शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मध विक्रेत्यांवर गुणवत्ता सिद्ध करण्याची वेळ

By admin | Updated: February 12, 2015 00:49 IST

भारतीय बाजारपेठ एवढी अविश्वासाच्या भोवऱ्यात सापडली आहे की, विक्रेत्यांना आपल्या मालाच्या गुणवत्तेचे प्रमाणक सिद्ध केल्याशिवाय खरेदीदार...

नागभीड : भारतीय बाजारपेठ एवढी अविश्वासाच्या भोवऱ्यात सापडली आहे की, विक्रेत्यांना आपल्या मालाच्या गुणवत्तेचे प्रमाणक सिद्ध केल्याशिवाय खरेदीदार तो माल किंवा सामान विकत घ्यायला तयार होत नाही. नागभीडमध्ये हाच प्रकार घडत आहे. येथे मध विक्रेत्यांनी मधाचे पोळे दाखविले तेव्हाच नागरिकांनी ते मध विकत घेतले.बाजारपेठेत भेसळीचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. एवढेच नाही तर प्रत्येक ब्रॉन्डेड वस्तुच्या डुप्लीकेट वस्तु बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांची अवस्था अतिशय संभ्रमीत झाली आहे. एखादी अस्सल वस्तु समोर असेल, तरी ती अस्सलच आहे. यावर तो विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे अस्सलतेवर प्रश्नचिन्ह तयार होतात. तालुक्यातील जंगल परिसरात राहणाऱ्या मध विक्रेत्यांसमोर नेमका हाच प्रश्न निर्माण झाला आहे. जंगलातील रानमेवा आणि मध गोळा करून त्याची विक्री करणे हा त्यांचा व्यवसाय आणि तोही परंपरेने चालत असलेला पण हल्ली भेसळीच्या युगात लोक त्यांच्या मालाच्या गुणवत्तेवरच शंका घेऊ लागल्याने आपला माल खरोखरच अस्सल आहे, हे सिद्ध करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. नागभीड येथे काही मध विक्रेते मध विक्री करण्यासाठी आले तेव्हा, त्यांनी सोबत मधाचे पोळेही आणले होते. याबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी ‘लोकमत’ला सांगितलेली आपबिती खरोखरच धक्क करणारी आहे.ते म्हणाले, आम्ही नुसता मध विक्रीला आणत होतो तेव्हा आमच्या मधावर लोक नानाविध शंका घेऊन विकत घेण्यास नकार द्यायचे. पण आता मधा सोबत मधाचे पोळे आणत आहोत, तेव्हापासून मध विकत घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. (तालुका प्रतिनिधी)