शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाची उदासिनता ठरली ‘हिरकन्ये’साठी काळ

By admin | Updated: November 13, 2015 01:06 IST

शासनाने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ व सुंदर गाव बनविण्यासह गावाला हागणदारीमुक्त करण्याचा विडा उचलला आहे.

राजकुमार चुनारकर खडसंगीशासनाने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ व सुंदर गाव बनविण्यासह गावाला हागणदारीमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. तरी ग्रामीण भागातील नागरिकांच्या उदासिनतेमुळे ‘हागणदारी मुक्त’ गाव संकल्पना पूर्णत्वास आली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेक महिलांसह, नागरिक आजही उघड्यावर शौचास जातात. यामुळेच चिमूर तालुक्यातील आंबोली येथील एका ३५ वर्षीय महिलेला एका नराधमाच्या वासनेला बळी पडत जीव गमावावा लागला. राज्यात आघाडी शासनाच्या काळापासून संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत होते. त्याच अभियानाअंतर्गत हागणदारी मुक्त गाव योजनाही राबविण्यात आल्या. याच अभियानातून अनेक गावांत शौचालय बांधकाम करण्यात आले. भाजपा शासनानेसुद्धा या अभियानात काही बदल करीत स्वच्छ भारत अभियान सुरू केले. या अभियानाअंतर्गत शासनाकडून शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपयाचा निधी देण्यात येतो. मात्र आजही ग्रामीण भागातील नागरिकांत शौचालयाविषयी उदासिनता असल्याने अनेक गावात शौचालयाची संख्या पाहिजे त्या प्रमाणात नाही. त्यामुळे अनेक नागरिक आजही उघड्यावरच शौचाससाठी जात असल्याचे चित्र जिल्ह्यात तालुक्यात पहावयास मिळते. चिमूर तालुक्यातील आंबोली या दोन हजार लोकवस्तीच्या गावातील एक दाम्पत्य आपल्या दोन मुलासह जीवन जगत होते. दिवाळीचा सण एक दिवसावर येऊन ठेपला असल्याने गावात फटाक्याच्या आतिषबाजी सुरू होती. १० नोव्हेंबरच्या सायकाळी ७ वाजताच्या दरम्यान, हिरकन्या स्वयंपाकाच्या तयारीत होती. याच दरम्यान, ती शौचासाठी गावाच्या काही मिटर अंतरावरील शेतात गेली. शेतात एकटी पाहून गावातीलच युवक आशिष धनराज निखाडे या नराधमाने दारूच्या नशेत हिरकन्येला आपल्या वासनापूर्तीचा बळी बनविले. अकोला जिल्ह्यातील एका विवाहितेने आपले मंगळसूत्र विकून घरी शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घेतला, तेव्हा या घटनेने शासन खडबडून जागे झाले. याच महिलेला शासनाने ब्रँड अ‍ॅम्बेसिडर बनविले. सत्कारही केला तर काही महिन्याअगोदर पुणे जिल्ह्यात विवाहामध्ये तयार शौचालय भेट दिल्याची घटनाही ताजीच आहे.शासनाच्या हागणदारी मुक्त अभियानाचा लाभ घेत घरी शौचालय असते तर हिरकन्येला शौचासाठी बाहेर जावे लागले नसते आणि त्या नराधमाच्या वासनेस हिरकन्या बळी पडली नसती.