शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

६ हजार ४०० अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

By admin | Updated: February 13, 2017 00:34 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी १५ पंचायत समित्याअंतर्गत ६ हजार ४०० मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांना रविवारी प्रशिक्षण देण्यात आले.

२६९ वाहनांची बुकिंग : ६३ नक्षल प्रभावित मतदान केंद्र, २ हजार ७९८ पोलिसांची ड्युटी चंद्रपूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी १५ पंचायत समित्याअंतर्गत ६ हजार ४०० मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांना रविवारी प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना इव्हीएम मशिनवर मतदारांचे मतदान कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चंद्रपूरचे प्रशिक्षण जिल्हा स्टेडियम येथील बॅडमिंटन सभागृहात देण्यात आले. जिल्ह्यातील १७८ मतदान केंद्र संवेदनशील समजले जातात. तर पाच तालुक्यांमध्ये ६३ केंद्र नक्षल प्रभावित आहेत. ही निवडणूक पार पाडण्यासाठी १५ पंचायत समित्याअंतर्गत १५ निवडणूक पथके गठित करण्यात आली आहेत. त्यानुसार, पंचायत समित्यानिहाय १ हजार ६०० मतदान केंद्राध्यक्ष आणि ४ हजार ८०० मतदान अधिकाऱ्यांना रविवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले. त्यामध्ये मतदान करण्यास आलेल्या मतदारांना निवडणूक ओळख पटविण्यापासून मतदान चिठ्ठी देणे, मतदाराने मतदान केल्यानंतर इव्हीएम मशिनकडे लक्ष ठेवणे आदी सूचना देण्यात आल्या. तसेच मतदारांकडे फोटो ओळखपत्र नसल्यास फोटो असलेली मतदार चिठ्ठी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबतही मतदान केंद्राध्यक्षांना मार्गदर्शन करण्यात आले.मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता त्यांच्या पोलिंग पार्ट्या तयार करून त्या-त्या पार्ट्यांचे साहित्य वाटप केले जाणार आहे. त्यांची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अर्जुन चिखले यांच्याकडे तालुक्यातील निवडणूक अधिकाऱ्यांनी एसटी बसेस, शासकीय व खासगी जीप, पोलीस कुमक आणि इव्हीएम मशिनची मागणी नोंदविली आहे. त्यामध्ये बल्लारपूर, मूल, सिंदेवाही येथील मागणी न आल्याने त्यांचे काम रेंगाळले आहे. (प्रतिनिधी) १८० एसटी बसेस लागणारमतदान केंद्रांवर पोलिंग पार्ट्या पोहोचविण्याकरिता १८० एसटी बसेस लागणार आहेत. काही केंद्रांवर जाण्याकरिता एस.टी. बस उपयुक्त नाही. ते लक्षात घेऊन ९६ जीपची गरज पडणार आहे. त्यामध्ये पाच खासगी जीप बुक करण्यात आल्या आहेत. मतदान साहित्यासाठी नऊ ट्रकची मागणी करण्यात आली आहे. या सर्व वाहनांमध्ये पोलिसांच्या वाहनांचा समावेश नाही. १७८ संवेदनशील मतदान केंद्रजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ११ लाख ५७ हजार ७१९ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यांच्याकरिता १ हजार ४४९ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी १७८ केंद्र संवेदनशील आहे. तर जिल्हा निवडणूक अधिकारी आशुतोष सलील यांनी ६३ केंद्र नलक्ष प्रभावित घोषित केले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ३२ केंद्र जीवती तालुक्यातील आहेत. गोंडपिपरी १४, राजुरा १०, कोरपना ४ आणि पोंभुर्णा तालुक्यात ३ केंद्र नलक्ष प्रभावित आहेत. १ हजार ४४९ मतदान केंद्रांवर २ हजार ७९८ पोलिसांच्या ड्युटी लावण्यात आल्या आहेत.