शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

यंदाही मुलींचीच बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:48 IST

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाइन जाहीर झाला. निकालात अपेक्षेप्रमाणे मुलींची बाजी मारली आहे. जालना जिल्ह्याचा निकाल ८७.४५ टक्के इतका लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाइन जाहीर झाला. निकालात अपेक्षेप्रमाणे मुलींची बाजी मारली आहे. जालना जिल्ह्याचा निकाल ८७.४५ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या संख्येमध्ये एक टक्क्यांनी घट झाली आहे. विभागात जिल्हा चौथ्या क्रमांकावर आला आहे.फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील विविध केंद्रांवर कला, वाणिज्य, विज्ञान आणि किमान कौशल्य शाखेच्या २७ हजार २३४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. त्यापैकी २७ हजार १८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.जाहीर झालेल्या आॅनलाइन निकालात २३ हजार ७७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलांची संख्या १४ हजार ७९२ तर मुलींची संख्या ८९८० इतकी आहे. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८५.३५ असून मुलींचा निकाल ९१.१७ टक्के इतका लागला आहे. निकाल कसा लागेल या भीतीने सकाळपासूनच विद्यार्थ्यांत धाकधूक सुरू होती. निकालाची वेळ जसजशी जवळ येत होती तसतशी उत्कंठा शिगेला पोहोचली होती. दुपारी एकच्या सुमारास शहरातील विविध इंटरनेट कॅफेवर गर्दी केली होती. बहुतांश विद्यार्थ्यांनी मोबाईलवर निकाल पाहण्यास पसंती दिली. निकाल कळताच विद्यार्थ्यांनी नातेवाइकांसह मित्र-मैत्रिणींना संपर्क करून माहिती दिली. तसेच एकमेकांचे अभिनंदन केले. जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांनी नेहमीप्रमाणे उज्ज्वल निकालाची परंपरा कायम आहे.भोकरदन तालुक्याचा निकाल ९३ टक्केभोकरदन : तालुक्यात बारावीचा निकाल ९३़७२ टक्के लागला आहे़ १२ वीच्या शालांत परीक्षेसाठी तालुक्यातून आठ हजार ३०७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी ७ हजार ७८५ विद्यार्थी उर्त्तीण झाले आहेत. भोकरदनच्या शिवाजी विद्यालयाचा निकाल ९७़५२ टक्के, रामेश्वर महाविद्यालयाचा निकाल ९० टक्के, शारदा विद्या मंदिर वरूडचा निकाल ९६़७७ टक्के, संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय हसनाबादचा ९८़२६, छत्रपती संंभाजी विद्यालय तांदुळवाडीचा १०० टक्के, मोरेश्वर विद्यालय राजूरचा ९२़५० टक्के, प्रियदर्शनी कन्या विद्यालय भोकरदनचा ८६़६६ टक्के, अलहुदा उर्दू हायस्कूलचा ९५़९६ टक्के, सत्यशोधक माध्यमिक विद्यालयाचा ९८़८९ टक्के, न्यू हायस्कूल भोकरदनचा ९२़०२ टक्के, असा निकाल लागला आहे. बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनीचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा़ रावसाहेब दानवे, आ. संतोष दानवे, नगराध्यक्षा मंजूषा देशमुख, गटशिक्षण अधिकारी दिलीप शहागडकर यांनी कौतुक केले आहे.जाफराबाद तालुक्यातील महाविद्यालयांनी राखली निकालाची परंपराजाफराबाद : जाफराबाद तालुक्याचा एकूण निकाल ८८.१८ टक्के लागला आहे. यंदाही मुलींनी यश संपादन केले. तालुक्यातील ज्ञानसागर विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९७ टक्के, कला शाखेचा ८४ टक्के, ज्ञानसागर विद्यालय सिपोराअंभोराचा एकूण निकाल ९०.७६ टक्के, समर्थ जूनियर कॉलेजचा ९४.०० टक्के, राजे संभाजी विद्यालय जवखेडचा ९७.४५ ,जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालय टेंभूर्णीचा ९५.०० टक्के, जिजाऊ कॉलेज वरुड बु ८८.१८ टक्के, जिजाऊ कॉलेज जाफराबादचा ८६.९५ टक्के, स्वामी विवेकानंद कॉलेज ८७.०१ , नवभारत कॉलेज टेंभुर्णीचा ८१.७१ टक्के, शिवाजी कॉलेज भारज ७९.७३ , गुरुदेव कॉलेज जानेफळ ९२.३७, जयभावनी विद्या मंदिर देळेगव्हाण ९७.५२ ,आयशा उर्दू हायस्कूल जाफराबादचा ६९.८१ , जिजामाता विद्यालय निमखेडा ६८.४२ , अभिजीत विद्यालय खासगाव ५४.५४ , जाणता राजा विद्यालय अकोला देव ९३.१८ , कै. मारोतराव देशमुख विद्यालय टेंभूर्णी ८५.४८ , स्वामी विवेकानंद विद्यालय बुटखेडा ९३.३३, दीपभारती विद्यालय माहोरा ९१.३० टक्के, सिध्दार्थ महाविद्यालय जाफराबादचा ९५ टक्के तर भारतमाता महाविद्यालय वरुड बुद्रूक ८७ टक्के निकाल लागला आहे.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८Education Sectorशिक्षण क्षेत्र