शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

आज प्रचारतोफा थंडावणार

By admin | Updated: February 14, 2017 00:32 IST

जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी ३१५ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या ११२ जागांवर ५१८ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

८३३ उमेदवार रिंगणात : रात्रीपासून चालणार गावागावांत गुप्त बैठकीचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी ३१५ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समितीच्या ११२ जागांवर ५१८ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. या निवडणुकीसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान असल्याने तत्पूर्वी मंगळवार रात्री १० वाजतापासून प्रचार बंद होणार आहे. त्यानंतर रात्रीपासून गुप्त बैठका आणि ‘इतर’ व्यवहार चालणार आहेत. या काळात आचारसंहितेचा भंग होऊ नये, याकरिता निवडणूक विभागाला डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार आहे.भाजप वगळता इतर पक्षांचे कोणतेही मोठे नेते जिल्ह्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी आले नाहीत. भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एक-एक सभा घेतली. उर्वरित संपूर्ण प्रचाराची धुरा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांभाळली. त्यांच्या सोबतीला जिल्ह्यातील भाजपचे आमदार होते. काँग्रेसच्या प्रचारासाठी विधानसभेतील उपगट नेते विजय वडेट्टीवार आणि माजी खा. नरेश पुगलिया यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. तसेच काँग्रेसच्या माजी आमदारांनी प्रचारात उडी घेतली. जिल्हा परिषदेसाठी ३९२ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी ७७ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यानंतर रिंगणात ३१५ उमेदवार शिल्लक राहिले. त्यामध्ये १६५ पुरूष आणि १५० महिला उमेदवार आहेत. १५ पंचायत समित्यांच्या ११२ जागांसाठी ६१६ इच्छुकांनी नामांकन दाखल केले होते. त्यापैकी ९८ उमेदवारांनी आपापली उमेदवारी मागे घेतली. आता रिंगणात ५१८ उमेदवार असून त्यामध्ये २५४ महिला व २६४ पुरूष उमेदवार आहेत. या उमेदवारांना ११ लाख ५७ हजार ७१९ मतदान गुरूवारी मतदान करणार आहेत. त्याकरिता १ हजार ४४९ केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १७८ मतदान केंद्र संवेदनशील समजले जातात. तर पाच तालुक्यांमध्ये ६३ केंद्र नक्षल प्रभावित आहेत. पंचायत समित्यानिहाय १६०० मतदान केंद्राध्यक्ष आणि ४८०० मतदान रविवारी प्रशिक्षण देण्यात आले. (प्रतिनिधी)आता भर प्रत्यक्ष संपर्कावरमंगळवारी प्रचार थंडावल्यावर उमेदवारांकडे प्रत्यक्ष संपर्काचा पर्याय शिल्लक राहतो. पुढील दीड दिवस ‘जमेल त्या पद्धतीने’ मतदारांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याकरिता साम, दाम, दंड, भेदाला उधाण येणार आहे. जिल्ह्यात दारूबंदी असली तरी गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी अवैध दारू पकडण्याच्या मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. १५ फेब्रुवारीच्या रात्रीपर्यंत आणखी अवैध दारू पकडली जाण्याची शक्यता आहे. न पकडली जाणारी अवैध दारू मतदारांपर्यंतही पोहोचविली जाण्याची शक्यता आहे.बाजार पुढे ढकललेही निवडणूक १६ फेब्रुवारी रोजी होत असून सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होेणार आहे. त्यामुळे निवडणुका असलेल्या क्षेत्रात गुरूवारचे आठवडी बाजार पुढे ढकलण्यात आले आहेत. ते अन्य दिवशी भरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिली आहेलहान पक्ष ठरणार डोकेदुखीसत्ताधारी भाजप अणि विरोधी पक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात ही लढत होत असली तरी शिवसेना, शेतकरी संघटना या लहान पक्षांचे उमेदवार मोठ्या प्रमाणात मतदान घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लढतीमधील दोन किंवा तीन उमेदवारांच्या विजयाचे अंतर कमी करण्यात किंवा पराभूत करण्यात हे लहान पक्षांचे उमेदवार निर्णायक ठरू शकतात. प्रचार थांबल्यावर लहान पक्षांची मते आपल्याकडे खेचण्याकरिता रस्सीखेच सुरू होणार आहे. अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. तेदेखील लढतीतील उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरू शकतात.