शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

शौचालयाची उदासिनता ठरली ‘हिरकन्ये’साठी काळ

By admin | Updated: November 13, 2015 01:06 IST

शासनाने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ व सुंदर गाव बनविण्यासह गावाला हागणदारीमुक्त करण्याचा विडा उचलला आहे.

राजकुमार चुनारकर खडसंगीशासनाने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ व सुंदर गाव बनविण्यासह गावाला हागणदारीमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. तरी ग्रामीण भागातील नागरिकांच्या उदासिनतेमुळे ‘हागणदारी मुक्त’ गाव संकल्पना पूर्णत्वास आली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक महिलांसह, नागरिक आजही उघड्यावर शौचास जातात. यामुळेच चिमूर तालुक्यातील आंबोली येथील एका ३५ वर्षीय महिलेला एका नराधमाच्या वासनेला बळी पडत जीव गमावावा लागला. राज्यात आघाडी शासनाच्या काळापासून संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत होते. त्याच अभियानाअंतर्गत हागणदारी मुक्त गाव योजनाही राबविण्यात आल्या. याच अभियानातून अनेक गावांत शौचालय बांधकाम करण्यात आले. भाजपा शासनानेसुद्धा या अभियानात काही बदल करीत स्वच्छ भारत अभियान सुरू केले. या अभियानाअंतर्गत शासनाकडून शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपयाचा निधी देण्यात येतो. मात्र आजही ग्रामीण भागातील नागरिकांत शौचालयाविषयी उदासिनता असल्याने अनेक गावात शौचालयाची संख्या पाहिजे त्या प्रमाणात नाही. त्यामुळे अनेक नागरिक आजही उघड्यावरच शौचाससाठी जात असल्याचे चित्र जिल्ह्यात तालुक्यात पहावयास मिळते. चिमूर तालुक्यातील आंबोली या दोन हजार लोकवस्तीच्या गावातील एक दाम्पत्य आपल्या दोन मुलासह जीवन जगत होते. दिवाळीचा सण एक दिवसावर येऊन ठेपला असल्याने गावात फटाक्याच्या आतिषबाजी सुरू होती. १० नोव्हेंबरच्या सायकाळी ७ वाजताच्या दरम्यान, हिरकन्या स्वयंपाकाच्या तयारीत होती. याच दरम्यान, ती शौचासाठी गावाच्या काही मिटर अंतरावरील शेतात गेली. शेतात एकटी पाहून गावातीलच युवक आशिष धनराज निखाडे या नराधमाने दारूच्या नशेत हिरकन्येला आपल्या वासनापूर्तीचा बळी बनविले. अकोला जिल्ह्यातील एका विवाहितेने आपले मंगळसूत्र विकून घरी शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घेतला, तेव्हा या घटनेने शासन खडबडून जागे झाले. याच महिलेला शासनाने ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनविले. सत्कारही केला तर काही महिन्याअगोदर पुणे जिल्ह्यात विवाहामध्ये तयार शौचालय भेट दिल्याची घटनाही ताजीच आहे.शासनाच्या हागणदारी मुक्त अभियानाचा लाभ घेत घरी शौचालय असते तर हिरकन्येला शौचासाठी बाहेर जावे लागले नसते आणि त्या नराधमाच्या वासनेस हिरकन्या बळी पडली नसती.