शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड ही चळवळ व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:35 IST

शासनाच्या महत्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेत प्रत्येकाचा वाटा असणे महत्वाचे आहे. वृक्ष संपदा ही अनन्यसाधारण व मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे. परिणामी वृक्ष लागवड ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.

ठळक मुद्देशांतनू गोयल : ईटगाव येथे वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासनाच्या महत्वाकांक्षी वृक्ष लागवड मोहिमेत प्रत्येकाचा वाटा असणे महत्वाचे आहे. वृक्ष संपदा ही अनन्यसाधारण व मानवाला मिळालेली मोठी देणगी आहे. परिणामी वृक्ष लागवड ही लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी केले.पवनी तालुक्यातील ईटगाव येथे सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी उपवनसंरक्षक विवेक कोशिंग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण, तहसीलदार अक्षय पोयाम, गटविकास अधिकारी नूतन सावंत, सामाजिक वनिकरणाचे विभागीय अधिकारी आर.एन. विधाते, सहायक वनसंरक्षक आर.डी. चोपकर, वनपरिक्षेत्र अधिकारी सोनम ढोले, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता संजीव जगताप, सरपंच गुलचंद बांते, माणिक मरकाम, राजुराचे सरपंच शंकर मडावी, ग्रीन हेरिटेज संस्थेचे मोहम्मद शहीद शेख, शाहीद खान, पी.आर. बीडीकर, देवतारे व वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी उपस्थित अतिथींनी वृक्ष लागवडीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांसह सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. वृक्ष लागवड मोहिमेत शाळेतील विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग नोंदविला होता. ही मोहिम महिनाभर चालणार आहे.५४ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्याला ५३ लाख ९९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यात सर्वात मोठा वाटा वनविभागाकडे आहे. यात वृक्ष लागवडीसाठी सहा हजार २७ साईटची नोंदणी करण्यात आली आहे. यात सर्व प्रशासकीय विभागाने ५७ लाख २१ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन तयार केले असून यासाठी ५० लाख खड्डे खोदण्यात आली आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत, कृषी विभाग व इतर शासकीय, प्रशासकीय विभाग म्हणून उद्दीष्ट पूर्ण करणार आहे. यात सार्वजनिक उपक्रमांतर्गत नागरिकांचे सहकार्य अपेक्षीत आहे