शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

उद्याचा समृद्ध भारत बाल साहित्यिकांच्या डोळ्यात

By admin | Updated: January 23, 2017 00:36 IST

बालकांनी रचलेल्या साहित्यात पर्यावरणाचे महत्त्व, वनांचे संवर्धन, नद्यांचे शुद्धीकरण, वन्यप्राण्यांचे संवर्धन असे विषय येत आहेत.

शंकर विटणकर : चंद्रपुरात एक दिवसीय बाल साहित्य संमेलन चंद्रपूर (मिलिंद बोरकर स्मृती परिसर) : बालकांनी रचलेल्या साहित्यात पर्यावरणाचे महत्त्व, वनांचे संवर्धन, नद्यांचे शुद्धीकरण, वन्यप्राण्यांचे संवर्धन असे विषय येत आहेत. नदीमाय, झाडे लावा, ससोबा, हरीण आदी विषयांच्या कविता वाचून थक्क झालो आहे. उद्याचा समृद्ध भारत पाहायचा असेल तर तो या बाल साहित्यिकांच्या डोळ्यात पहा. त्यांना नीट समजून घ्या. त्यांची मने समृद्ध करा. भारत आपोआप समृद्ध होईल, असे प्रतिपादन नागपूर येथील बाल साहित्यिक शंकर विटणकर यांनी केले.सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंचच्या वतीने एक दिवसीय बाल साहित्य संमेलन-२०१७ स्थानिक मातोश्री विद्यालयात आयोजित करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षास्थानी शंकर विटणकर होते. संमेलनाचे उद्घाटन हिंदीच्या बाल साहित्यिक डॉ. सरताज बानो काजी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मंचावर स्वागताध्यक्ष मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजय बदखल, विशेष अतिथी म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, सामाजिक कार्यकर्ते संजय वैद्य आदी उपस्थित होते.विटणकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात ठिकठिकाणी बाल साहित्य संमेलने होऊ लागली आहेत. ही चांगली बाब आहे. टी.व्ही.वरही बाल साहित्याचे कार्यक्रम होत आहेत. अलीकडे शालेय पाठ्यपुस्तकात बालकांच्या कविता येत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सोनाली कुपरे या बालिकेची कविता बालभारतीने सहावीच्याच पाठ्यक्रमात घेतली आहे. बालकांमध्ये साहित्यासह विज्ञानादी निरनिराळ्या क्षेत्रात कार्य करण्याची प्रचंड उर्जा निर्माण होत आहे. साहित्य निर्मिती थोडी नाजूक व भावनिक बाब आहे. नाजूक धाग्यांनी मजबूत वस्त्र विणण्याचे हे कार्य आहे. कोवळ्या मनावर सुसंस्कार करणाऱ्या नितीमत्तेच्या गोष्टी मायाळू शब्दात सांगायच्या असतात. ती सर्व आव्हाने आजची बालके समर्थपणे पेलत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.यावेळी विटणकर यांनी आपली एक हिंदी बालकविता सादर केली. उद्घाटक डॉ. सरताज बानो काजी यांनी बाल साहित्यिकांचे कौतुक करून त्यांच्यातील उर्जा डोळे दीपवणारी असल्याचे सांगितले.संमेलचाची भूमिका सूर्यांशचे अध्यक्ष इर्फान शेख यांनी मांडली. संचालन सीमा पाटील-भसारकर यांनी केले. (प्रतिनिधी)