शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
2
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
4
छांगूर बाबाची हुशारी, मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन नाही
5
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
6
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
7
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
8
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
9
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
10
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
11
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
12
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
13
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
14
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
15
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
16
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
17
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
18
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
19
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
20
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?

वाहनाने कापूस विक्रीला नेण्यासाठी वाहतूक दंड

By admin | Updated: December 28, 2016 01:56 IST

आधीच दुष्काळाच्या गर्गेत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कापसाला जेमतेम दर मिळत आहे. त्यातही रोखीने

शेतकरी त्रस्त : पोलीस प्रशासनाची कारवाई, भाव नाही अन् चुकारेही नाही वरोरा : आधीच दुष्काळाच्या गर्गेत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कापसाला जेमतेम दर मिळत आहे. त्यातही रोखीने चुकारा नाही अशा अवस्थेत सापडलेल्या शेतकऱ्यांना वाहनाने कापूस विक्रीला नेताना वाहतूक पोलिसांकडून दंड वसूल केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत रोष पसरला असून पोलीस विभागाने ही कारवाई थांबवावी, अशी मागणी होत आहे. बैलबंडीने कापूस विक्रीला नेण्यासाठी दोन व्यक्ती व बैलांसह ४० ते ४५ किमी अंतर पार करताना शेतकऱ्यांना मोठी कसरत होते. यामध्ये वेळ तसेच खर्चही अधिक येतो. त्यामुळे अनेक शेतकरी आपला कापूस वाहनाने बाजारपेठेमध्ये नेत आहे. वाहनाच्या किराया द्यावा लागत असल्याने शेतकरी अधिकाधिक कापूस वाहनात कसा भरता येईल, याचा प्रयत्न करीत असतो. मात्र राज्य तसेच इतर मार्गावर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून वाहनाला पकडून दंड वसूल केला जात आहे. दंडाची रक्कम शेतकऱ्याला भरावी लागत असून शेतकरी त्रस्त झाले आहेत. वाहतुकीदरम्यान कापसाचे वाहन बाजूला लावून तपासणी सुरू केली जाते. यात बहुतांश वेळी दंड आकारल्या जातो. हा दंड शेतकऱ्यांना वाहनाच्या किरायासोबत द्यावा लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वाहनधारक रस्त्यावरील वाहतूक दंडाच्या रकमेसंबधी तोंडी करारनामा शेतकऱ्यासोबत करीत असल्याने सदर दंड शेतकऱ्यांना बसत असते. अलिकडे वरोरा परिसरात कापूस वाहतूक करणाऱ्या वाहनास अधिक दंड ठोठाविणे सुरू असल्याचे दिसून येते. श्रमाने पिकविलेल्या कापसाला उत्पादन खर्चा एवढा दर नाही, रोखीने चुकारा नाही, त्यातच वाहतूक दंडाचाही भुर्दंड सहन करावा लागत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी तुर्तास हवालदिल झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)