शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

आजची शेती कर्जबाजारी व आत्महत्येस प्रवृत्त करणारी

By admin | Updated: June 2, 2017 00:38 IST

आजची शेती परवडणारी नसून शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारी व आत्महत्येस प्रवृत्त करणारी झाली आहे.

नरेश पुगलिया : कर्जमुक्तीसाठी बळीराजाने जागे व्हावेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आजची शेती परवडणारी नसून शेतकऱ्यांना कर्जबाजारी करणारी व आत्महत्येस प्रवृत्त करणारी झाली आहे. विदर्भातील शेतकरी सर्वाधिक कर्जबाजारी झाला आहे. यापूर्वीच्या सरकारने २००८ मध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन सातबारा कोरा केला होता. मागील तीन वर्षांत शेतमालाचे भाव कमालीचे घसरले. केंद्र सरकारने देशातील उद्योगपतींची दीड लाख कोटींचे कर्ज माफ केले. मग शेतकऱ्यांचे का नाही, असा सवाल करुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खा. नरेश पुगलिया यांनी शेतकरी कर्जमुक्तीसाठी संपाला विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचा पाठींबा पत्रकार परिषदेत जाहीर केला. कर्ज मुक्तीसाठी बळीराजानेही जागे व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. या संपाचे राज्यात लोन पसरत आहे. विदर्भातील शेतकरीही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, यासाठी शनिवार दि. ३ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत गांधी चौकात धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.शेतकरी जगेल तर देश जगेल याचे भान राज्य व केंद्र सरकारने ठेवावे व ताबडतोब शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा करावी. तसेच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नवीन हमी भावाची घोषणा करावी, अशी मागणीही पुगलिया यांनी यावेळी केली.लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतमालाला अत्यंत कमी भाव आहे ही कबुली देत होते. सत्ता प्राप्ती झाल्यास कृषी उत्पादनास लागतपेक्षा ५० टक्केपेक्षा जास्त मुनापा हे वचनसुद्धा दिले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.यावेळी नंदु नागरकर, अ‍ॅड. अविनाश ठावरी, रामभाऊ टोंगे, वसंत मांढरे, गजानन गावंडे, नगरसेवक संजय महाडोळे, डॉ. सुरेश महाकुलकर, नगरसेवक अशोक नागापुरे, प्रवीण पडवेकर, नगरसेवक नीलेश खोब्रागडे उपस्थित होते.