शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

वाघ, बिबट्याच्या दहशतीमुळे उडाली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 21:54 IST

कोठारी गावात मागील पंधरा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून तीन जणांना जखमी केले आहे. तर आनंद नगरातील कस्तुरे यांच्या सात कोंबड्यावर ताव मारला आहे. तसेच तीन मोकाट कुत्र्यांवर हल्ला करून फस्त केले आहे.

ठळक मुद्देवाघाच्या हल्ल्यात तीन जनावरे ठार : बिबट्याने सात कोंबड्या केल्या फस्त

लोकमत न्यूज नेटवर्ककोठारी : कोठारी गावात मागील पंधरा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून तीन जणांना जखमी केले आहे. तर आनंद नगरातील कस्तुरे यांच्या सात कोंबड्यावर ताव मारला आहे. तसेच तीन मोकाट कुत्र्यांवर हल्ला करून फस्त केले आहे. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने दोन पिंजरे लावले असून पंधरा कॅमेरे ठिकठिकाणी लावून हालचाल टिपण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र बिबटाने वनविभागाला गुंगारा देत तो कॅमेरातही आला नाही व पिंजऱ्याजवळ फिरकला नाही.एकूण बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांची झोप उडाली आहे.बिबटाने गावात प्रवेश करू नये, यासाठी सौर उर्जेवरील व बॅटरीवरील करंट तार जंगल हद्दीत लावलेले आहेत. मात्र बिबट्याच्या हालचाली व जंगल शेजारच्या घराजवळ दररोज नागरिकांना बिबट दर्शन देत आहे. रविवारला आंनदनगर येथील कस्तुरे यांच्या घरी जावून सात कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या. त्यामुळे गावकºयात कमालीची दहशत पसरली असून संध्याकाळी ६ नंतर रस्ते ओस पडलेले असतात व गावकºयांनी घराबाहेर जाणे बंद केल्याचे दिसून येत आहे. वनविभागाचे कर्मचारी दिवसरात्र कवडजई - कोठारी रस्त्यावर गस्त करीत आहेत.कोठारी बामणी, काटवली, पळसगाव, हरणपायली, आमडी व कळमना शिवारात नदीपात्राच्या तसेच कोठारी नाल्याच्या लगत वाघाने दहशत निर्माण केली असून चार जणांवरांना शेतात ठार केले आहे. शिवारात व नदीच्या पट्टयात वाघाला अनेक शेतकऱ्यांनी व नदीत मच्छिमारांनी बघितले आहे. या भागात वाघाने बस्तान मांडले असून दिवसरात्र शेतात फिरताना दिसून येत आहे. वाघाच्या सततच्या भ्रमंतीने शेतकºयात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या भीतीपोटी शेतकऱ्यांनी रात्रीची जागल बंद केली आहे. उभ्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतात रात्री जावे लागते. वीज वितरण कंपनीने रात्रीची लोडशेडींग बंद केल्याने दिवसा पिकांना पाणी करणे शक्य नाही. परिणामी पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.वाघाला जेरबंद करण्याची मागणीशिवारात सतत फिरणाऱ्या वाघामुळे शेतकरी दहशतीखाली असून त्याचा विपरित परिणाम शेतमालावर होत आहे. शेतातील जनावरांवर हल्ले होत असून बैलांना ठार करीत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून वनविभागाने वाघाला जेरबंद करण्याची मागणी डॉ. देवानंद गुरू, दीपक लोहे, वासुदेव खाडे, संतोष इटनकर यांनी करीत ठार झालेल्या जनावरांबाबत त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.कोठारी गावात बिबट्याने दहशत निर्माण केली असून यात तीन जण जखमी झाले आहेत. बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभाग सतत प्रयत्न करीत असून यंत्रणा अविरत काम करीत आहे. बिबट्याच्या हालचालीवर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. तसेच कोठरी परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याचे व जनावरांवर हल्ला करून शिवारात भ्रमंती करीत असल्याचे समजले. त्यावर योग्य उपाययोजना करण्यात येणार आहे.- गजेंद्र हिरे,उपवनसंरक्षक, मध्यचांदा वनविभाग, चंद्रपूर.