शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

६ हजार ४०० अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

By admin | Updated: February 13, 2017 00:34 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी १५ पंचायत समित्याअंतर्गत ६ हजार ४०० मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांना रविवारी प्रशिक्षण देण्यात आले.

२६९ वाहनांची बुकिंग : ६३ नक्षल प्रभावित मतदान केंद्र, २ हजार ७९८ पोलिसांची ड्युटी चंद्रपूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी १५ पंचायत समित्याअंतर्गत ६ हजार ४०० मतदान केंद्राध्यक्ष व अधिकाऱ्यांना रविवारी प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना इव्हीएम मशिनवर मतदारांचे मतदान कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. चंद्रपूरचे प्रशिक्षण जिल्हा स्टेडियम येथील बॅडमिंटन सभागृहात देण्यात आले. जिल्ह्यातील १७८ मतदान केंद्र संवेदनशील समजले जातात. तर पाच तालुक्यांमध्ये ६३ केंद्र नक्षल प्रभावित आहेत. ही निवडणूक पार पाडण्यासाठी १५ पंचायत समित्याअंतर्गत १५ निवडणूक पथके गठित करण्यात आली आहेत. त्यानुसार, पंचायत समित्यानिहाय १ हजार ६०० मतदान केंद्राध्यक्ष आणि ४ हजार ८०० मतदान अधिकाऱ्यांना रविवारी निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण दिले. त्यामध्ये मतदान करण्यास आलेल्या मतदारांना निवडणूक ओळख पटविण्यापासून मतदान चिठ्ठी देणे, मतदाराने मतदान केल्यानंतर इव्हीएम मशिनकडे लक्ष ठेवणे आदी सूचना देण्यात आल्या. तसेच मतदारांकडे फोटो ओळखपत्र नसल्यास फोटो असलेली मतदार चिठ्ठी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबतही मतदान केंद्राध्यक्षांना मार्गदर्शन करण्यात आले.मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता त्यांच्या पोलिंग पार्ट्या तयार करून त्या-त्या पार्ट्यांचे साहित्य वाटप केले जाणार आहे. त्यांची पूर्वतयारी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अर्जुन चिखले यांच्याकडे तालुक्यातील निवडणूक अधिकाऱ्यांनी एसटी बसेस, शासकीय व खासगी जीप, पोलीस कुमक आणि इव्हीएम मशिनची मागणी नोंदविली आहे. त्यामध्ये बल्लारपूर, मूल, सिंदेवाही येथील मागणी न आल्याने त्यांचे काम रेंगाळले आहे. (प्रतिनिधी) १८० एसटी बसेस लागणारमतदान केंद्रांवर पोलिंग पार्ट्या पोहोचविण्याकरिता १८० एसटी बसेस लागणार आहेत. काही केंद्रांवर जाण्याकरिता एस.टी. बस उपयुक्त नाही. ते लक्षात घेऊन ९६ जीपची गरज पडणार आहे. त्यामध्ये पाच खासगी जीप बुक करण्यात आल्या आहेत. मतदान साहित्यासाठी नऊ ट्रकची मागणी करण्यात आली आहे. या सर्व वाहनांमध्ये पोलिसांच्या वाहनांचा समावेश नाही. १७८ संवेदनशील मतदान केंद्रजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ११ लाख ५७ हजार ७१९ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. त्यांच्याकरिता १ हजार ४४९ मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी १७८ केंद्र संवेदनशील आहे. तर जिल्हा निवडणूक अधिकारी आशुतोष सलील यांनी ६३ केंद्र नलक्ष प्रभावित घोषित केले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ३२ केंद्र जीवती तालुक्यातील आहेत. गोंडपिपरी १४, राजुरा १०, कोरपना ४ आणि पोंभुर्णा तालुक्यात ३ केंद्र नलक्ष प्रभावित आहेत. १ हजार ४४९ मतदान केंद्रांवर २ हजार ७९८ पोलिसांच्या ड्युटी लावण्यात आल्या आहेत.