शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

परिवहन समिती कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 22:42 IST

सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी सर्व शाळांमध्ये परिवहन समितीची स्थापना करण्याचे राज्य सरकारचे निर्देश आहेत. मात्र जिल्ह्यातील शाळाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी परिवहन समिती कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देशाळांचे दुर्लक्ष : स्कूल बसमधून विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी सर्व शाळांमध्ये परिवहन समितीची स्थापना करण्याचे राज्य सरकारचे निर्देश आहेत. मात्र जिल्ह्यातील शाळाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी परिवहन समिती कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.विद्यार्थ्यांचा घर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये शालेय स्कूलबस परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश दरवर्षी राज्य शासनाकडून देण्यात येतात. त्यानुसार मुख्यध्यापकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येते. त्यामध्ये पालक संघाचे प्रतिनिधी, बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी, परिवहन विभागाचे मोटार वाहन निरिक्षक, पोलीस विभागाचे प्रतिनिधी यांचा समावेश असतो. परंतु शाळेकडून या समितीची स्थापना करण्यात येत नाही. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा घर ते शाळा व शाळा ते घर हा प्रवास धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. ज्या शाळा परिवहन समितीची स्थापना करत नाही, अशा शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई करणे अपेक्षीत आहे. मात्र शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही.वाहतूक विभागाकडे नोंदच नाहीशाळा परिवहन समितीची स्थापना करुन त्याची नोंद वाहतूक विभागाकडे करावी, असे राज्य शासनाने निर्देश आहेत. मात्र जिल्ह्यातील शाळेने समितीची स्थापना करण्याकडे दुर्लक्ष केल्याने वाहतूक विभागाकडे समितीची नोंदच नाही. त्यामुळे शालेय बसमधून विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक असल्याचे दिसून येत आहे.पालकविभाग अनभिज्ञदिवसेंदिवस विविध शाळा विद्यार्थ्यांना व पालकांना आकर्षित करण्यासाठी शाळेमध्ये अनेक सुविधा करीत आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेच्या असणाऱ्या परिवहन समितीच्या स्थापनेकडे कानाडोळा करीत आहेत. याबाबत पालक अनभिज्ञ असल्याने तेसुद्धा समिती स्थापनेबाबत शाळांना विचारणा करीत नाही. परिणामी राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाकडे शाळा अधिकाºयांमुळे हरताळ फासली जात आहे.