शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:48 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाइन जाहीर झाला. निकालात अपेक्षेप्रमाणे मुलींची बाजी मारली आहे. जालना जिल्ह्याचा निकाल ८७.४५ टक्के इतका लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाइन जाहीर झाला. निकालात अपेक्षेप्रमाणे मुलींची बाजी मारली आहे. जालना जिल्ह्याचा निकाल ८७.४५ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या संख्येमध्ये एक टक्क्यांनी घट झाली आहे. विभागात जिल्हा चौथ्या क्रमांकावर आला आहे.फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील विविध केंद्रांवर कला, वाणिज्य, विज्ञान आणि किमान कौशल्य शाखेच्या २७ हजार २३४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी २७ हजार १८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.जाहीर झालेल्या आॅनलाइन निकालात २३ हजार ७७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलांची संख्या १४ हजार ७९२ तर मुलींची संख्या ८९८० इतकी आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८५.३५ असून मुलींचा निकाल ९१.१७ टक्के इतका लागला आहे. निकाल कसा लागेल या भीतीने सकाळपासूनच विद्यार्थ्यांत धाकधूक सुरू होती. निकालाची वेळ जसजशी जवळ येत होती तसतशी उत्कंठा शिगेला पोहोचली होती. दुपारी एकच्या सुमारास शहरातील विविध इंटरनेट कॅफेवर गर्दी केली होती. बहुतांश विद्यार्थ्यांनी मोबाईलवर निकाल पाहण्यास पसंती दिली. निकाल कळताच विद्यार्थ्यांनी नातेवाइकांसह मित्र-मैत्रिणींना संपर्क करून माहिती दिली. तसेच एकमेकांचे अभिनंदन केले. जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांनी नेहमीप्रमाणे उज्ज्वल निकालाची परंपरा कायम आहे.भोकरदन तालुक्याचा निकाल ९३ टक्केभोकरदन : तालुक्यात बारावीचा निकाल ९३़७२ टक्के लागला आहे़ १२ वीच्या शालांत परीक्षेसाठी तालुक्यातून आठ हजार ३०७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी ७ हजार ७८५ विद्यार्थी उर्त्तीण झाले आहेत. भोकरदनच्या शिवाजी विद्यालयाचा निकाल ९७़५२ टक्के, रामेश्वर महाविद्यालयाचा निकाल ९० टक्के, शारदा विद्या मंदिर वरूडचा निकाल ९६़७७ टक्के, संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय हसनाबादचा ९८़२६, छत्रपती संंभाजी विद्यालय तांदुळवाडीचा १०० टक्के, मोरेश्वर विद्यालय राजूरचा ९२़५० टक्के, प्रियदर्शनी कन्या विद्यालय भोकरदनचा ८६़६६ टक्के, अलहुदा उर्दू हायस्कूलचा ९५़९६ टक्के, सत्यशोधक माध्यमिक विद्यालयाचा ९८़८९ टक्के, न्यू हायस्कूल भोकरदनचा ९२़०२ टक्के, असा निकाल लागला आहे. बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा़ रावसाहेब दानवे, आ. संतोष दानवे, नगराध्यक्षा मंजूषा देशमुख, गटशिक्षण अधिकारी दिलीप शहागडकर यांनी कौतुक केले आहे.जाफराबाद तालुक्यातील महाविद्यालयांनी राखली निकालाची परंपराजाफराबाद : जाफराबाद तालुक्याचा एकूण निकाल ८८.१८ टक्के लागला आहे. यंदाही मुलींनी यश संपादन केले. तालुक्यातील ज्ञानसागर विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९७ टक्के, कला शाखेचा ८४ टक्के, ज्ञानसागर विद्यालय सिपोराअंभोराचा एकूण निकाल ९०.७६ टक्के, समर्थ जूनियर कॉलेजचा ९४.०० टक्के, राजे संभाजी विद्यालय जवखेडचा ९७.४५ ,जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालय टेंभूर्णीचा ९५.०० टक्के, जिजाऊ कॉलेज वरुड बु ८८.१८ टक्के, जिजाऊ कॉलेज जाफराबादचा ८६.९५ टक्के, स्वामी विवेकानंद कॉलेज ८७.०१ , नवभारत कॉलेज टेंभुर्णीचा ८१.७१ टक्के, शिवाजी कॉलेज भारज ७९.७३ , गुरुदेव कॉलेज जानेफळ ९२.३७, जयभावनी विद्या मंदिर देळेगव्हाण ९७.५२ ,आयशा उर्दू हायस्कूल जाफराबादचा ६९.८१ , जिजामाता विद्यालय निमखेडा ६८.४२ , अभिजीत विद्यालय खासगाव ५४.५४ , जाणता राजा विद्यालय अकोला देव ९३.१८ , कै. मारोतराव देशमुख विद्यालय टेंभूर्णी ८५.४८ , स्वामी विवेकानंद विद्यालय बुटखेडा ९३.३३, दीपभारती विद्यालय माहोरा ९१.३० टक्के, सिध्दार्थ महाविद्यालय जाफराबादचा ९५ टक्के तर भारतमाता महाविद्यालय वरुड बुद्रूक ८७ टक्के निकाल लागला आहे.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८Education Sectorशिक्षण क्षेत्र