शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

परिवहन समिती कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 22:42 IST

सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी सर्व शाळांमध्ये परिवहन समितीची स्थापना करण्याचे राज्य सरकारचे निर्देश आहेत. मात्र जिल्ह्यातील शाळाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी परिवहन समिती कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देशाळांचे दुर्लक्ष : स्कूल बसमधून विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी सर्व शाळांमध्ये परिवहन समितीची स्थापना करण्याचे राज्य सरकारचे निर्देश आहेत. मात्र जिल्ह्यातील शाळाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी परिवहन समिती कागदावरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.विद्यार्थ्यांचा घर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये शालेय स्कूलबस परिवहन समिती स्थापन करण्याचे आदेश दरवर्षी राज्य शासनाकडून देण्यात येतात. त्यानुसार मुख्यध्यापकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येते. त्यामध्ये पालक संघाचे प्रतिनिधी, बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी, परिवहन विभागाचे मोटार वाहन निरिक्षक, पोलीस विभागाचे प्रतिनिधी यांचा समावेश असतो. परंतु शाळेकडून या समितीची स्थापना करण्यात येत नाही. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा घर ते शाळा व शाळा ते घर हा प्रवास धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. ज्या शाळा परिवहन समितीची स्थापना करत नाही, अशा शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई करणे अपेक्षीत आहे. मात्र शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही.वाहतूक विभागाकडे नोंदच नाहीशाळा परिवहन समितीची स्थापना करुन त्याची नोंद वाहतूक विभागाकडे करावी, असे राज्य शासनाने निर्देश आहेत. मात्र जिल्ह्यातील शाळेने समितीची स्थापना करण्याकडे दुर्लक्ष केल्याने वाहतूक विभागाकडे समितीची नोंदच नाही. त्यामुळे शालेय बसमधून विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक असल्याचे दिसून येत आहे.पालकविभाग अनभिज्ञदिवसेंदिवस विविध शाळा विद्यार्थ्यांना व पालकांना आकर्षित करण्यासाठी शाळेमध्ये अनेक सुविधा करीत आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गरजेच्या असणाऱ्या परिवहन समितीच्या स्थापनेकडे कानाडोळा करीत आहेत. याबाबत पालक अनभिज्ञ असल्याने तेसुद्धा समिती स्थापनेबाबत शाळांना विचारणा करीत नाही. परिणामी राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाकडे शाळा अधिकाºयांमुळे हरताळ फासली जात आहे.