शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मानवी वाघांकडून वाघांचे प्रदर्शन

By admin | Updated: July 29, 2016 01:02 IST

वाघ हा सदा जंगलात राहणारा, जंगलाचा राजा आणि हिंस्र प्राणी! तो पर्यावरण रक्षकही आहे.

वसंत खेडेकर बल्लारपूर वाघ हा सदा जंगलात राहणारा, जंगलाचा राजा आणि हिंस्र प्राणी! तो पर्यावरण रक्षकही आहे. वाघ म्हणजे जिवाला भीतीच ! त्यामुळे वाघ समोर दिसला वा त्याचे नाव घेतले तरी पाचावर धरण बसते. तो पिंजऱ्याच्या आत असला की, त्याची काही भीती नाही. सर्कशीतील पिंजऱ्यात तो जेरबंद असला तरी त्याला जवळून निरखून बघता येते. तसेच, सर्कशीच्या खेळात, खेळाच्या रिंगणात त्याला आपण मोकळे बघतो. ते बघत असताना, चवताळून रिंगणाबाहेरुन तो प्रेक्षकांमध्ये घुसला तर, या कल्पनेने आपण पार घाबरुन जातो. (आता, सर्कशीत वाघावर बंदी आली आहे.) त्यामुळे वाघाला प्रत्यक्ष बघायचे असल्यास व्याघ्र प्रकल्पातच जावे लागते. अर्थात हे साऱ्यांना शक्य नाही. पण, वाघाचे आकर्षण सदा सर्वकाळ सर्वांच्या मनात असतेच ! या आकर्षणापायीच असावे, माणूस वाघ बनतो. वाघासारखा साज आपल्या अंगावर चढवतो आणि आपले पूर्ण शरीर वाघासारख्या रंगांनी रंगवितो. त्याद्वारे वाघाचे दर्शन लोकांना घडवित असतो. या मानवी वाघाला ‘परत वाघ’ असे म्हटले जाते. परत वाघ हा लहान-मोठ्यांचा लाडका आणि आकर्षणाचा बिंदू ! मानवी वाघ बनणे व ऐटदार पैतरे टाकत धडाकेबाज आणि विशिष्ट प्रकारच्या वाघांच्या तालावर नाचणे हा प्रकार भोसले काळापासून सुरू झाला, असे सांगतात. तेव्हापासून तर आजतागायत विदर्भात ही परंपरा सुरू आहे. गणेशोत्सव, मोहरम, शारदा- दुर्गा उत्सवात वाघ बनून नाचायला उधाण येते. वाघाला शोभावी अशी भरदार अंगकाठी, चेहरा तेज असला, की असे परत वाघ डोळ्यांची पारणे फेडतात. परत वाघ बनणे सोपे नाही. ज्याला तो वाघ बनायचे असेल त्याला पाय, हात व छातीवरील केस काढावे लागतात. त्यानंतर अंगभर पांढऱ्या रंगाचा पेंट लावला जातो. तो रंग सुकण्याची वाट बघावी लागते. त्यावर वाघासारखे पिवळे, काळे पट्टे फिरविले जातात. डोक्यावर वाघाचा विशिष्ट टोप आणि भरदार मिशांचा सेट चेहऱ्यावर फिट केला जातो. सोबतच कमरेभोवती वाघासारखी झुपकेदार शेपटी! या साऱ्या कठीण प्रक्रियेनंतर मानवी वाघ सजतो. रंग उडू नये, टोप व मिश्या सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी या पेहरावात त्याला सांभाळावी लागते. मानवी वाघ पेंटर रंगवितात. वाघ रंगविणारे काही खास पेंटर आहेत. त्यांच्याकडे जावे लागते. बल्लारपूर व चंद्रपूरला मोजकेच तसे पेंटर आहेत. मानवी वाघाचा प्रकार मुंबईकडे नाही. याची माहिती मुंबईकरांना व्हावी, याकरिता राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर येथील तिघांना परत वाघ बनवून मुंबईला गतवर्षी नेले होते. व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांनी बल्लारपूर येथील या तिघा मानवी वाघांच्या तालावर नृत्य केले. हा नाविण्यपूर्ण प्रकार बघून मुंबईकर व अमिताभ बच्चन प्रभावित आणि खूश झाले. अमिताभ मंचावरुन खाली उतरुन मानवी वाघांची माहिती त्यांच्याकडून घेत ते त्यांच्यासोबत चांगले २० मिनिटे रमत राहिलेत. असे आहे मानवी परत वाघाचे आकर्षण !