शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

कोठारी परिसरात वाघाचा धुमाकूळ

By admin | Updated: December 28, 2015 01:25 IST

कोठारी वनपरिक्षेत्रांतर्गत कोठारी, काटवली, कन्हारगाव, कुडेसावली, कवडजई बिटात मागील पंधरा दिवसांपासून बिबट व वाघाने ...

शेतकऱ्यांत दहशत : १५ दिवसात १० जनावरे ठारकोठारी : कोठारी वनपरिक्षेत्रांतर्गत कोठारी, काटवली, कन्हारगाव, कुडेसावली, कवडजई बिटात मागील पंधरा दिवसांपासून बिबट व वाघाने गावाशेजारी येऊन धुमाकूळ घातला आहे. गावातील गोठ्यात व जंगलात चरण्यासाठी जाणाऱ्या जनावरांवर हल्ला करून दहा जनावरांना ठार केल्याने जंगल शेजारी गावात व शेतकऱ्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.कोठारी येथील शेतकरी बबन मोरे, भाऊजी विरुटकर व दादाजी फरकाडे यांच्या गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर तीन दिवस सतत हल्ला करून ठार केले तर कुडेसावली येथील शेतकऱ्यांच्या जनावरांवर गावालगत रस्त्याच्या कडेला दोन जनावरे तसेच काटवली, बामणी येथील दोन गाई व कवडजई व परसोडी येथील तीन जनावरांवर हल्ला चढवून जनावरांचा फडशा पाडला आहे. त्याचप्रमाणे गणपूर, कन्हारगाव, देवई व भटारी येथील पाच ते सहा जणावरांना ठार केल्याची घटना घडली. कोठारी गावाशेजारी असलेल्या तलावात पाणी पिण्यासाठी जाणाऱ्या जनावरांवर बिबट्याने व वाघाने हल्ला केल्याची घटना घडली.वाघ-बिबट गावाशेजारी गावात येऊन हल्ला करण्याच्या प्रकारात दिवसागणिक वाढ होत आहे. यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. या प्रकाराची वनविभागाने वेळीच दखल घेऊन मृत जनावरांची नुकसानभरपाई देण्यात यावी.गुराख्यात दहशतजंगलात जनावरांना चराईसाठी जाणाऱ्या गुराख्यांना वाघ-बिबट्याचे रोज दर्शन होत असल्याने जंगलात जनावरांसह प्रवेश करणे दुरापास्त झाले आहे. अशात जनावरे जंगलात नेणे धोकादायक झाले आहे. जनावरांवर हल्ला करणाऱ्या या हिंस्त्र प्राण्यांपासून गुराख्याच्या जीवितास धोका निर्माण झाला असून जनावरांची चराई गावाशेजारी केली जात आहे.शेतकऱ्यांनी जागल बंद केलीशेतात शेतपिकांची राखण करण्यासाठी व जंगली श्वापदापासून रक्षण करण्यासाठी शेतकरी जागल करीत आहेत. मात्र वाघ-बिबट्याच्या दैनदिन उपद्रवाने शेतकरी दहशतीत असून आता रात्रीची जागल बंद केल्याने शेतपिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. यावर्षी निसर्गाने दगा दिला तर उभ्या पिकांची नासाडी जंगली प्राणी करीत आहेत. तसेच जनावरांवर वाघ-बिबटाचे हल्ले होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. निसर्ग व जंगली प्राणी तसेच शासनाच्या नियमात अडकलेले शेतकरी मदत कुणाकडे मागावी, या विवंचनेत सापडले आहेत.पादचाऱ्यांना वाघ-बिबटाचे दर्शनकोठारी-तोहोगाव, कोठारी-गोंडपिपरी, देवई व कन्हारगाव या मार्गावरुन दुचाकी, चारचाकी व पायदळ जाणाऱ्या लोकांना वाघाची जोडी तसेच बिबटाची जोडीचे रोज वेळीअवेळी दर्शन होते. यामुळे पादचारी भयभीत झाले आहेत. संध्याकाळी ६ वाजतापासून या मार्गावरील वाहतूक बंद होत आहे. सहा वाजतानंतर कुणीही या मार्गावरुन जाण्याची हिंमत करीत नाही. सर्व रस्त्यावर संध्याकाळी शुकशुकाट पसरल्याचे दिसून येत आहेत.बंदोबस्ताची मागणीकोठारी वनपरिक्षेत्रातील बहुतेक गावे व शेती जंगल शेजारी असून वाघ-बिबटाच्या दहशतीने सर्व परिसरात दहशतीचे वातावरण आहे. अशात वनविभागाने या प्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसान व नुकसान भरपाईची कार्यवाही त्वरित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता धीरज बांबोडे यांनी केली आहे.