शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

मशागत आटोपली, मृगधारांची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 22:31 IST

शेतातील नांगरणी, वखरणी आदी मान्सूनपूर्व मशागतीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांना आता केवळ पावसाची आस लागली आहे. शुक्रवारपासून मृग नक्षत्र सुरू होणार असल्याने मृग बरसेल, अशी शेतकºयांना अपेक्षा आहे. दुसरीकडे यंदा कोणत्या प्रकारचे वाण पेरायचे यासाठी शेतकºयांची बाजारात बी-बियाणांची चाचपणी सुरू आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना चिंता : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरणार का ?

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतातील नांगरणी, वखरणी आदी मान्सूनपूर्व मशागतीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांना आता केवळ पावसाची आस लागली आहे. शुक्रवारपासून मृग नक्षत्र सुरू होणार असल्याने मृग बरसेल, अशी शेतकºयांना अपेक्षा आहे. दुसरीकडे यंदा कोणत्या प्रकारचे वाण पेरायचे यासाठी शेतकºयांची बाजारात बी-बियाणांची चाचपणी सुरू आहे.यावर्षी शंभर टक्के समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहे. आगामी काळात पीक निश्चितीच्या भावनेने खरीप हंगामातील बी-बियाणे, रासायनिक खते आदींच्या खरेदीसाठी शेतकरी आर्थिक उपाययोजना करण्यात गुंतले आहेत. डिझेलच्या वाढत्या किमतीने ट्रॅक्टरद्वारे शेत नांगरणी करणे यंदा महाग झाले आहे. यातून सावरत शेतकºयांनी आपल्या ऐपतीप्रमाणे बैल किंवा ट्रॅक्टरने मशागत करून पेरणीस सज्ज करून ठेवले आहे.मात्र बाजारात बियाण्यांचे भाव वधारले असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळे खिशाला परवडेल अशा बियाणांची चाचपणी सुरू आहे. मागील वर्षी गुलाबी बोंडअळीने पºहाटी उद्ध्वस्त झाली. तर मावा-तुडतुडा रोगाने धानपीकही हातून गेले. त्यामुळे या सर्व गोष्टी तपासूनच यंदा बियाणे खरेदी करण्याच्या मनस्थितीत शेतकरी आहेत. अशा परिस्थितीवर मात करीत केवळ यावर्षी चांगला पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी धावपळ करीत आहे. मृगधारा बरसल्यास पेरणीच्या कामांना धडाक्यात प्रारंभ होणार आहे. सध्या जिल्ह्यात पावसाचे वातावरण असले तरी अद्याप मोठा पाऊस झालेला नाही.पीक कर्जाची शेतकऱ्यांना प्रतीक्षायावर्षी शासनाने कर्जमाफी दिली. मात्र काही शेतकऱ्यांचा अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. तर ज्यांना कर्जमाफी मिळाली किंवा ज्यांचा सातबारा कोरा आहे, अशांनी पीक कर्जासाठी अर्ज केल्यानंतरही कर्ज मिळालेले नाही. शासनाने आॅन दी स्पॉट कर्ज वितरण करण्यासाठी सर्व तालुका मुख्यालयात मेळाव्याचे आयोजन केले. मात्र येथेही शेतकऱ्यांच्या हाती निराशाच आल्याने शेकडो शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहे.बोगस बियाण्यांची भीतीसध्या शासनाने बंदी घातलेल्या कापूस बीटी बियाण्यांची जिल्हाभरात विक्री सुरू आहे. कृषी विभागाने अनेक ठिकाणी धाडी टाकून लाखोंचे बियाणे जप्त केले. असाच प्रकार धान बियाण्यांच्या बाबतीतही घडण्याची शक्यता आहे. बोगस बियाण्यांची विक्री झाल्यास फसगत होण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.