शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
3
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
4
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
5
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
6
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
7
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
8
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
9
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
10
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
11
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
12
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
13
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
14
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
15
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
16
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
17
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
18
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
19
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
20
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश

काळानुरूप बदलली निकालाची पद्धत

By admin | Updated: June 18, 2014 00:07 IST

विद्यार्थ्यांचा पहिला शैक्षणिक मजबूत पाया दहावा वर्ग आणि त्याचा लागणारा निकाल, त्यात मिळालेले गुण हे होय. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक वाटचाल ठरविली जाते.

वसंत खेडेकर - बल्लारपूरविद्यार्थ्यांचा पहिला शैक्षणिक मजबूत पाया दहावा वर्ग आणि त्याचा लागणारा निकाल, त्यात मिळालेले गुण हे होय. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक वाटचाल ठरविली जाते.दहावीचे महत्त्व पन्नास वर्षांपूर्वी होते तेवढेच आजही आहे. फक्त दहावीच्या निकालाच्या पद्धती बदलल्या आहेत एवढंच. पूर्वी म्हणजे ३५-४० वर्षांपूर्वी दहावीचा निकाल आधी वर्तमानपत्रात यायचा. त्यानंतर शाळांमधून गुणपत्रिका मिळत असत. सर्व मराठी, हिन्दी व इंग्रजी वृत्तपत्र निकाल व संबंधित वृत्तपत्रात गुणवंत विद्यार्थ्यांच्या फोटोंनी भरलेले असायचे. निकालाच्या दिवशी नागपूरचे पेपर कधी एकदाचे आपल्या गावी येणार, याची दहावीचे विद्यार्थी चातकाप्रमाणे वाट बघत. गावातील बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर गाड्यांमधून पेपरचे बंडल उतरले की, पेपर विकत घेण्याकरिता विद्यार्थ्यांच्या पेपर विक्रेत्यांवर उड्या पडायच्या. त्यात मग पेपर विक्रेता एक रुपयाचा पेपर दोन-तीन रुपयांत विकून हात धुऊन घ्यायचा. पेपरमध्ये जिल्हावार गावाचे, विद्यालयाचे नाव, त्याखाली उत्तीर्ण विद्यार्थ्याचे प्रथम नावासोबत आडनाव आणि कंसात त्याला मिळालेले गुण, तसेच श्रेणी असे सविस्तर येत असे. एकदा निकाल डोळ्यांसमोरून गेला, उत्तीर्णांमध्ये आपले नाव बघितले की उत्तीर्ण विद्यार्थी जाम खुश होऊन पेढे वाटायचे. त्याच पेपरमध्ये मेरीटची सूची प्रसिद्ध व्हायची. त्याकाळी बहुदा नागपूर, अमरावती, अकोला, उमरेड, सावनेर याकडील विद्यार्थीच विदर्भातून प्रथम येत. मेरिटमध्ये नागपूरच्या हडस विद्यालयाचे विद्यार्थी अधिक चमकत असत. चंद्रपूर जिल्ह्यातून चंद्रपूर, वरोरा, ब्रम्हपुरी येथील विद्यार्थी हमखास मेरिटमध्ये असायचेच. पेपरमध्ये आपले नाव बघितल्यानंतर ते विद्यार्थी तो पेपर जपून ठेवायचे. नंतर नावासह निकाल येणे बंद होऊन फक्त उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे रोलनंबर व त्यांना मिळालेले गुण एवढेच येऊ लागले. मेरिट सूची येणे सुरूच होते. त्यानंतर पेपरमधून निकाल येणे बंद झाले. निकालाची तारीख पेपरमधून आली की, त्या दिवशी जिल्ह्याच्या मुख्यालयी गुणपत्रिका यायच्या. शाळांनी ते तेथून आणायचे आणि दिलेल्या वेळेवर गठ्ठा उघडून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटायच्या. निकाल बघण्याकरिता शाळांमध्ये विद्यार्थी गर्दी करत.कोण प्रथम आला ते जाणून घेत. एकमेकांची माहिती मिळाल्याने मजा यायची. इंटरनेट पद्धती आली आणि जुने सारेच गेले. आपापले निकाल इंटरनेटवर बघा आणि आपल्यातच आनंद व दु:ख मानत बसा, या एकलकोंड्या पद्धतीने गावातून, जिल्ह्यातून कोण विद्यार्थी प्रथम आला हे कळतच नाही. हल्ली तर विद्यार्थ्यांच्या आईचे नाव ही निकाल बघतेवेळी इंटरनेटवर अंकित होणे गरजेचे झाले आहे. तरच निकाल बाहेर येईल अन्यथा नाही. याच कारणाने बारावीचा निकाल महाविद्यालयांना निकालाच्या दिवशी बघता आला नाही. दहावीचा निकाल बघताना विद्यालयांनाही तोच पेच पडला. काळानुरूप बदललेल्या आधुनिक पद्धतींमुळे निकालाची पूर्वीची मजाच पार गेली आहे.