शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

वाहनाने कापूस विक्रीला नेण्यासाठी वाहतूक दंड

By admin | Updated: December 28, 2016 01:56 IST

आधीच दुष्काळाच्या गर्गेत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कापसाला जेमतेम दर मिळत आहे. त्यातही रोखीने

शेतकरी त्रस्त : पोलीस प्रशासनाची कारवाई, भाव नाही अन् चुकारेही नाही वरोरा : आधीच दुष्काळाच्या गर्गेत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या कापसाला जेमतेम दर मिळत आहे. त्यातही रोखीने चुकारा नाही अशा अवस्थेत सापडलेल्या शेतकऱ्यांना वाहनाने कापूस विक्रीला नेताना वाहतूक पोलिसांकडून दंड वसूल केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत रोष पसरला असून पोलीस विभागाने ही कारवाई थांबवावी, अशी मागणी होत आहे. बैलबंडीने कापूस विक्रीला नेण्यासाठी दोन व्यक्ती व बैलांसह ४० ते ४५ किमी अंतर पार करताना शेतकऱ्यांना मोठी कसरत होते. यामध्ये वेळ तसेच खर्चही अधिक येतो. त्यामुळे अनेक शेतकरी आपला कापूस वाहनाने बाजारपेठेमध्ये नेत आहे. वाहनाच्या किराया द्यावा लागत असल्याने शेतकरी अधिकाधिक कापूस वाहनात कसा भरता येईल, याचा प्रयत्न करीत असतो. मात्र राज्य तसेच इतर मार्गावर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून वाहनाला पकडून दंड वसूल केला जात आहे. दंडाची रक्कम शेतकऱ्याला भरावी लागत असून शेतकरी त्रस्त झाले आहेत. वाहतुकीदरम्यान कापसाचे वाहन बाजूला लावून तपासणी सुरू केली जाते. यात बहुतांश वेळी दंड आकारल्या जातो. हा दंड शेतकऱ्यांना वाहनाच्या किरायासोबत द्यावा लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वाहनधारक रस्त्यावरील वाहतूक दंडाच्या रकमेसंबधी तोंडी करारनामा शेतकऱ्यासोबत करीत असल्याने सदर दंड शेतकऱ्यांना बसत असते. अलिकडे वरोरा परिसरात कापूस वाहतूक करणाऱ्या वाहनास अधिक दंड ठोठाविणे सुरू असल्याचे दिसून येते. श्रमाने पिकविलेल्या कापसाला उत्पादन खर्चा एवढा दर नाही, रोखीने चुकारा नाही, त्यातच वाहतूक दंडाचाही भुर्दंड सहन करावा लागत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी तुर्तास हवालदिल झाला आहे. (तालुका प्रतिनिधी)