शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पारंपरिक गोणपाट व्यवसाय डबघाईस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:45 IST

शेतात मळणी करून धान्य घरी आणण्यासाठी वापरात येणारा ‘गोणपाट’ निर्मितीचा पोंंभूर्णा येथील व्यवसाय दुर्लक्षितपणामुळे संकटात सापडला आहे.

ठळक मुद्देशासनाने लक्ष द्यावे : तुटपुंज्या गुंतवणुकीतूनही सुरू आहे ‘गोणपाट’ व्यवसाय

विराज मुरकुटे ।लोकमत न्यूज नेटवर्कपोंभूर्णा : शेतात मळणी करून धान्य घरी आणण्यासाठी वापरात येणारा ‘गोणपाट’ निर्मितीचा पोंंभूर्णा येथील व्यवसाय दुर्लक्षितपणामुळे संकटात सापडला आहे.पेशव्यांच्या काळापासून नागपूर, सोलापूर, जालना, शहापूर ही ठिकाणे वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. या उद्योगांना स्वातंत्र्यपूर्व काळात राजाश्रय होता. परंतु ब्रिटिशांच्या काळात हे हस्त व्यवसाय बसले. ब्रिटिशांच्या आकर्षक वस्तू व कमी किंमत यामुळे स्थानिक कारागिरांच्या वस्तूला उठाव राहिला नाही. तरीही स्थानिक पातळीवर चालणाऱ्या दैनंदिन व्यवसायात उपयोगी पडणाºया वस्तूंची निर्मिती मात्र ग्रामीण भागात सुरूच होती. पोंभूर्णा येथे हातमाग मांगठा हा पारंपरिक व्यवसाय स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरूच आहे.१९३० ते १९४० च्या दशकात अनेक दलित कुटुंबांनी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून परंपरागत लुगडे विनण्याचा घरगुती व्यवसाय सुरू केला. त्यानंतर ‘नेवार’ विनणे सुरू झाले. पण काही कालावधीने तेही बंद झाले. त्यानंतर गोणपाट तयार करण्याचे व्यवसाय येथे सुरू झाले. पिकाची कापणी, शेतात मळणी करून रास घरी आणण्यासाठी गोणपाटाचा उपयोग केला जातो. बैलगाडीत मावेल एवढी जाड कापडाची एक मोठी पिशवीच असते. तिला गोणपाट म्हणतात. तिच्या साहाय्याने धान्य ढोलीत सुरक्षित ठेवले जाते. पण आता अनेक शेतकऱ्यांनी मळणीच्या प्रक्रिया बदलवल्याने गोणपाट वापराऐवजी पोत्यांचा वापर सुरू झाला आहे. त्यामुळे हा व्यवसाय संकटात सापडला आहे. गोणपाट तयार करण्याच्या कामात दलित समाजाची तिसरी पिढी गुंतली आहे. चार महिन्यांची शेती केल्यानंतर उर्वरित काळात गोणपाट तयार करतात. दलित समाजाची ५० कुटुंबे या व्यवसायात गुंतली आहेत.अनुदान नाही, कर्जही नाहीअजूनही विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, आंध्रातील काही सीमावर्ती भागात या गोणपाटाची विक्री चालू आहे. उन्हाळाभर हे कार्य चालू असते. परंतु साहित्याच्या किंमतीत वाढ झाल्याने हा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. विदर्भात पोंभूर्णा हे तालुक्याचे गाव ‘गोणपाट’ निर्मितीसाठी प्रसिद्द असले तरी शासनाकडून कोणत्याच प्रकारची आर्थिक मदत या व्यवसायाला मिळत नसून बँकसुद्धा कर्ज देत नाही.