शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ वृक्षाला अखेर जीवदान मिळालेच नाही

By admin | Updated: April 10, 2015 00:57 IST

चंद्रपूर- बल्लारपूर- बामणी या मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

सास्ती : चंद्रपूर- बल्लारपूर- बामणी या मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. परंतु नागरिकांना चौपदरी रस्त्याच्या माध्यमातून दिलासा मिळाला. दरम्यान, या रस्त्याच्या बांधकामात रस्त्याच्या कडेला येणारी बरीच झाडे तोडल्या गेली. बल्लारपुरातील कलामंदिर परिसरात असलेले एका भल्यामोठ्या वृक्षाला जीवनदान मिळावे म्हणून बांधकाम कंपनीने त्याला मुळसकट बाहेर काढले. त्याची लागवड करून त्याला जीवदान देण्याचे ठरविले. मात्र माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक, लागवड न करता त्या वृक्षाला विसापूर टोलनाका परिसरात असेच ठेवून दिले. अथक प्रयत्न करूनही त्या वृक्षाला जीवनदान देण्यास कंत्राटदार कंपनी असमर्थ ठरली.शेती व उद्योगधंद्याच्या विस्तारासाठी तसेच सिंचन प्रकल्पासाठी व इतर विकास कामांसाठी जमिनीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जंगल नाहीसे होत असल्याचे दिसून येत आहे. विखुरलेल्या वृक्षराजी आजही पूर्वजांनी सातत्याने केलेल्या वृक्षसंवर्धनाची आठवण करून देतात. परंतु जुन्या मुल्यांचा आज ऱ्हास होत आहे. विविध उद्योगधंदे, कोळसा खाणी, तसेच मोठमोठ्या प्रकल्पाचे काम करताना झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जात आहे. त्यामुळे निसगाचे संतुलन बिघडत चालले असल्याचे दिसून येत आहे. उद्योगांमुळे प्रदूषण वाढत आहे. त्याचाही परिणामी निसर्गावर होत आहे. विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल केली जाते. परंतु त्या प्रमाणात त्याची लागवड केली जात नसल्याचे दिसून येत आहे. शासनाने शतकोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रमही हाती घेतला. परंतु त्यातूनही काही सार्थक झाले नाही. अनेक ठिकाणी हा कार्यक्रम अयशस्वी ठरला आहे.चंद्रपूर- बल्लारपूर- बामणी दरम्यानच्या चौपदरी रस्ता बांधकामादरम्यानही अनेक मोठमोठी वृक्ष तोडावी लागली. मात्र कत्तल वृक्षांमुळे होणारे नुकसान भरुन काढण्याच्या दृष्टीकोनातून तोडलेल्या वृक्षापेक्षा जास्त वृक्षांची लागवड करणे महत्त्वाचे होते. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.या चौपदरी रस्ता बांधकामादरम्यान अनेक वृक्षांच्या कत्तलीत बल्लारपूर शहरातील कलामंदिर परिसरात असलेले वृक्षही तोडल्या गेले. परंतु त्या वृक्षाचे जतन करण्याचा हेतू ठेवून कंपनीने जेसीबीच्या सहाय्याने हा भलामोठा वृक्ष मुळासकट उपटून त्याची विसापूर परिसरात असलेल्या टोलनाक्यावर लागवड करण्याचे ठरविले. हा मोठा वृक्ष ट्रकवर लादून त्या ठिकाणी नेण्यात आला. वृक्षाला जीवनदान मिळेल, असे वाटले. परंतु कुठे घोडे अडले कुणास ठाऊक, त्या वृक्षाला तसेच ठेवून देण्यात आले. परंतु वृक्षाचे रोपण करण्याचे सौजन्य दाखविले नाही. (वार्ताहर)