शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

कोठारी परिसरात वाघाचा धुमाकूळ

By admin | Updated: December 28, 2015 01:25 IST

कोठारी वनपरिक्षेत्रांतर्गत कोठारी, काटवली, कन्हारगाव, कुडेसावली, कवडजई बिटात मागील पंधरा दिवसांपासून बिबट व वाघाने ...

शेतकऱ्यांत दहशत : १५ दिवसात १० जनावरे ठारकोठारी : कोठारी वनपरिक्षेत्रांतर्गत कोठारी, काटवली, कन्हारगाव, कुडेसावली, कवडजई बिटात मागील पंधरा दिवसांपासून बिबट व वाघाने गावाशेजारी येऊन धुमाकूळ घातला आहे. गावातील गोठ्यात व जंगलात चरण्यासाठी जाणाऱ्या जनावरांवर हल्ला करून दहा जनावरांना ठार केल्याने जंगल शेजारी गावात व शेतकऱ्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.कोठारी येथील शेतकरी बबन मोरे, भाऊजी विरुटकर व दादाजी फरकाडे यांच्या गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर तीन दिवस सतत हल्ला करून ठार केले तर कुडेसावली येथील शेतकऱ्यांच्या जनावरांवर गावालगत रस्त्याच्या कडेला दोन जनावरे तसेच काटवली, बामणी येथील दोन गाई व कवडजई व परसोडी येथील तीन जनावरांवर हल्ला चढवून जनावरांचा फडशा पाडला आहे. त्याचप्रमाणे गणपूर, कन्हारगाव, देवई व भटारी येथील पाच ते सहा जणावरांना ठार केल्याची घटना घडली. कोठारी गावाशेजारी असलेल्या तलावात पाणी पिण्यासाठी जाणाऱ्या जनावरांवर बिबट्याने व वाघाने हल्ला केल्याची घटना घडली.वाघ-बिबट गावाशेजारी गावात येऊन हल्ला करण्याच्या प्रकारात दिवसागणिक वाढ होत आहे. यामुळे गावकरी भयभीत झाले आहेत. या प्रकाराची वनविभागाने वेळीच दखल घेऊन मृत जनावरांची नुकसानभरपाई देण्यात यावी.गुराख्यात दहशतजंगलात जनावरांना चराईसाठी जाणाऱ्या गुराख्यांना वाघ-बिबट्याचे रोज दर्शन होत असल्याने जंगलात जनावरांसह प्रवेश करणे दुरापास्त झाले आहे. अशात जनावरे जंगलात नेणे धोकादायक झाले आहे. जनावरांवर हल्ला करणाऱ्या या हिंस्त्र प्राण्यांपासून गुराख्याच्या जीवितास धोका निर्माण झाला असून जनावरांची चराई गावाशेजारी केली जात आहे.शेतकऱ्यांनी जागल बंद केलीशेतात शेतपिकांची राखण करण्यासाठी व जंगली श्वापदापासून रक्षण करण्यासाठी शेतकरी जागल करीत आहेत. मात्र वाघ-बिबट्याच्या दैनदिन उपद्रवाने शेतकरी दहशतीत असून आता रात्रीची जागल बंद केल्याने शेतपिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. यावर्षी निसर्गाने दगा दिला तर उभ्या पिकांची नासाडी जंगली प्राणी करीत आहेत. तसेच जनावरांवर वाघ-बिबटाचे हल्ले होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. निसर्ग व जंगली प्राणी तसेच शासनाच्या नियमात अडकलेले शेतकरी मदत कुणाकडे मागावी, या विवंचनेत सापडले आहेत.पादचाऱ्यांना वाघ-बिबटाचे दर्शनकोठारी-तोहोगाव, कोठारी-गोंडपिपरी, देवई व कन्हारगाव या मार्गावरुन दुचाकी, चारचाकी व पायदळ जाणाऱ्या लोकांना वाघाची जोडी तसेच बिबटाची जोडीचे रोज वेळीअवेळी दर्शन होते. यामुळे पादचारी भयभीत झाले आहेत. संध्याकाळी ६ वाजतापासून या मार्गावरील वाहतूक बंद होत आहे. सहा वाजतानंतर कुणीही या मार्गावरुन जाण्याची हिंमत करीत नाही. सर्व रस्त्यावर संध्याकाळी शुकशुकाट पसरल्याचे दिसून येत आहेत.बंदोबस्ताची मागणीकोठारी वनपरिक्षेत्रातील बहुतेक गावे व शेती जंगल शेजारी असून वाघ-बिबटाच्या दहशतीने सर्व परिसरात दहशतीचे वातावरण आहे. अशात वनविभागाने या प्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसान व नुकसान भरपाईची कार्यवाही त्वरित करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता धीरज बांबोडे यांनी केली आहे.