शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

पूल दबल्याने वाहतूक बंद

By admin | Updated: April 6, 2015 01:19 IST

मूल तालुका मुख्यालयाशी जोडणाऱ्या भेजगावजवळील उमा नदीवरील पूल दबल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला

बससेवा बंद : नागरिक, विद्यार्थ्यांना त्रास; बांधकाम विभागाचे दुर्लक्षभेजगाव : मूल तालुका मुख्यालयाशी जोडणाऱ्या भेजगावजवळील उमा नदीवरील पूल दबल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. परिणामी या मार्गावरील परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.पुलाला मधोमध भेगा जाऊन पूल दबला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे. भेजगाव व हळदी या दोन गावांच्या सीमेवरून वाहणाऱ्या उमा नदीवर जवळपास ३० वर्षापूर्वी पूल बांधण्यात आले. मात्र दरवर्षीच्या पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली राहत असल्याने मोठमोठे भगदाड पडले आहेत. दरवर्षी बांधकाम विभागाकडून पुलाची डागडुगी करून रस्ता मोकळा करून दिला जाते. मात्र यावेळी भर उन्हाळ्यात पूल दबला असून जि.प. बंधकाम विभागाने पूल दुरूस्तीच्या कोणत्याही हालचाली न केल्याने नागरिकांत रोष पसरला आहे. ऐन परीक्षेच्या कालावधीतच पूल दबल्याने वाहतूक बंद झाली. याचा त्रास महाविद्यालयीन युवक-युवतींना सोसावा लागत आहे.मूल हे तालुक्याचे ठिकाण असल्याने भेजगाव परिसरातील विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरिता मूल येथे जातात. मात्र पूल दबल्याने बसफेऱ्या बंद आहेत. पुलावरून वाहतूक करताना केव्हाही मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चार-पाच किमी पायदळ जाऊन समोर आॅटोनी प्रवास करावा लागत आहे. यात विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात असून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.भेजगाव परिसरातील १५ गावांना या पूलाने तालुक्याला जोडले आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. मात्र लोकप्रतिनिधींची पोकळ आश्वासने व प्रशासनाच्या दुर्लक्षीतपणाचे ग्रहण या पुलाला लागल्याने या रस्त्यावरील वाहतूक आता बंद पडली आहे.गेल्या कित्येक दिवसांपासून पूलाची उंची वाढविण्याची मागणी आहे. मात्र या पुलाची उंची वाढलेली नाही.बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या पुलाची दुरूस्ती तत्काळ करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)