शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

तंबाखू सेवनाने लाखोंच्या आयुष्यात पसरला अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 22:34 IST

तंबाखू सेवामुळे दररोज २५ हजार लोकांचा मृत्यू होतो. तंबाखूमध्ये असलेल्या विषारी निकोटीनमुळे तरूणांसह, आबालवृद्धही ग्रस्त आहे. तंबाखू सेवनामुळे आजपर्यंत हजारो लाखो तरूणांच्या आयुष्यात अंधार पसरला आहे. या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सलाम मुंबई फाउंडेशन व अंबुुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यात तंबाखू सेवन विरोधी कार्यक्रम राबवून जनजागृती करण्यात येत असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे.

ठळक मुद्देसलाम मुंबई फाउंडेशन व अंबुजा सिमेंट फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यात तंबाखू विरोधी कार्यक्रम

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : तंबाखू सेवामुळे दररोज २५ हजार लोकांचा मृत्यू होतो. तंबाखूमध्ये असलेल्या विषारी निकोटीनमुळे तरूणांसह, आबालवृद्धही ग्रस्त आहे. तंबाखू सेवनामुळे आजपर्यंत हजारो लाखो तरूणांच्या आयुष्यात अंधार पसरला आहे. या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी सलाम मुंबई फाउंडेशन व अंबुुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्ह्यात तंबाखू सेवन विरोधी कार्यक्रम राबवून जनजागृती करण्यात येत असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक करण्यात येत आहे.समाजात आज तंबाखू सेवानाचे घातक व्यसन जळले आहे. तंबाखूमध्ये निकोटीनचे प्रमाण अधिक असल्याने हे अत्यंत नशा आणणारे विषारी रसायन आहे. तंबाखू सेवन करणे शरीरासाठी घातक असून तंबाखूच्या जास्त सेवनामुळे तोंडाचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी सलाम मुंबई फाउंडेशन व अंबुजा सिमेंट फाउंडेशनच्या वतीने नागभीड येथील गटशिक्षणाधिकारी नाट व चंद्रपूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भसारकर यांनी मोलाचे कार्य करीत चंद्रपूर पंचायत समितीमधील सरकारी व ३३६ खासगी शाळा तंबाखूमुक्त केल्या आहे. अंबुजा फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक जितेंद्र बैस व लोखंडे आणि सलाम मुंबई फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक निर्झर बरवे यांनी तंबाखू सेवन विरोधी उपक्रम राबवून जिल्ह्यात जनजागृती केली आहे.जिल्हा तज्ज्ञ मार्गदर्शक जाहीर खान व हरीशचंद्र पाल यांनी तंबाखूमुक्त शाळा अभियान चंद्रपूर अंतर्गत अनेक शाळांमध्ये तंबाखू विरोधी कार्यक्रम घेऊन जनजागृती केली आहे.तंबाखू शरीरासाठी कसा घातक आहे हे पटवून दिल्यामुळे तंबाखू सेवनापासून दूर झालेल्या युवकांच्या आयुष्यातील निराशा संपवून आशेचा नवा किरण त्यांच्या आयुष्यात फुलवण्याचे कार्य तंबाखूविरोधी उपक्रमामुळे झाले आहे. तंबाखू सेवनामुळे दुर्धर आजार होऊन अनेकांचे आयुष्यच करपल्याने त्यांचे भावी आयुष्य मातीमोल झाले आहे. त्यासाठी सलाम मुंबई फाउंडेशन व अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे तंबाखू विरोधी उपक्रम जिल्ह्यातील तंबाखूग्रस्तांना नवसंजिवनी देणारा असून सामाजिक बांधिलकी जोपासत तंबाखू सेवनापासून नागरिकांनी दूर राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.तंबाखू का घातक आहे?तंबाखू व तंबाखूच्या धुरात चार हजारांहून अधिक विषारी रसायने आहेत. तंबाखूमध्ये निकोटीनचे प्रमाण असल्याने ते शरीराला नशा आणते. तंबाखुमुळे अनेकांना कर्करोगासारख्या दुर्धर आजारांना बळी पडावे लागते. त्यामुळे तंबाखूचे सेवन अतिशय घातक आहे.महाराष्ट्रामध्ये तंबाखूमुक्त शाळा अभियानात चंद्रपूर जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आहे. सलाम मुंबई फाउंडेशन व अंबुजा सिमेंट फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त नागरिक करण्यासाठी जनजागृती करण्यात येत असून जिल्ह्यात तंबाखू विरोधी उपक्रम राबविणे सुरू आहे.- जाहीर खान, जिल्हा तज्ज्ञ मार्गदर्शक, तंबाखूमुक्त शाळा अभियान, चंद्रपूर