शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

आज शाळांमध्ये प्रवेशोत्सव

By admin | Updated: June 25, 2014 23:39 IST

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सव कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश यावर्षीही शासनाने दिले आहेत. शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या या आदेशामुळे सदर कार्यक्रम

विद्यार्थ्यांचे होणार स्वागत: पहिल्याच दिवशी मिळणार गोड जेवण चंद्रपूर : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सव कार्यक्रम आयोजित करण्याचे आदेश यावर्षीही शासनाने दिले आहेत. शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या या आदेशामुळे सदर कार्यक्रम राबविण्यासाठी राज्यातील गुरुजी कामाला लागले आहेत.विद्यार्थ्यांना गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी संस्थांमार्फत गाव तिथे शाळा उपलब्ध करून दिल्या आहे. विद्यार्थी या माध्यमातून शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. शिक्षणाचे धडे आत्मसात करणाऱ्या बालकांचा पाया मजबूत झाल्यास त्या पायावर निर्माण होणारे त्याचे शैक्षणिक आयुष्य बळकट होईल, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवित आहेत. अनेक सकारात्मक उपाययोजना करूनही काही बाबींमध्ये शैक्षणिक गुणवत्ता कमी असल्याची वस्तुस्थिती दूर करण्यासाठी शासनाने ६ ते १४ वयोगटातील सर्व बालकांना सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या सहकार्याने विशेष योजना राबविल्या जात आहे. असे असतानाही काही पालक आजही आपल्या पाल्याच्या साक्षरतेसाठी फारसे सतर्क असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे सतर्क नसलेला पालक आणि त्यांच्या पाल्यांना शिक्षणाची आवड आणि महत्व पटावे, त्यांना आकर्षित करण्यासाठी शासनाने प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या माध्यमातून विदर्भात २६ जून रोजी पहिल्या दिवशी प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे. शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने शिक्षकवृंद पदयात्रेच्या माध्यमातून बालकांच्या घरी भेटी देणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेच्या प्रांगणात पाऊल ठेवणाऱ्या बालकांना शाळेचे वातावरण आनंदी, समाधानी व उत्साहवर्धक वाटावे यासाठी शाळा परिसराची सडा टाकून स्वच्छता आणि रांगोळी, पाना-फुलांची तोरणे लावून शाळेचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.ध्वनिवर्धकावर देशभक्तीपर गीत वाजवून शाळेत येणाऱ्या बालकांच्या मनात देशाविषयीची भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शाळा सुरू होण्याच्या दिवशी सर्व शिक्षक वेळेवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे फूल देऊन स्वागत व कौतुक करणार आहे. याचदिवशी शालेय पाठ्यक्रमाचे मोफत वितरण केल्यानंतर दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनातून बालकांचे तोंड गोड केले जाणार आहे. (नगर प्रतिनिधी)