शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

चंद्रपूरकरांच्या वाहनांवर टोलचे ओझे

By admin | Updated: August 9, 2014 01:34 IST

टोलनाक्यांवरून होणाऱ्या वसुलीच्या सरकारी खेळात चंद्रपूरकरांसह विदर्भातील वाहनधारक नागरिक भरडले जात आहे.

चंद्रपूर : टोलनाक्यांवरून होणाऱ्या वसुलीच्या सरकारी खेळात चंद्रपूरकरांसह विदर्भातील वाहनधारक नागरिक भरडले जात आहे. राज्यातील बंद पडलेल्या अन्य टोल नाक्यांच्या वसुलीचा भार चंद्रपुरातील टोल नाक्यांवर सोपवून सरकारी तिजोरी भरण्याचा प्रकार सुरू झाल्याने जनतेमध्ये संताप व्यक्त होत आहे. राज्य सरकारने अलीकडे नऊ टोल नाके बंद केले आहे. त्या नाक्यांच्या माध्यमातून जमवणारी आवक बंद झाल्याने इतर टोल नाक्यांच्या माध्यमातून त्या रकमेच्या वसुलीची तरतुद केली आहे. चंद्रपूरलगतच्या ताडाळी येथील टोल नाक्याची नेहमी वाढणारी मुदत हे त्यातीलच उदाहरण असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात २०१३ मध्ये या टोल नाक्याची मुदत संपली होती. मात्र त्याला तीन वर्षांची मुदतवाढ देवून ती २०१६ पर्यंत वाढ करण्यात आली. राज्यातील नऊ टोलनाक्यांचाही भार ताडाळीतील नाक्यावर पडणार असल्याने २०१६ वरून या टोलनाक्याची मुदत २०२४ पर्यंत वाढविण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. या संदर्भातील माहितीनुसार, १९९८ मध्ये ताडाळी येथील टोल नाका सुरू करण्यात आला होता. मात्र २००० पर्यंत कसलीही वसुली न झाल्याचे सांगून कोणताही हिशेब सादर केला नव्हता. २००० या वर्षापासून २०१२ पर्यंतच्या सादर करण्यात आलेल्या हिशेबानुसार, ८८ कोटी रूपयांची वसुली अद्यापही बाकी असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर २०१३ च्या हिशेबामध्ये फक्त ५० कोटी २४ लाख रूपयांची वसुली झाल्याचे सांगून या टोल नाक्यावरील वसुलीची मुदत २०१६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)