शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

प्रवशांकडून आरक्षणाला तिलाजंली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:26 IST

राज्य परिवहन महामंडळाने बसफेऱ्यामध्ये सीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र याबाबत पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती झाली ...

राज्य परिवहन महामंडळाने बसफेऱ्यामध्ये सीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र याबाबत पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती झाली नाही. परंतु, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी काही प्रमाणात प्रवासी सीट आरक्षित करतात. परंतु, जवळच्या पल्ल्यामध्ये आरक्षित करीत नाही. बहुतांश चंद्रपूर येथून हैदराबाद, औरंगाबाद, अमरावती, नागपूर येथे जाण्यासाठी आरक्षण करीत असल्याचे दिसून येते. मात्र मागील वर्षी कोरोनाने शिरकाव केल्याने बसफेऱ्या बंद होत्या. त्यानंतर ५० टक्के तत्वावर बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. रेल्वे बंद असल्याने लांबच्या पल्ल्यासाठी काही प्रमाणात सीट आरक्षित करण्यात येत होत्या. परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढीस लागली. त्यामुळे आपोआपच प्रवाशांची संख्या घटली. त्यामुळे सीट आरक्षित करणाऱ्यांची संख्या घटली आहे. चंद्रपूर आगारातून हैदराबादसाठी काही प्रमाणात आरक्षण करण्यात येत असल्याचे दिसून येते. मात्र इतर ठिकाणी जाण्यासाठी आरक्षण करीत नसल्याचे चित्र आहे.

बॉक्स

रातराणी केवळ एकच

दिवसा धावणाऱ्या बससाठीच प्रवासी मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे रात्रीच्या बसेससाठीसुद्धा कमी प्रवासी मिळतात. चंद्रपूर येथून रातराणी म्हणून केवळ एकच बस अंबाजोगाईसाठी धावत आहे. परंतु, या बससाठीसुद्धा आरक्षण करण्यात येत असल्याचे प्रमाणात अत्यल्प आहे. कोरोनापासून प्रवाशांची संख्या घटली आहे.

बॉक्स

नो वेटिंग

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रवाशांची संख्या घटत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी पूर्वी आरक्षण बुकिंग होत होती. आता जाणारे प्रवासीच घटल्याने हमखास सीट मिळते या भावनेने प्रवाशांतर्फे आरक्षण करताना दिसून येत नाही. तसेच बसमध्ये ट्रेनसारखा वेटिंगचा प्रकार बघावयास मिळत नाही.

बॉक्स

जिल्हाबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली

चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या घटली आहे. परिस्थिती चांगली होईपर्यंत प्रवासी संख्या वाढण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे बसफेऱ्याही कमी झाल्या आहेत. काही प्रमाणात याचा फटका प्रवाशांनाही बसत आहे.

बॉक्स

८५ बसेस रोज

जिल्हा मुख्यालयातून विविध मार्गावर ८५ बसेसच्या माध्यमातून सुमारे ५०० फेऱ्याचे शेड्यूल सध्या सुरू आहे. यामध्ये ग्रामीण भागासह शहरी भागाचाही समावेश आहे.

-लांब पल्ल्याच्या बसफेऱ्यासाठी प्रवासी संख्या घटल्याने गाड्याही काही प्रमाणात कमी करण्यात आल्या आहेत. कोरोना काळात ग्रामीण भागात बंद करण्यात आलेल्या बसफेऱ्या अद्यापही सुरू करण्यात आल्या नाही.