शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

भूमिअभिलेखची गावठाण नगर भूमापन मोहीम

By admin | Updated: August 9, 2014 01:37 IST

सध्या अस्तित्वात असलेल्या भूखंडाचे मालकी हक्क स्पष्ट करण्यासाठी जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने गावठाण नगर भूमापन मोहीम..

चंद्रपूर : सध्या अस्तित्वात असलेल्या भूखंडाचे मालकी हक्क स्पष्ट करण्यासाठी जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने गावठाण नगर भूमापन मोहीम हाती घेण्यात आली असून यासाठी प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमान्वये दोन हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या कोणत्याही गावाच्या, नगराच्या किंवा शहराच्या जागेस कलम १२६ च्या उपबंधान्वये भूमापन करण्याची तरतूद लागू करण्यात आली आहे. प्रशासकीय, राजकोषीय व कायदा हे तीन उद्देश साध्य करण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येणार आहे.बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव व वरोरा तालुक्यातील एकार्जूना या गावातील गावठाण भूमापन हद्द सर्वे नंबरच्या सुचीनुसार पडताळणीसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत.टपाल, पोलीस, विद्युत, स्वच्छता व जनगणना आदी खाती व नगरपालिका अगर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या उपयोगासाठी, शहरातील रस्ते, घरे व कार्यालय आदी प्रदेश वर्णानात्मक तपशील दर्शविणारे अचुक नकाशे पुरविणे हा प्रशासकीय उद्देश आहे. पाणी पुरवठा ड्रेनेज, ट्रॉमवेज, विद्युतीकरण, गॅस व दुरध्वनी कनेक्शन या योजनासाठी परिपूर्ण अशा मोठ्या परिमाणांतील नकाशांची आवश्यकता असते. तर शैक्षणिक संस्था, वैद्यकीय मदत, अग्निशामक उपाय व जकात वसुली या सर्व गोष्टी शहराच्या अचुक नकाशावर अवलंबून असतात. हे नकाशे या मोहिमेत अद्यावत होणार आहेत.जमिनीपासून येणे असलेल्या महसुलाची खात्री करणे आणि भविष्यातील महसुलाचे विकासाकडे लक्ष देणे तसेच सार्वजनिक जमिनीचे अतिक्रमणापासून संरक्षण करणे आणि त्यांची विक्री अथवा चोरून विनियोग होऊ न देणे हा राजकोषीय उद्देश आहे.सध्या अस्तित्वात असलेल्या भूखंडाचे मालकी हक्क स्पष्ट करणे व जे योग्य असतील त्यांना पाठिंबा देणे व त्यांचे उत्तम प्रकारे निर्धारीकरण करणे व जे अयोग्य आहे ते काढून टाकणे मिळकत धारकामधील गुंतागुतीचे दावे थांबविणे. खाजगी दावेदार व स्थानिक संस्था किंवा सरकार यांच्यामधील हक्काबाबतच्या शंकाचे निरसन करणे तसेच त्यांच्यामधील वरीलप्रमाणे होणारे संभाव्य दावे थांबविणे हा कायदेशीर उद्देश आहे.जिल्ह्यातील भूमिअभिलेख विभागामार्फत सन २०११ च्या जनगणने अन्वये २००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले १५ गावांची नगर भूमापन योजना लागू करण्यासाठी चंद्रपूर तालुक्यातील ताडाळी, भद्रावती- घोडपेठ, वरोरा- एकार्जुना, चिमूर- वडाळा पैकू, ब्रह्मपुरी- उदापूर, नागभीड- कानपा, सिंदेवाही- लोणवाही, मूल- फिस्कुटी, सावली- व्याहाड खुर्द, गोंडपिपरी- वढोली, पोंभूर्णा- नवेगाव मोरे, बल्लारपूर- पळसगाव, राजुरा- देवाडा, कोरपना- कोरपना व जिवती- पाटण आदी गावांची निवड करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)