शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
3
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
4
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
5
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
6
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
7
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
8
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
9
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
10
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
11
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
12
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
13
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
14
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
15
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
16
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
17
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
18
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
19
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
20
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग

आज प्रचारतोफा थंडावणार

By admin | Updated: February 14, 2017 00:32 IST

जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी ३१५ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या ११२ जागांवर ५१८ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

८३३ उमेदवार रिंगणात : रात्रीपासून चालणार गावागावांत गुप्त बैठकीचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी ३१५ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या ११२ जागांवर ५१८ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान असल्याने तत्पूर्वी मंगळवार रात्री १० वाजतापासून प्रचार बंद होणार आहे. त्यानंतर रात्रीपासून गुप्त बैठका आणि ‘इतर’ व्यवहार चालणार आहेत. या काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये, याकरिता निवडणूक विभागाला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार आहे.भाजप वगळता इतर पक्षांचे कोणतेही मोठे नेते जिल्ह्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी आले नाहीत. भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एक-एक सभा घेतली. उर्वरित संपूर्ण प्रचाराची धुरा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांभाळली. त्यांच्या सोबतीला जिल्ह्यातील भाजपचे आमदार होते. काँग्रेसच्या प्रचारासाठी विधानसभेतील उपगट नेते विजय वडेट्टीवार आणि माजी खा. नरेश पुगलिया यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. तसेच काँग्रेसच्या माजी आमदारांनी प्रचारात उडी घेतली. जिल्हा परिषदेसाठी ३९२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी ७७ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यानंतर रिंगणात ३१५ उमेदवार शिल्लक राहिले. त्यामध्ये १६५ पुरूष आणि १५० महिला उमेदवार आहेत. १५ पंचायत समित्यांच्या ११२ जागांसाठी ६१६ इच्छुकांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी ९८ उमेदवारांनी आपापली उमेदवारी मागे घेतली. आता रिंगणात ५१८ उमेदवार असून त्यामध्ये २५४ महिला व २६४ पुरूष उमेदवार आहेत. या उमेदवारांना ११ लाख ५७ हजार ७१९ मतदान गुरूवारी मतदान करणार आहेत. त्याकरिता १ हजार ४४९ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १७८ मतदान केंद्र संवेदनशील समजले जातात. तर पाच तालुक्यांमध्ये ६३ केंद्र नक्षल प्रभावित आहेत. पंचायत समित्यानिहाय १६०० मतदान केंद्राध्यक्ष आणि ४८०० मतदान रविवारी प्रशिक्षण देण्यात आले. (प्रतिनिधी)आता भर प्रत्यक्ष संपर्कावरमंगळवारी प्रचार थंडावल्यावर उमेदवारांकडे प्रत्यक्ष संपर्काचा पर्याय शिल्लक राहतो. पुढील दीड दिवस ‘जमेल त्या पद्धतीने’ मतदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याकरिता साम, दाम, दंड, भेदाला उधाण येणार आहे. जिल्ह्यात दारूबंदी असली तरी गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी अवैध दारू पकडण्याच्या मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. १५ फेब्रुवारीच्या रात्रीपर्यंत आणखी अवैध दारू पकडली जाण्याची शक्यता आहे. न पकडली जाणारी अवैध दारू मतदारांपर्यंतही पोहोचविली जाण्याची शक्यता आहे.बाजार पुढे ढकललेही निवडणूक १६ फेब्रुवारी रोजी होत असून सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होेणार आहे. त्यामुळे निवडणुका असलेल्या क्षेत्रात गुरूवारचे आठवडी बाजार पुढे ढकलण्यात आले आहेत. ते अन्य दिवशी भरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिली आहेलहान पक्ष ठरणार डोकेदुखीसत्ताधारी भाजप अणि विरोधी पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात ही लढत होत असली तरी शिवसेना, शेतकरी संघटना या लहान पक्षांचे उमेदवार मोठ्या प्रमाणात मतदान घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लढतीमधील दोन किंवा तीन उमेदवारांच्या विजयाचे अंतर कमी करण्यात किंवा पराभूत करण्यात हे लहान पक्षांचे उमेदवार निर्णायक ठरू शकतात. प्रचार थांबल्यावर लहान पक्षांची मते आपल्याकडे खेचण्याकरिता रस्सीखेच सुरू होणार आहे. अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. तेदेखील लढतीतील उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरू शकतात.