शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

रोजगाराच्या नव्या संधी देणार पोंभुर्णातील टुथपिक केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 23:04 IST

राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पोंभुर्णा येथे टूथपिक उत्पादन केंद्र तसेच बांबू हॅन्डीक्राफ्ट अ‍ॅण्ड आर्ट युनिट उभारण्यात आले. या दोन्ही प्रकल्पांमुळे जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री करणार बांबू हॅन्डीक्राफ्ट युनिटचे शुक्रवारी लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने पोंभुर्णा येथे टूथपिक उत्पादन केंद्र तसेच बांबू हॅन्डीक्राफ्ट अ‍ॅण्ड आर्ट युनिट उभारण्यात आले. या दोन्ही प्रकल्पांमुळे जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. शुक्रवारी सकाळी ११ वाजता ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या वतीने सदर टूथपिक उत्पादन केंद्रासाठी टाटा ट्रस्टने सामाजिक दायित्वाअंतर्गत निधी उपलब्ध करून दिला बआहे. पोंभुर्णा येथे बांबू हॅन्डीक्रॉफ्ट अ‍ॅण्ड आर्ट युनिटच्या माध्यमातून परिसरातील युवक व महिलांना स्थानिक पातळीवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे टूथपिक उत्पादन केंद्राच्या माध्यमातून या भागात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. चिचपल्ली येथील केंद्रातूनही बांबूवर आधारित आधुनिक प्रशिक्षणाचे दालन सुरू झाले. अर्थ व वनमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते टूथपिक उत्पादन केंद्र व बांबू हॅन्डीक्राफ्ट अ‍ॅण्ड आर्ट युनिटचे लोकार्पण होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के. रेड्डी, मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, उपसभापती विनोद देशमुख, जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, माजी नगर पंचायत अध्यक्ष गजानन गोरंटीवार, नगर पंचायत अध्यक्ष श्वेता बनकर उपस्थित राहणार आहेत.वायफाय सुविधापोंभुर्णा येथील बसस्थानकाच्या बांधकामाचे भूमिपूजन तसेच वायफाय सुविधेचे लोकार्पणही होणार आहे. प्रवाशांना सर्व मूलभूत सोईसुविधा देण्यासाठी विविध योजना सुरू करण्यात येणार आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील जनतेला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी या योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.