शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

कोठारी परिसरात वाघाचा धुमाकूळ

By admin | Updated: December 28, 2015 01:25 IST

कोठारी वनपरिक्षेत्रांतर्गत कोठारी, काटवली, कन्हारगाव, कुडेसावली, कवडजई बिटात मागील पंधरा दिवसांपासून बिबट व वाघाने ...

शेतकऱ्यांत दहशत : १५ दिवसात १० जनावरे ठारकोठारी : कोठारी वनपरिक्षेत्रांतर्गत कोठारी, काटवली, कन्हारगाव, कुडेसावली, कवडजई बिटात मागील पंधरा दिवसांपासून बिबट व वाघाने गावाशेजारी येऊन धुमाकूळ घातला आहे. गावातील गोठ्यात व जंगलात चरण्यासाठी जाणाऱ्या जनावरांवर हल्ला करून दहा जनावरांना ठार केल्याने जंगल शेजारी गावात व शेतकऱ्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.कोठारी येथील शेतकरी बबन मोरे, भाऊजी विरुटकर व दादाजी फरकाडे यांच्या गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर तीन दिवस सतत हल्ला करून ठार केले तर कुडेसावली येथील शेतकऱ्यांच्या जनावरांवर गावालगत रस्त्याच्या कडेला दोन जनावरे तसेच काटवली, बामणी येथील दोन गाई व कवडजई व परसोडी येथील तीन जनावरांवर हल्ला चढवून जनावरांचा फडशा पाडला आहे. त्याचप्रमाणे गणपूर, कन्हारगाव, देवई व भटारी येथील पाच ते सहा जणावरांना ठार केल्याची घटना घडली. कोठारी गावाशेजारी असलेल्या तलावात पाणी पिण्यासाठी जाणाऱ्या जनावरांवर बिबट्याने व वाघाने हल्ला केल्याची घटना घडली.वाघ-बिबट गावाशेजारी गावात येऊन हल्ला करण्याच्या प्रकारात दिवसागणिक वाढ होत आहे. यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. या प्रकाराची वनविभागाने वेळीच दखल घेऊन मृत जनावरांची नुकसानभरपाई देण्यात यावी.गुराख्यात दहशतजंगलात जनावरांना चराईसाठी जाणाऱ्या गुराख्यांना वाघ-बिबट्याचे रोज दर्शन होत असल्याने जंगलात जनावरांसह प्रवेश करणे दुरापास्त झाले आहे. अशात जनावरे जंगलात नेणे धोकादायक झाले आहे. जनावरांवर हल्ला करणाऱ्या या हिंस्त्र प्राण्यांपासून गुराख्याच्या जीवितास धोका निर्माण झाला असून जनावरांची चराई गावाशेजारी केली जात आहे.शेतकऱ्यांनी जागल बंद केलीशेतात शेतपिकांची राखण करण्यासाठी व जंगली श्वापदापासून रक्षण करण्यासाठी शेतकरी जागल करीत आहेत. मात्र वाघ-बिबट्याच्या दैनदिन उपद्रवाने शेतकरी दहशतीत असून आता रात्रीची जागल बंद केल्याने शेतपिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. यावर्षी निसर्गाने दगा दिला तर उभ्या पिकांची नासाडी जंगली प्राणी करीत आहेत. तसेच जनावरांवर वाघ-बिबटाचे हल्ले होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. निसर्ग व जंगली प्राणी तसेच शासनाच्या नियमात अडकलेले शेतकरी मदत कुणाकडे मागावी, या विवंचनेत सापडले आहेत.पादचाऱ्यांना वाघ-बिबटाचे दर्शनकोठारी-तोहोगाव, कोठारी-गोंडपिपरी, देवई व कन्हारगाव या मार्गावरुन दुचाकी, चारचाकी व पायदळ जाणाऱ्या लोकांना वाघाची जोडी तसेच बिबटाची जोडीचे रोज वेळीअवेळी दर्शन होते. यामुळे पादचारी भयभीत झाले आहेत. संध्याकाळी ६ वाजतापासून या मार्गावरील वाहतूक बंद होत आहे. सहा वाजतानंतर कुणीही या मार्गावरुन जाण्याची हिंमत करीत नाही. सर्व रस्त्यावर संध्याकाळी शुकशुकाट पसरल्याचे दिसून येत आहेत.बंदोबस्ताची मागणीकोठारी वनपरिक्षेत्रातील बहुतेक गावे व शेती जंगल शेजारी असून वाघ-बिबटाच्या दहशतीने सर्व परिसरात दहशतीचे वातावरण आहे. अशात वनविभागाने या प्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसान व नुकसान भरपाईची कार्यवाही त्वरित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता धीरज बांबोडे यांनी केली आहे.