शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

आज प्रचारतोफा थंडावणार

By admin | Updated: February 14, 2017 00:32 IST

जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी ३१५ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या ११२ जागांवर ५१८ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

८३३ उमेदवार रिंगणात : रात्रीपासून चालणार गावागावांत गुप्त बैठकीचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी ३१५ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या ११२ जागांवर ५१८ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान असल्याने तत्पूर्वी मंगळवार रात्री १० वाजतापासून प्रचार बंद होणार आहे. त्यानंतर रात्रीपासून गुप्त बैठका आणि ‘इतर’ व्यवहार चालणार आहेत. या काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये, याकरिता निवडणूक विभागाला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार आहे.भाजप वगळता इतर पक्षांचे कोणतेही मोठे नेते जिल्ह्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी आले नाहीत. भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एक-एक सभा घेतली. उर्वरित संपूर्ण प्रचाराची धुरा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांभाळली. त्यांच्या सोबतीला जिल्ह्यातील भाजपचे आमदार होते. काँग्रेसच्या प्रचारासाठी विधानसभेतील उपगट नेते विजय वडेट्टीवार आणि माजी खा. नरेश पुगलिया यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. तसेच काँग्रेसच्या माजी आमदारांनी प्रचारात उडी घेतली. जिल्हा परिषदेसाठी ३९२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी ७७ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यानंतर रिंगणात ३१५ उमेदवार शिल्लक राहिले. त्यामध्ये १६५ पुरूष आणि १५० महिला उमेदवार आहेत. १५ पंचायत समित्यांच्या ११२ जागांसाठी ६१६ इच्छुकांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी ९८ उमेदवारांनी आपापली उमेदवारी मागे घेतली. आता रिंगणात ५१८ उमेदवार असून त्यामध्ये २५४ महिला व २६४ पुरूष उमेदवार आहेत. या उमेदवारांना ११ लाख ५७ हजार ७१९ मतदान गुरूवारी मतदान करणार आहेत. त्याकरिता १ हजार ४४९ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १७८ मतदान केंद्र संवेदनशील समजले जातात. तर पाच तालुक्यांमध्ये ६३ केंद्र नक्षल प्रभावित आहेत. पंचायत समित्यानिहाय १६०० मतदान केंद्राध्यक्ष आणि ४८०० मतदान रविवारी प्रशिक्षण देण्यात आले. (प्रतिनिधी)आता भर प्रत्यक्ष संपर्कावरमंगळवारी प्रचार थंडावल्यावर उमेदवारांकडे प्रत्यक्ष संपर्काचा पर्याय शिल्लक राहतो. पुढील दीड दिवस ‘जमेल त्या पद्धतीने’ मतदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याकरिता साम, दाम, दंड, भेदाला उधाण येणार आहे. जिल्ह्यात दारूबंदी असली तरी गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी अवैध दारू पकडण्याच्या मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. १५ फेब्रुवारीच्या रात्रीपर्यंत आणखी अवैध दारू पकडली जाण्याची शक्यता आहे. न पकडली जाणारी अवैध दारू मतदारांपर्यंतही पोहोचविली जाण्याची शक्यता आहे.बाजार पुढे ढकललेही निवडणूक १६ फेब्रुवारी रोजी होत असून सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होेणार आहे. त्यामुळे निवडणुका असलेल्या क्षेत्रात गुरूवारचे आठवडी बाजार पुढे ढकलण्यात आले आहेत. ते अन्य दिवशी भरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिली आहेलहान पक्ष ठरणार डोकेदुखीसत्ताधारी भाजप अणि विरोधी पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात ही लढत होत असली तरी शिवसेना, शेतकरी संघटना या लहान पक्षांचे उमेदवार मोठ्या प्रमाणात मतदान घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लढतीमधील दोन किंवा तीन उमेदवारांच्या विजयाचे अंतर कमी करण्यात किंवा पराभूत करण्यात हे लहान पक्षांचे उमेदवार निर्णायक ठरू शकतात. प्रचार थांबल्यावर लहान पक्षांची मते आपल्याकडे खेचण्याकरिता रस्सीखेच सुरू होणार आहे. अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. तेदेखील लढतीतील उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरू शकतात.