शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

मानवी वाघांकडून वाघांचे प्रदर्शन

By admin | Updated: July 29, 2016 01:02 IST

वाघ हा सदा जंगलात राहणारा, जंगलाचा राजा आणि हिंस्र प्राणी! तो पर्यावरण रक्षकही आहे.

वसंत खेडेकर बल्लारपूर वाघ हा सदा जंगलात राहणारा, जंगलाचा राजा आणि हिंस्र प्राणी! तो पर्यावरण रक्षकही आहे. वाघ म्हणजे जिवाला भीतीच ! त्यामुळे वाघ समोर दिसला वा त्याचे नाव घेतले तरी पाचावर धरण बसते. तो पिंजऱ्याच्या आत असला की, त्याची काही भीती नाही. सर्कशीतील पिंजऱ्यात तो जेरबंद असला तरी त्याला जवळून निरखून बघता येते. तसेच, सर्कशीच्या खेळात, खेळाच्या रिंगणात त्याला आपण मोकळे बघतो. ते बघत असताना, चवताळून रिंगणाबाहेरुन तो प्रेक्षकांमध्ये घुसला तर, या कल्पनेने आपण पार घाबरुन जातो. (आता, सर्कशीत वाघावर बंदी आली आहे.) त्यामुळे वाघाला प्रत्यक्ष बघायचे असल्यास व्याघ्र प्रकल्पातच जावे लागते. अर्थात हे साऱ्यांना शक्य नाही. पण, वाघाचे आकर्षण सदा सर्वकाळ सर्वांच्या मनात असतेच ! या आकर्षणापायीच असावे, माणूस वाघ बनतो. वाघासारखा साज आपल्या अंगावर चढवतो आणि आपले पूर्ण शरीर वाघासारख्या रंगांनी रंगवितो. त्याद्वारे वाघाचे दर्शन लोकांना घडवित असतो. या मानवी वाघाला ‘परत वाघ’ असे म्हटले जाते. परत वाघ हा लहान-मोठ्यांचा लाडका आणि आकर्षणाचा बिंदू ! मानवी वाघ बनणे व ऐटदार पैतरे टाकत धडाकेबाज आणि विशिष्ट प्रकारच्या वाघांच्या तालावर नाचणे हा प्रकार भोसले काळापासून सुरू झाला, असे सांगतात. तेव्हापासून तर आजतागायत विदर्भात ही परंपरा सुरू आहे. गणेशोत्सव, मोहरम, शारदा- दुर्गा उत्सवात वाघ बनून नाचायला उधाण येते. वाघाला शोभावी अशी भरदार अंगकाठी, चेहरा तेज असला, की असे परत वाघ डोळ्यांची पारणे फेडतात. परत वाघ बनणे सोपे नाही. ज्याला तो वाघ बनायचे असेल त्याला पाय, हात व छातीवरील केस काढावे लागतात. त्यानंतर अंगभर पांढऱ्या रंगाचा पेंट लावला जातो. तो रंग सुकण्याची वाट बघावी लागते. त्यावर वाघासारखे पिवळे, काळे पट्टे फिरविले जातात. डोक्यावर वाघाचा विशिष्ट टोप आणि भरदार मिशांचा सेट चेहऱ्यावर फिट केला जातो. सोबतच कमरेभोवती वाघासारखी झुपकेदार शेपटी! या साऱ्या कठीण प्रक्रियेनंतर मानवी वाघ सजतो. रंग उडू नये, टोप व मिश्या सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी या पेहरावात त्याला सांभाळावी लागते. मानवी वाघ पेंटर रंगवितात. वाघ रंगविणारे काही खास पेंटर आहेत. त्यांच्याकडे जावे लागते. बल्लारपूर व चंद्रपूरला मोजकेच तसे पेंटर आहेत. मानवी वाघाचा प्रकार मुंबईकडे नाही. याची माहिती मुंबईकरांना व्हावी, याकरिता राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर येथील तिघांना परत वाघ बनवून मुंबईला गतवर्षी नेले होते. व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांनी बल्लारपूर येथील या तिघा मानवी वाघांच्या तालावर नृत्य केले. हा नाविण्यपूर्ण प्रकार बघून मुंबईकर व अमिताभ बच्चन प्रभावित आणि खूश झाले. अमिताभ मंचावरुन खाली उतरुन मानवी वाघांची माहिती त्यांच्याकडून घेत ते त्यांच्यासोबत चांगले २० मिनिटे रमत राहिलेत. असे आहे मानवी परत वाघाचे आकर्षण !