शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

‘त्यांच्या’वर प्रत्यक्ष नियंत्यालाही लाजविणारी वेळ

By admin | Updated: May 14, 2017 00:35 IST

हातावर आणून पानावर आणे, हे त्यांचं रहाटगाडगं या रहाट गाडग्याची परिक्रमा पुर्ण करण्यासाठी ते नेहमीप्रमाणे जंगलात गेले.

मृृत्यूचा क्रूर खेळ : किटाळी व खरकाडावासीयांसाठी ठरली शनिवारची काळी सकाळघनश्याम नवघडे । लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : हातावर आणून पानावर आणे, हे त्यांचं रहाटगाडगं या रहाट गाडग्याची परिक्रमा पुर्ण करण्यासाठी ते नेहमीप्रमाणे जंगलात गेले. जंगलात जातांना आपल्यावर काळ असा काही घाला घालेल, अशी पुसटशी कल्पनाही त्यांच्या मनाला शिवली नाही. पण त्याच क्रूर काळाने त्यांचेशी असा काही खेळ खेळला की, प्रत्यक्ष त्या नियंत्यालाही अचंबित व्हावे लागले असेल.शनिवारी ती सकाळी सात-आठची वेळ असेल. नेहमीप्रमाणे ते अगदी हसतमुखाने घराबाहेर पडले. तसे ते रोजच बाहेर पडत होते. हातावर आणून पानावर खाण्यासाठी नियोजित ठिकाणी ते पोचलेही आणि नित्याप्रमाणे ते आपल्या कामाला लागले. अगदी मन लावून ते काम करीत होते. उद्याची स्वप्ने रंगवित. कोणाला त्यांच्या मुलामुलीसाठी सुंदर ड्रेस खरेदी करावयाचा होता. कोणाला मुलीसाठी छान फ्रॉक घ्यायचा होता. पावसाळ्याच्या बेगमीसाठी कोणाला गहू-तांदूळ खरेदी करायचे होते. त्यांच्या मनात हे सारे स्वप्न होते.ते उद्याची स्वप्ने रंगवित असतांनाच काळ मात्र त्यांचेवर हसत होता आणि एका अस्वलाच्या रूपाने तो त्यांच्या अगदी नजिक येवून ठेपला होता. ते मात्र उद्याच्या स्वप्नातच रममान झाले होते. त्यांच्या स्वप्नांचा आणि काळाचा असा पाणशिवणीचा खेळ सुरू असतानाच काळाने अखेर झडप घातलीच आणि त्यांच्या स्वप्नांची अक्षरशा राखरांगोळी केली. किटाळी व खरकाडा येथील तेंदूपत्ता तोडणाऱ्या मजुरांवर अस्वलाच्या रूपाने जो काळाने घाला घालून ४ मजुरांचा बळी घेतला. त्यांची ही चित्तर कहाणी.काळाने घातलेल्या या घाल्यात रंजना अंबादास राऊत, मिना दुधराम राऊत, बिसन सोमा कुळमेथे व फारूक युसुफ शेख यांचा जो बळी घेतला तो खरोखरच हृदयद्रावक आहे. या घटनेने आता सारीच पंचक्रोशी धास्तावली आहे. या घटनेत मृत पावलेल्या मजुरांप्रमाणेच त्यांचेही स्वप्ने आहेत. पण त्यांच्या मनात आता जी चरक निर्माण झाली आहे ती चरक त्यांना त्यांची स्वप्ने पुर्ण करू देईल काय? याबाबत शंकाच आहे. आता या मृतकांना शासकीय शिरस्त्याप्रमाणे मदत देवून त्यांचे सांत्वन करण्यात येईलही. पण यात कोणाचा बाप गेला, कोणाची आई गेली, कोणाचा भाऊ गेला, याचे काय?