शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

मध विक्रेत्यांवर गुणवत्ता सिद्ध करण्याची वेळ

By admin | Updated: February 12, 2015 00:49 IST

भारतीय बाजारपेठ एवढी अविश्वासाच्या भोवऱ्यात सापडली आहे की, विक्रेत्यांना आपल्या मालाच्या गुणवत्तेचे प्रमाणक सिद्ध केल्याशिवाय खरेदीदार...

नागभीड : भारतीय बाजारपेठ एवढी अविश्वासाच्या भोवऱ्यात सापडली आहे की, विक्रेत्यांना आपल्या मालाच्या गुणवत्तेचे प्रमाणक सिद्ध केल्याशिवाय खरेदीदार तो माल किंवा सामान विकत घ्यायला तयार होत नाही. नागभीडमध्ये हाच प्रकार घडत आहे. येथे मध विक्रेत्यांनी मधाचे पोळे दाखविले तेव्हाच नागरिकांनी ते मध विकत घेतले.बाजारपेठेत भेसळीचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. एवढेच नाही तर प्रत्येक ब्रॉन्डेड वस्तुच्या डुप्लीकेट वस्तु बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांची अवस्था अतिशय संभ्रमीत झाली आहे. एखादी अस्सल वस्तु समोर असेल, तरी ती अस्सलच आहे. यावर तो विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे अस्सलतेवर प्रश्नचिन्ह तयार होतात. तालुक्यातील जंगल परिसरात राहणाऱ्या मध विक्रेत्यांसमोर नेमका हाच प्रश्न निर्माण झाला आहे. जंगलातील रानमेवा आणि मध गोळा करून त्याची विक्री करणे हा त्यांचा व्यवसाय आणि तोही परंपरेने चालत असलेला पण हल्ली भेसळीच्या युगात लोक त्यांच्या मालाच्या गुणवत्तेवरच शंका घेऊ लागल्याने आपला माल खरोखरच अस्सल आहे, हे सिद्ध करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. नागभीड येथे काही मध विक्रेते मध विक्री करण्यासाठी आले तेव्हा, त्यांनी सोबत मधाचे पोळेही आणले होते. याबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी ‘लोकमत’ला सांगितलेली आपबिती खरोखरच धक्क करणारी आहे.ते म्हणाले, आम्ही नुसता मध विक्रीला आणत होतो तेव्हा आमच्या मधावर लोक नानाविध शंका घेऊन विकत घेण्यास नकार द्यायचे. पण आता मधा सोबत मधाचे पोळे आणत आहोत, तेव्हापासून मध विकत घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. (तालुका प्रतिनिधी)