शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

वाघ, बिबटे शिरणाऱ्या ‘त्या’ वाॅर्डांभोवती लावताहेत जाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2022 05:00 IST

दुर्गापुरातील वाॅर्ड क्रमांक १ व २ मधील मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा संचार सुरू असल्याने धोका टाळण्यासाठी चंद्रपूर वनपरिक्षेत्राच्या वतीने सुमारे एक किमीपेक्षा अधिक अंतरावर १५ फूट उंचीची जाळी लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या परिसराला लागून असलेल्या नेरी, कोंडी व दुर्गापूर येथील वाॅर्ड क्रमांक १, २ व ३ या भागात वन्य प्राण्यांचा संचार सुरू असतो. वाघ व बिबट्याचा संचार तर नित्याचा झाला आहे. हिंस्र वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरू लागल्याने संघर्ष वाढला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा  दुर्गापूर, ऊर्जानगर नेरी व कोंडी परिसरात मागील काही महिन्यांत वाघ व बिबट्याच्या हल्ल्यात नागरिकांचा जीव गेला, तर काही जखमी झाले. दुर्गापुरातील वाॅर्ड क्रमांक १ व २ मधील मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा संचार सुरू असल्याने धोका टाळण्यासाठी चंद्रपूर वनपरिक्षेत्राच्या वतीने सुमारे एक किमीपेक्षा अधिक अंतरावर १५ फूट उंचीची जाळी लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या परिसराला लागून असलेल्या नेरी, कोंडी व दुर्गापूर येथील वाॅर्ड क्रमांक १, २ व ३ या भागात वन्य प्राण्यांचा संचार सुरू असतो. वाघ व बिबट्याचा संचार तर नित्याचा झाला आहे. हिंस्र वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरू लागल्याने संघर्ष वाढला. वाघ व बिबट्याच्या हल्ल्याने नागरिकांत प्रचंड दहशत पसरली. हा परिसर दुर्गापूर ग्रामपंचायत व वेकोलीच्या हद्दीत येतो. चंद्रपूर वनपरिक्षेत्र कार्यालयाने मानव व वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. परंतु, झुडपी जंगलामुळे वाघ व बिबट्याची दहशत कायम आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एका आठ वर्षांच्या मुलाचा बळी गेल्याने संतप्त नागरिकांनी वेकोली व्यवस्थापकाच्या कार्यालयाची तोडफोडही केली होती. त्यानंतर वेकोलीने परिसरातील काटेरी झुडपे तोडून स्वच्छता केली. आता चंद्रपूर वन विभागाने प्रभावी पाऊल उचलले. दरम्यान, वनविभागाने सुरू केलेल्या प्रतिबंधात्मक कामाची पाहणी करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनीही समाधान व्यक्त केले. यावेळी सुनील काळे, माजी सरपंच अमोल ठाकरे, रायुकाँचे जिल्हा उपाध्यक्ष रोशन फुलझेले, सामाजिक कार्यकर्ते सचिन मांदाळे, राहुल भगत, सौरभ घोरपडे, भोजराज शर्मा उपस्थित होते.

नागरिकांची जबाबदारी   चंद्रपूर वन विभागातर्फे १.२५ किलोमीटर लांबीच्या या परिसराला सोलर लाईटसह १५ फूट उंचीची जाळी लावण्याचे काम सुरू झाले. या जाळीमुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरण्याचा मार्ग बंद होणार आहे. परिसरातील सर्वसामान्य नागरिक आता सुरक्षित होतील.  सव्वा किलोमीटरवरील जाळीमुळे  काही कच्चे पायवाट असलेले रस्ते बंद होऊ शकतात. त्यामुळे सुरक्षेसाठी लावलेली ही जाळी नागरिकांनी न तोडता वन विभागाला सहकार्य केले पाहिजे.

..तरीही काळजी  घ्यावी लागेल  - वेकोली हद्दीतील झुडपी जंगलामुळे वन्यप्राण्यांना या परिसरात आडोसा मिळतो. - सध्या या परिसराची स्वच्छता करण्यात आली. परंतु, पावसाळ्यात झुडपे पुन्हा वाढणार आहेत. त्यामुळे वेकोली, ग्रामपंचायत व वन विभागाला याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे.

वन विभागातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनात  ब्रेडेड जाळी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. ही जाळी १५ फूट उंचीची आहे.  जाळीमुळे वन्यप्राणी मानवी वस्तीत शिरकाव करणार नाही. शिवाय नागरिकांचे दैनंदिन जीवनही सुरक्षित राहील.-राहुल कारेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, चंद्रपूर

वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी सातत्याने लावून धरली होती. अनेक आंदोलनही केले. त्यामुळे वन विभागाने वस्तीभोवती जाळी लावण्याचा फार महत्त्वाचा निर्णय घेतला. -नितीन भटारकर, जिल्हाध्यक्ष रायुकाँ

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग