शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

खांडक्या बल्लारशहा राजाचे समाधीस्थळ दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : बल्लारपूर शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या वर्धा नदी तिरावरील ऐतिहासिक किल्ल्याएवढेच महत्त्व बल्लारशाहचे शेवटचे राजे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बल्लारपूर : बल्लारपूर शहराची ऐतिहासिक ओळख असलेल्या वर्धा नदी तिरावरील ऐतिहासिक किल्ल्याएवढेच महत्त्व बल्लारशाहचे शेवटचे राजे खांडक्या बल्लारशहा यांच्या बामणी मार्गावर असलेल्या समाधीस्थळाचेही आहे. परंतु, या समाधीस्थळाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे समाधी इमारतीवर गवत उगवले आहे.

ही समाधी वास्तू सुमारे पाचशे वर्षांपासून याठिकाणी आहे. इमारत लहान परंतु मजबूत आणि देखणी आहे. आदिवासी बांधवांचे हे श्रद्धास्थान आहे. चार-पाच वर्षांपूर्वी बल्लारपूर नगरपालिकेने लोकसहभागातून समाधी परिसरातील कचरा हटवून परिसर स्वच्छ केला होता तसेच समाधीस्थळ इमारतीची रंगरंगोटी केली होती. त्यानंतर मात्र इमारतीवर उगवणारे गवत काढून परिसर स्वच्छ करण्याची काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे इमारतीवर गवत उगवले आहेत. इमारतीवरील गवत दरवर्षी काढून परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. हे समाधीस्थळ रस्त्याच्या थोडे आत पेट्रोल पंपाच्या मागे आहे. त्यामुळे रस्त्यावरुन जाताना नजरेला पडत नाही. यामुळे बल्लारपूर-बामणी मुख्य मार्गावर समाधीस्थळ दिशादर्शक पाटी लावणे गरजेचे आहे. याकरिता जेसीज, रोटरी या सेवाभावी संस्थांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.