. वृक्ष संपदा ही अनन्यसाधारण व मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे. परिणामी वृक्ष लागवड ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.

ठळक मुद्देशांतनू गोयल : ईटगाव येथे वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाच्या महत्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेत प्रत्येकाचा वाटा असणे महत्वाचे आहे. वृक्ष संपदा ही अनन्यसाधारण व मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे. परिणामी वृक्ष लागवड ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.पवनी तालुक्यातील ईटगाव येथे सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी उपवनसंरक्षक विवेक कोशिंग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, तहसीलदार अक्षय पोयाम, गटविकास अधिकारी नूतन सावंत, सामाजिक वनिकरणाचे विभागीय अधिकारी आर.एन. विधाते, सहायक वनसंरक्षक आर.डी. चोपकर, वनपरिक्षेत्र अधिकारी सोनम ढोले, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता संजीव जगताप, सरपंच गुलचंद बांते, माणिक मरकाम, राजुराचे सरपंच शंकर मडावी, ग्रीन हेरिटेज संस्थेचे मोहम्मद शहीद शेख, शाहीद खान, पी.आर. बीडीकर, देवतारे व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी उपस्थित अतिथींनी वृक्ष लागवडीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांसह सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. वृक्ष लागवड मोहिमेत शाळेतील विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग नोंदविला होता. ही मोहिम महिनाभर चालणार आहे.५४ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्याला ५३ लाख ९९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यात सर्वात मोठा वाटा वनविभागाकडे आहे. यात वृक्ष लागवडीसाठी सहा हजार २७ साईटची नोंदणी करण्यात आली आहे. यात सर्व प्रशासकीय विभागाने ५७ लाख २१ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन तयार केले असून यासाठी ५० लाख खड्डे खोदण्यात आली आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत, कृषी विभाग व इतर शासकीय, प्रशासकीय विभाग म्हणून उद्दीष्ट पूर्ण करणार आहे. यात सार्वजनिक उपक्रमांतर्गत नागरिकांचे सहकार्य अपेक्षीत आहे