शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
3
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
4
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
5
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
6
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
7
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
8
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
9
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
10
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
11
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
12
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
13
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
14
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
15
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
16
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
17
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
18
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
19
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
20
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!

मशागत आटोपली, मृगधारांची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 22:31 IST

शेतातील नांगरणी, वखरणी आदी मान्सूनपूर्व मशागतीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांना आता केवळ पावसाची आस लागली आहे. शुक्रवारपासून मृग नक्षत्र सुरू होणार असल्याने मृग बरसेल, अशी शेतकºयांना अपेक्षा आहे. दुसरीकडे यंदा कोणत्या प्रकारचे वाण पेरायचे यासाठी शेतकºयांची बाजारात बी-बियाणांची चाचपणी सुरू आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना चिंता : हवामान खात्याचा अंदाज खरा ठरणार का ?

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतातील नांगरणी, वखरणी आदी मान्सूनपूर्व मशागतीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. शेतकऱ्यांना आता केवळ पावसाची आस लागली आहे. शुक्रवारपासून मृग नक्षत्र सुरू होणार असल्याने मृग बरसेल, अशी शेतकºयांना अपेक्षा आहे. दुसरीकडे यंदा कोणत्या प्रकारचे वाण पेरायचे यासाठी शेतकºयांची बाजारात बी-बियाणांची चाचपणी सुरू आहे.यावर्षी शंभर टक्के समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहे. आगामी काळात पीक निश्चितीच्या भावनेने खरीप हंगामातील बी-बियाणे, रासायनिक खते आदींच्या खरेदीसाठी शेतकरी आर्थिक उपाययोजना करण्यात गुंतले आहेत. डिझेलच्या वाढत्या किमतीने ट्रॅक्टरद्वारे शेत नांगरणी करणे यंदा महाग झाले आहे. यातून सावरत शेतकºयांनी आपल्या ऐपतीप्रमाणे बैल किंवा ट्रॅक्टरने मशागत करून पेरणीस सज्ज करून ठेवले आहे.मात्र बाजारात बियाण्यांचे भाव वधारले असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्यामुळे खिशाला परवडेल अशा बियाणांची चाचपणी सुरू आहे. मागील वर्षी गुलाबी बोंडअळीने पºहाटी उद्ध्वस्त झाली. तर मावा-तुडतुडा रोगाने धानपीकही हातून गेले. त्यामुळे या सर्व गोष्टी तपासूनच यंदा बियाणे खरेदी करण्याच्या मनस्थितीत शेतकरी आहेत. अशा परिस्थितीवर मात करीत केवळ यावर्षी चांगला पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी धावपळ करीत आहे. मृगधारा बरसल्यास पेरणीच्या कामांना धडाक्यात प्रारंभ होणार आहे. सध्या जिल्ह्यात पावसाचे वातावरण असले तरी अद्याप मोठा पाऊस झालेला नाही.पीक कर्जाची शेतकऱ्यांना प्रतीक्षायावर्षी शासनाने कर्जमाफी दिली. मात्र काही शेतकऱ्यांचा अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. तर ज्यांना कर्जमाफी मिळाली किंवा ज्यांचा सातबारा कोरा आहे, अशांनी पीक कर्जासाठी अर्ज केल्यानंतरही कर्ज मिळालेले नाही. शासनाने आॅन दी स्पॉट कर्ज वितरण करण्यासाठी सर्व तालुका मुख्यालयात मेळाव्याचे आयोजन केले. मात्र येथेही शेतकऱ्यांच्या हाती निराशाच आल्याने शेकडो शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहे.बोगस बियाण्यांची भीतीसध्या शासनाने बंदी घातलेल्या कापूस बीटी बियाण्यांची जिल्हाभरात विक्री सुरू आहे. कृषी विभागाने अनेक ठिकाणी धाडी टाकून लाखोंचे बियाणे जप्त केले. असाच प्रकार धान बियाण्यांच्या बाबतीतही घडण्याची शक्यता आहे. बोगस बियाण्यांची विक्री झाल्यास फसगत होण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.