शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

टोर्इंगची दबंगगिरी

By admin | Updated: January 7, 2015 22:49 IST

दररोज हजारो प्रवासी ये-जा करीत असलेल्या चंद्रपूर बसस्थानावरील सुरक्षेचा प्र्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने अनेक प्रवाशांना, त्यांच्या कुटुंबीयांना आपले वाहन

वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे साईनाथ कुचनकार - चंद्रपूरदररोज हजारो प्रवासी ये-जा करीत असलेल्या चंद्रपूर बसस्थानावरील सुरक्षेचा प्र्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने अनेक प्रवाशांना, त्यांच्या कुटुंबीयांना आपले वाहन रस्त्याच्या कडेला पार्क करावे लागते. रस्त्यावरील वाहनाच्या सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकला आहे. अशावेळी वाहन धारक आपले वाहन बसस्थानकातील मोकळ्या जागेमध्ये ठेवतो. मात्र टोर्इंगवरील कर्मचारी येऊन वाहन उचलून नेतात. अनेकवेळा मानसिक त्रास होतो. याला जबाबदार बसस्थानक व्यवस्थापक की, वाहतूक पोलीस हा प्रश्न कायम आहे. बसस्थानकासह शहरातील इतर परिसरात किमान वाहनतळ उभे करून द्यावे, त्यानंतर चूक झाल्यास खुशाल वाहन उचलून न्यावे, अशा प्रतिक्रिया आता सामान्य नागरिक व्यक्त करीत आहे.दिवसेंदिवस चंद्रपूर शहरात वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र त्या तुलनेत वाहनतळ नसल्याने हा प्रश्न गंभीर होत आहे. कोणतीही व्यवस्था नसताही वाहतूक विभागाकडून वाहनधारकांना अक्षरश: वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथील बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी ‘नो पार्किंग’ असे फलक लावून बसस्थानक प्रशासन मोकळे झाले आहे. मात्र येणारे प्रवाशी आणि त्यांना आणून सोडणारे नागरिक आपले वाहन कुठे ठेवणार याचा कुठेही विचार केला नाही.बसस्थानकाच्या अगदी समोर असलेल्या रस्त्यावर वाहन पार्क करावे, असे उत्तर दिले जाते. मात्र येथेही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने वाहनधारकांची चांगलीच पंचायत होत आहे. अशावेळी बहुतांश वाहनधारक बसस्थानाच्या आतील बाजूमध्ये असलेल्या मोकळ्या जागेवर वाहन पार्क करतात. मात्र वाहतूक विभागाचे कर्मचारी येथे येऊन वाहन घेऊन जातात. हा नित्यक्रम मागील वर्षभरापासून सुरु आहे. दररोज नवे वाहन धारक येतात. विशेष म्हणजे, वाहतूक विभागातील टोर्इंग वाहनावरील कर्मचारी बसस्थानक परिसरात असलेले वाहन उचलून कारवाई करतात. केवळ पाच ते सात मिनिटासाठी दोनशे ते तिनशे रुपयांचा आर्थिक भुर्दंड तथा मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रथम वाहनतळ उपलब्ध करून द्या, नंतर कारवाई करा, असे प्रवाशी तसेच नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र याकडे बसस्थानक प्रशासन तथा वाहतूक पोलीस ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. केवळ कारवाई करून आपली जबाबदारी पार पाडणारे वाहतूक पोलिसातील टोर्इंगमधील कर्मचारी प्रवाशांची अक्षरश: अरेरावी करतात. नियमाला बगल देत वाहतूक पोलिसात काम करत असल्याचा आव आणून प्रवाशी तथा वाहनधारकांना वाट्टेल ते बोलतात. मात्र या कर्मचाऱ्यांना गप्प ठेवण्याचे साधे औचित्य वाहतूक पोलीस दाखवित नाही. मागील वर्षभरापासून हा प्रकार सुरु आहे.टोर्इंग वाहन घेऊन यायचे आणि दुचाकी उचलून न्यायच्या या प्रकारामुळे वाहनधारक बेजार झाले आहे.