शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

काळानुरूप बदलली निकालाची पद्धत

By admin | Updated: June 18, 2014 00:07 IST

विद्यार्थ्यांचा पहिला शैक्षणिक मजबूत पाया दहावा वर्ग आणि त्याचा लागणारा निकाल, त्यात मिळालेले गुण हे होय. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक वाटचाल ठरविली जाते.

वसंत खेडेकर - बल्लारपूरविद्यार्थ्यांचा पहिला शैक्षणिक मजबूत पाया दहावा वर्ग आणि त्याचा लागणारा निकाल, त्यात मिळालेले गुण हे होय. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थ्यांची पुढील शैक्षणिक वाटचाल ठरविली जाते.दहावीचे महत्त्व पन्नास वर्षांपूर्वी होते तेवढेच आजही आहे. फक्त दहावीच्या निकालाच्या पद्धती बदलल्या आहेत एवढंच. पूर्वी म्हणजे ३५-४० वर्षांपूर्वी दहावीचा निकाल आधी वर्तमानपत्रात यायचा. त्यानंतर शाळांमधून गुणपत्रिका मिळत असत. सर्व मराठी, हिन्दी व इंग्रजी वृत्तपत्र निकाल व संबंधित वृत्तपत्रात गुणवंत विद्यार्थ्यांच्या फोटोंनी भरलेले असायचे. निकालाच्या दिवशी नागपूरचे पेपर कधी एकदाचे आपल्या गावी येणार, याची दहावीचे विद्यार्थी चातकाप्रमाणे वाट बघत. गावातील बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर गाड्यांमधून पेपरचे बंडल उतरले की, पेपर विकत घेण्याकरिता विद्यार्थ्यांच्या पेपर विक्रेत्यांवर उड्या पडायच्या. त्यात मग पेपर विक्रेता एक रुपयाचा पेपर दोन-तीन रुपयांत विकून हात धुऊन घ्यायचा. पेपरमध्ये जिल्हावार गावाचे, विद्यालयाचे नाव, त्याखाली उत्तीर्ण विद्यार्थ्याचे प्रथम नावासोबत आडनाव आणि कंसात त्याला मिळालेले गुण, तसेच श्रेणी असे सविस्तर येत असे. एकदा निकाल डोळ्यांसमोरून गेला, उत्तीर्णांमध्ये आपले नाव बघितले की उत्तीर्ण विद्यार्थी जाम खुश होऊन पेढे वाटायचे. त्याच पेपरमध्ये मेरीटची सूची प्रसिद्ध व्हायची. त्याकाळी बहुदा नागपूर, अमरावती, अकोला, उमरेड, सावनेर याकडील विद्यार्थीच विदर्भातून प्रथम येत. मेरिटमध्ये नागपूरच्या हडस विद्यालयाचे विद्यार्थी अधिक चमकत असत. चंद्रपूर जिल्ह्यातून चंद्रपूर, वरोरा, ब्रम्हपुरी येथील विद्यार्थी हमखास मेरिटमध्ये असायचेच. पेपरमध्ये आपले नाव बघितल्यानंतर ते विद्यार्थी तो पेपर जपून ठेवायचे. नंतर नावासह निकाल येणे बंद होऊन फक्त उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे रोलनंबर व त्यांना मिळालेले गुण एवढेच येऊ लागले. मेरिट सूची येणे सुरूच होते. त्यानंतर पेपरमधून निकाल येणे बंद झाले. निकालाची तारीख पेपरमधून आली की, त्या दिवशी जिल्ह्याच्या मुख्यालयी गुणपत्रिका यायच्या. शाळांनी ते तेथून आणायचे आणि दिलेल्या वेळेवर गठ्ठा उघडून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटायच्या. निकाल बघण्याकरिता शाळांमध्ये विद्यार्थी गर्दी करत.कोण प्रथम आला ते जाणून घेत. एकमेकांची माहिती मिळाल्याने मजा यायची. इंटरनेट पद्धती आली आणि जुने सारेच गेले. आपापले निकाल इंटरनेटवर बघा आणि आपल्यातच आनंद व दु:ख मानत बसा, या एकलकोंड्या पद्धतीने गावातून, जिल्ह्यातून कोण विद्यार्थी प्रथम आला हे कळतच नाही. हल्ली तर विद्यार्थ्यांच्या आईचे नाव ही निकाल बघतेवेळी इंटरनेटवर अंकित होणे गरजेचे झाले आहे. तरच निकाल बाहेर येईल अन्यथा नाही. याच कारणाने बारावीचा निकाल महाविद्यालयांना निकालाच्या दिवशी बघता आला नाही. दहावीचा निकाल बघताना विद्यालयांनाही तोच पेच पडला. काळानुरूप बदललेल्या आधुनिक पद्धतींमुळे निकालाची पूर्वीची मजाच पार गेली आहे.