शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

काळानुरूप बदलली निकालाची पद्धत

By admin | Updated: June 18, 2014 00:07 IST

विद्यार्थ्यांचा पहिला शैक्षणिक मजबूत पाया दहावा वर्ग आणि त्याचा लागणारा निकाल, त्यात मिळालेले गुण हे होय. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक वाटचाल ठरविली जाते.

वसंत खेडेकर - बल्लारपूरविद्यार्थ्यांचा पहिला शैक्षणिक मजबूत पाया दहावा वर्ग आणि त्याचा लागणारा निकाल, त्यात मिळालेले गुण हे होय. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक वाटचाल ठरविली जाते.दहावीचे महत्त्व पन्नास वर्षांपूर्वी होते तेवढेच आजही आहे. फक्त दहावीच्या निकालाच्या पद्धती बदलल्या आहेत एवढंच. पूर्वी म्हणजे ३५-४० वर्षांपूर्वी दहावीचा निकाल आधी वर्तमानपत्रात यायचा. त्यानंतर शाळांमधून गुणपत्रिका मिळत असत. सर्व मराठी, हिन्दी व इंग्रजी वृत्तपत्र निकाल व संबंधित वृत्तपत्रात गुणवंत विद्यार्थ्यांच्या फोटोंनी भरलेले असायचे. निकालाच्या दिवशी नागपूरचे पेपर कधी एकदाचे आपल्या गावी येणार, याची दहावीचे विद्यार्थी चातकाप्रमाणे वाट बघत. गावातील बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर गाड्यांमधून पेपरचे बंडल उतरले की, पेपर विकत घेण्याकरिता विद्यार्थ्यांच्या पेपर विक्रेत्यांवर उड्या पडायच्या. त्यात मग पेपर विक्रेता एक रुपयाचा पेपर दोन-तीन रुपयांत विकून हात धुऊन घ्यायचा. पेपरमध्ये जिल्हावार गावाचे, विद्यालयाचे नाव, त्याखाली उत्तीर्ण विद्यार्थ्याचे प्रथम नावासोबत आडनाव आणि कंसात त्याला मिळालेले गुण, तसेच श्रेणी असे सविस्तर येत असे. एकदा निकाल डोळ्यांसमोरून गेला, उत्तीर्णांमध्ये आपले नाव बघितले की उत्तीर्ण विद्यार्थी जाम खुश होऊन पेढे वाटायचे. त्याच पेपरमध्ये मेरीटची सूची प्रसिद्ध व्हायची. त्याकाळी बहुदा नागपूर, अमरावती, अकोला, उमरेड, सावनेर याकडील विद्यार्थीच विदर्भातून प्रथम येत. मेरिटमध्ये नागपूरच्या हडस विद्यालयाचे विद्यार्थी अधिक चमकत असत. चंद्रपूर जिल्ह्यातून चंद्रपूर, वरोरा, ब्रम्हपुरी येथील विद्यार्थी हमखास मेरिटमध्ये असायचेच. पेपरमध्ये आपले नाव बघितल्यानंतर ते विद्यार्थी तो पेपर जपून ठेवायचे. नंतर नावासह निकाल येणे बंद होऊन फक्त उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे रोलनंबर व त्यांना मिळालेले गुण एवढेच येऊ लागले. मेरिट सूची येणे सुरूच होते. त्यानंतर पेपरमधून निकाल येणे बंद झाले. निकालाची तारीख पेपरमधून आली की, त्या दिवशी जिल्ह्याच्या मुख्यालयी गुणपत्रिका यायच्या. शाळांनी ते तेथून आणायचे आणि दिलेल्या वेळेवर गठ्ठा उघडून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटायच्या. निकाल बघण्याकरिता शाळांमध्ये विद्यार्थी गर्दी करत.कोण प्रथम आला ते जाणून घेत. एकमेकांची माहिती मिळाल्याने मजा यायची. इंटरनेट पद्धती आली आणि जुने सारेच गेले. आपापले निकाल इंटरनेटवर बघा आणि आपल्यातच आनंद व दु:ख मानत बसा, या एकलकोंड्या पद्धतीने गावातून, जिल्ह्यातून कोण विद्यार्थी प्रथम आला हे कळतच नाही. हल्ली तर विद्यार्थ्यांच्या आईचे नाव ही निकाल बघतेवेळी इंटरनेटवर अंकित होणे गरजेचे झाले आहे. तरच निकाल बाहेर येईल अन्यथा नाही. याच कारणाने बारावीचा निकाल महाविद्यालयांना निकालाच्या दिवशी बघता आला नाही. दहावीचा निकाल बघताना विद्यालयांनाही तोच पेच पडला. काळानुरूप बदललेल्या आधुनिक पद्धतींमुळे निकालाची पूर्वीची मजाच पार गेली आहे.