शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

टोर्इंगची दबंगगिरी

By admin | Updated: January 7, 2015 22:49 IST

दररोज हजारो प्रवासी ये-जा करीत असलेल्या चंद्रपूर बसस्थानावरील सुरक्षेचा प्र्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने अनेक प्रवाशांना, त्यांच्या कुटुंबीयांना आपले वाहन

वाहतूक व्यवस्थेचे धिंडवडे साईनाथ कुचनकार - चंद्रपूरदररोज हजारो प्रवासी ये-जा करीत असलेल्या चंद्रपूर बसस्थानावरील सुरक्षेचा प्र्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने अनेक प्रवाशांना, त्यांच्या कुटुंबीयांना आपले वाहन रस्त्याच्या कडेला पार्क करावे लागते. रस्त्यावरील वाहनाच्या सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकला आहे. अशावेळी वाहन धारक आपले वाहन बसस्थानकातील मोकळ्या जागेमध्ये ठेवतो. मात्र टोर्इंगवरील कर्मचारी येऊन वाहन उचलून नेतात. अनेकवेळा मानसिक त्रास होतो. याला जबाबदार बसस्थानक व्यवस्थापक की, वाहतूक पोलीस हा प्रश्न कायम आहे. बसस्थानकासह शहरातील इतर परिसरात किमान वाहनतळ उभे करून द्यावे, त्यानंतर चूक झाल्यास खुशाल वाहन उचलून न्यावे, अशा प्रतिक्रिया आता सामान्य नागरिक व्यक्त करीत आहे.दिवसेंदिवस चंद्रपूर शहरात वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र त्या तुलनेत वाहनतळ नसल्याने हा प्रश्न गंभीर होत आहे. कोणतीही व्यवस्था नसताही वाहतूक विभागाकडून वाहनधारकांना अक्षरश: वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथील बसस्थानक परिसरात ठिकठिकाणी ‘नो पार्किंग’ असे फलक लावून बसस्थानक प्रशासन मोकळे झाले आहे. मात्र येणारे प्रवाशी आणि त्यांना आणून सोडणारे नागरिक आपले वाहन कुठे ठेवणार याचा कुठेही विचार केला नाही.बसस्थानकाच्या अगदी समोर असलेल्या रस्त्यावर वाहन पार्क करावे, असे उत्तर दिले जाते. मात्र येथेही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने वाहनधारकांची चांगलीच पंचायत होत आहे. अशावेळी बहुतांश वाहनधारक बसस्थानाच्या आतील बाजूमध्ये असलेल्या मोकळ्या जागेवर वाहन पार्क करतात. मात्र वाहतूक विभागाचे कर्मचारी येथे येऊन वाहन घेऊन जातात. हा नित्यक्रम मागील वर्षभरापासून सुरु आहे. दररोज नवे वाहन धारक येतात. विशेष म्हणजे, वाहतूक विभागातील टोर्इंग वाहनावरील कर्मचारी बसस्थानक परिसरात असलेले वाहन उचलून कारवाई करतात. केवळ पाच ते सात मिनिटासाठी दोनशे ते तिनशे रुपयांचा आर्थिक भुर्दंड तथा मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रथम वाहनतळ उपलब्ध करून द्या, नंतर कारवाई करा, असे प्रवाशी तसेच नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र याकडे बसस्थानक प्रशासन तथा वाहतूक पोलीस ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. केवळ कारवाई करून आपली जबाबदारी पार पाडणारे वाहतूक पोलिसातील टोर्इंगमधील कर्मचारी प्रवाशांची अक्षरश: अरेरावी करतात. नियमाला बगल देत वाहतूक पोलिसात काम करत असल्याचा आव आणून प्रवाशी तथा वाहनधारकांना वाट्टेल ते बोलतात. मात्र या कर्मचाऱ्यांना गप्प ठेवण्याचे साधे औचित्य वाहतूक पोलीस दाखवित नाही. मागील वर्षभरापासून हा प्रकार सुरु आहे.टोर्इंग वाहन घेऊन यायचे आणि दुचाकी उचलून न्यायच्या या प्रकारामुळे वाहनधारक बेजार झाले आहे.